शुक्रवार, ३ मार्च, २०१७

चाफेकर







*दामोदर हरी चाफेकर ** याचे सत्य उलगडणारा लेख

' जातीयवादी '
' धर्मान्धळा '
' समाज सुधारकांवर जीवघेणे हल्ले चढवणारा '
' धर्मशास्त्राविरुद्ध विवाह झाले म्हणून सम्पूर्ण वरातीवर दगड हल्ला करणारा '
' मराठा सरदारांना हिजडे संबोधणारा '
' रँड खटला मुसलमानांवर फिरावा म्हणून खोटे पत्र लिहिण्याचा प्रयत्न करणारा '

*दामोदर हरी चाफेकर ** याचे सत्य उलगडणारा लेख
---------------------
शेंडगोटे सनातनी स्वजातीय माणूस असला कि त्याला अशा काही उपाध्या देतात कि त्याचा महापुरुषच बनवून ठेवतात..
जसा आदिवासी समाजातील राघोजी भांगरे, मांग समाजातील लहुजी साळवे यांचा इतिहास पुढे न आणता बऱ्याच नंतर बंड करणाऱ्या वासुदेव फडकेना आद्यक्रांतिकारक बनविला...
ज्याप्रमाणे भाऊ रंगारी ज्यांनी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव केला पण त्याचे श्रेय टिळकांना दिले...
भगत सिंग ,आझाद , क्रांतिसिंह नाना पाटील हे खरे स्वातंत्र्य वीर यांना तसे न संबोधता इंग्रजांची माफी मागितलेल्या स्वजातीय माणसाचा स्वातंत्र्य वीर केला..
तसाच यांनी कट्टर ' जातीयवादी ' ' धर्मान्धळा ' दामोदर हरी चाफेकर ला हुतात्मा बनवून ठेवला आहे ..

चला धूर्त, लबाड, कटकारस्थानी सनातनी *दामोदर हरी चाफेकरचे ** सत्य जाणून घेऊ ..
-------------------

*कट्टर धर्मान्धळा आणि प्रतिगामी*

चाफेकरांच्या गावातील काशिनाथ पंत गाडगीळ नावाच्या एका सुधारकाने त्याच्या मुलीचा विवाह धर्मशास्त्राविरुद्ध चिंतामण नारायण यांच्याशी करण्याचे ठरवले होते पण विवाह धर्मशास्त्राविरुद्ध ( मुलीचे सोळा वर्ष पूर्ण झाल्यावर विवाह होत असल्यामुळे ) होत असल्याचे चाफेकरांना समजले तेव्हा त्यांनी त्याला धडा शिकवायचा म्हणुण वरातीवर दगडफेक करून हल्ला चढवला ज्यात अनेक महिलांना दगड लागून इजा झाली होती .
चाफेकराणी हा प्रसन्ग स्वतःच्या आत्मचरित्रात वर्णन केला आहे. पुढे ते म्हणतात कि माझा बाप जरी धर्मशास्त्राविरुद्ध वागला तरी तो आमचा शत्रू ठरेल इथेच त्यांचा धर्मान्धळेपणा दिसून येतो..
----------------

*महाजातीयवादी*

वरील दोनही गृहस्थ गाडगीळ आणि चिंतामण हे चाफेकरांना नात्यात होते.. त्यामुळे सुपारी कार्यक्रमाला त्यांनी चाफेकरांना भोजनाचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार ते कशाप्रकारे धर्माविरुद्ध वागतात हे पाहण्यास चाफेकर सुपारीस गेले पण भोजनास थांबले नाहीत याचे कारण त्यांच्याच भाषेत ते काय देतात ते पहा

_<*<* " पानसुपारीस जाण्याचे कारण आपण तेथे गेलो तर त्याचे सर्व धर्मबाह्य वर्तन प्रत्यक्षात पाहण्यात येऊन आपली खात्री होईल(तो धर्मनिष्ठ नसल्याची) असा विचार करून गेलो होतो.. भोजनास गेलो नाही कारण यांची योग्यता मी धेडाप्रमाणे निंद्य करतो ". >*>*_

स्वजातीय धर्मशास्त्राविरुद्ध गेले म्हणून द्वेषातून ते त्यांची धेडांशी तुलना करतात.. मग जे खरोखर धेड दलित असतील त्यांच्याविषयी किती तिटकारा बाळगत असेल हा हुतात्मा ???.......
चाफेकरांनी आत्मवृत्तात गोफण शिकवलेल्या मुलांची नावे दिली आहेत ती सर्वच्या सर्व त्यांची स्वजातीय आहेत.
----------------

*'समाज सुधारकांवर जीवघेणे हल्ले चढवणारा.*

धर्माच्या अनिष्ट चालीरीती विरूद्ध कोरडे ओढणाऱ्या आगरकरांना हा माणूस महापापी म्हणतो...आणि मी त्याच्यावर डोळा ठेवून होतो पण तो सुटला असे आत्मचरित्रात नमूद करतो.
नंतर त्यांच्या मनात आले कि या समाजसुधारकी धर्मबुडव्यांना देहदंड झाला पाहिजे .. पण ते स्वजातीय ब्राह्मण असल्यामुळे चाफेकर काय लिहितात ते पहा

_<*<* " आमचा कोप अनावर होऊन आम्ही सुधारकचे अंक जाळून टाकू लागलो . पण तो काही मन शांत होण्याचा दंड नव्हे. म्हणून आम्ही देहदंड करावयाचा विचार करू लागलो. स्वजतीयपणा मनात आला कि आम्हाला किव येत असे. म्हणून आम्ही असा बेत केला कि यांना देहांत दण्ड न करता साधारण दंड करायचा आणि मग ताकीदपत्र पाठवून त्यांना इशारा करायचा " >*>*_
म्हणजे परजातीय ब्राह्मणेतर असता तर लगेच देहदंड दिला असता.
त्यानंतर नाट्यगृहातून बाहेर पडल्यावर नूतन विद्यालयाचे प्राध्यापक आणि सुधारक श्री कुलकर्णी यांच्यावर चाफेकरांनी डोक्यात प्रहार केला .. त्याचवेळेस सुधारक चे सम्पादक पटवर्धन हेही दुसऱ्या मार्गाने नाटक सुटल्यावर परतत असतानाहि ज्युनिअर चाफेकरांनी लोखंडी शिळेने कणपट्टी आणि डोकयाच्या मध्ये जोरदार प्रहार केला.. याला हा माणूस धर्माची कामगिरी म्हणतो.
असाच एक जीवघेणा हल्ला प्राध्यापक वेलिंगकर यांनी धर्मान्तर केल्यामुळे त्यांच्यावर दामोदर चाफेकरांनी केला होता .. हा हल्ला सुद्धा त्यांनी आपल्या आत्मचरित्रात वर्णन केला आहे
....एकूणच धार्मिक कट्टरतेने यांना ग्रासले होते हे सहज स्पष्ट होते.

सुधारक समूहाने " विधवा विवाह प्रतिबंधन निवारक संस्था " विधवा पुनर्विवाहासाठी विधवांसाठी स्थापन केली होती .. पण यांना दहशत बसवण्यासाठी चाफेकरांनी " आर्यधर्म प्रतिबंध निवारक मंडळी " आणि "स्वधर्म जीव घेणार आणि देणार मंडळ " काढली होती.

सुधारकांना लिहिलेल्या पत्रात ते त्यांना धमकी देताना म्हणतात

_<*<* " आमच्या धर्मात कशाही चालीरीती असोत.. त्याच्यात फेरफार करण्याची तुम्हाला गरज नाही. अन्यथा तुमच्या गळ्यावरून तलवार फिरवणे भाग पडेल ".. >*>*_
----------------

*मराठा सरदारांचा अपमान*

त्यानंतर दुसऱ्या बाजीरावाने आपले राज्य ब्रिटीशांच्या घशात ओतले या रावबाजीवरील आरोपांबाबत चाफेकरांना फार राग आहे यातून त्यांनी आपल्या आत्मवृत्तात पुढील वाक्ये लिहिली आहेत.

_<*<* " ज्यावेळेस बाजीरावाने राज्य गमावले त्यावेळेस मराठे सरदार शिंदे,होळकर,गायकवाड,भोसले हे सर्व हातात बांगड्या घालून लुगडे नेसून मराठमोळ्यात लावून बसले होते काय कि मिश्या भादरून हिजडे झाले होते ? " >*>*>_

इतक्या नीच पातळीवर मराठ्यांना बोलायची गरजच काय ?? कि आपल्या स्वजातीय रावबाजीवर आरोप झाले म्हणून द्वेषभावनेतून त्यांनी या शूर मराठा सरदारांविरुद्ध असे उदगार काढले ???...
गोमांस खाणारा दाजी खरे हा मित्र असल्यामुळे आणि टिळक विधवा विवाह समाजाचे सदस्य असल्यामुळे चाफेकर टिळकांना ( ??!!) स्वधर्मनिष्ठ मानत नाहीत.. !!
नंतर सुधारक मंडळींचे लावलेले फलक तोडणे, ते चोरणे कुठेतरी चुकीच्या जागी मुद्दामहून लावणे निव्वळ या आणि इतर कुरापती चाफेकरांच्या आत्मचिरित्रात दिसतात.
--------------

*रॅन्डच्या खुनाचा आरोप मुसलमानांवर फिरावा म्हणून खोटे पत्र लिहिण्याचा प्रयत्न*

रँड चा खून झाल्यावर इंग्रजांचा रोख पुण्याच्या धर्मांद सनातन्यांवर फिरला होता.. आपल्या स्वजातीयांना त्रास होऊ नये आणि मुसलमानांवर आळ यावा म्हणून मुसलमानी मध्ये एक खोटे पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला पण ऐन मोक्याच्या वेळेस ती भाषा जाणणारा पटकन सापडला नाही .. हे स्वतः चाफेकरांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे...
--------------

*रँडच्या खूनामागील सत्य*

रँड ला प्लेग ची साथ नीट थोपवता आली नाही आणि त्याने जनतेवर जुलूम केला असे आजपर्यंत एकच कारण आपल्याला सांगितले जाते आणि पाठयपुस्तकात हि तेवढेच सांगून चाफेलकरला त्याचा वध केल्याचे रंगवून महान बनवण्याचा प्रयत्न केला जातो..
पण सत्य असे आहे
प्लेग साथीत प्लेग संसर्गजन्य असल्यामुळे त्याची लागण आपल्याला होऊन नये म्हणून लोक गावच्या गावं सोडून जात.
साथ नियंत्रणात आणण्यासाठी स्वछ धुतलेले कपडे वापरावेत आणि घरातील अडगळीचे सामान टाकून द्यावे असे मानक तेव्हाही असत आणि रँड तेच अमलात आंणत होता.. पण सनातनी कडव्या विचारांचे असल्यामुळे आपल्या देवघरातील सामानाला हात लावू देत नसत पण इंग्रज दरबारी नियम आणि शिस्तीला धरून जबरदस्तीने हे सामान देवांच्या मुर्तीसककट बाहेर काढले जाई.. ..जातीत फरक न करता सर्वांसाठी एकच कॅम्प लावले जात .. जातीनिहाय प्रेतं वेगळी न करता समूहात ती एकत्रित जाळली जात .. इंग्रज चप्पल घालून देव्हाऱ्यापर्यंत येतो हि आणि अशी मुख्य धर्मभावना दुखावणारी कारणे रँड च्या खुनामागे होती
प्लेग साथीचे त्याचे चुकीचे व्यवस्थापन हे भुलवण्याचे कारण आहे...
एकूणच रँड ची हत्या हि धार्मिक भावना दुखावल्यामुळे केली गेली होती.. याचा दुजोरा पुन्हा चाफेकरांच्याच आत्मवृत्तात मिळतो तो असा..

चाफेकर आत्मवृत्तात एके ठिकाणी म्हणतात

_<*<* " रँड साहेबांचे आणि आमचे काहीएक वाकडे नव्हते त्यांनी जर आमचे धर्मात हात घालण्याकडे दुर्लक्ष केले असते तर आम्हाला असे करण्याचे काम पडले नसते.. "_ >*>*

ते पुढे लिहितात
_<*<* " रँड साहेबास कोणतेही व्यसन नसावे असे आमचे मत आहे. तो कधीही लेडीबरोबर लॉन टेनिस खेळत नसे. असे त्याचे बरेच गुण आमच्या लक्षात आले होते .. पण उपयोग काय ?? तो आमचा धर्मशत्रू बनला होता. त्यामुळे त्याचा सूड घेणे आम्हाला जरूर पडले.." >*>_

चतुरसिंगींच्या मंदिरात चाफेकर एक पद म्हणतात
_<*<* " पुण्य पत्तनी रँड ने धर्म बुडविला सारा ।। त्या मारा अविचारा हात आमुच्या गे आंबे धैर्य दे मज ।। " >*>*_ --- रँड ने आमचा धर्म बुडवला त्यामुळे त्या अविचारीला मारण्याचे बळ दे..

*८ ऑक्टोबर १८९७ ला पोलसांना स्टेटमेंट देताना चाफेकरांनी स्पष्ट म्हंटलय ब्रिटीशानी आंमच्या देवघरातील मुर्त्या तोडल्याने त्याचा बदला म्हणून आम्ही हे खून घडवले...*
असे अनेक पुरावे रँड ची हत्या धार्मिक कट्टरतेतून झाल्याची मिळतात.
------------
------------

जातीयवादी ' ' धर्मान्धळा ' ' सनकि ' ' समाज सुधारकांवर जीवघेणे हल्ले चढवणारा ' ' धर्मशास्त्राविरुद्ध विवाह झाले म्हणून सम्पूर्ण वरातीवर दगड हल्ला करणारा ' ' मराठा सरदारांना हिजडे संबोधणारा ' ' रँड खटला मुसलमानांवर फिरावा म्हणून खोटे पत्र लिहिण्याचा प्रयत्न करणारा '
असा दामोदर हरी चाफेकर शालेय पाठयपुस्तकात एक धडा त्याकरता वाहून आजही शिकवला जातो..

*या माणसापासून खरच आदर्श मिळू शकेल काय ?? आणि मूल घेतील तरी तो कोणता ?*


शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

इतिहासाची अक्षम्य विकृती इंद्रजित सावंत

इतिहासाची अक्षम्य विकृती
शुक्रवार, ६ जानेवारी , २०१७ इंद्रजित सावंत

शेवटी इतिहास महत्त्वाचा की भाषेचा फुलोरा असलेली राजसंन्याससारखी नाट्यकृती याचा निर्णय महाराष्ट्रालाच घ्यावा लागेल. राजसंन्याससारखी अनेक नाटके ओवाळून टाकावीत असा शिवछत्रपती आणि संभाजीराजांचा इतिहास आहे.


पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात बसवलेल्या नाटककार राम गणेश गडकरी यांचा अर्धाकृती पुतळा काढल्यानंतर या कृत्याच्या निषेधार्थ तथाकथित महाराष्ट्र् सारस्वत, कलाकार, नाटककार तसेच मुख्यमंत्र्यांपासून सर्वपक्षिय राजकारण्यांनी आपले भाषावैभव प्रकट केले. महाराष्ट्रातील पत्रपंडितांनी विविध माध्यमांतून या घटनेचा पंचनामा (एकांगी) केला. एकूणच नोटबंदी, कॅशलेसच्या बोजड चर्चेतून मोकळं होत या विषयानं मर्‍हाटी राज्याला ताजा विषय दिला. चर्चेची एकप्रकारे झोडच उठली मात्र हे सगळं होत् असताना एका निरूपद्रवी साहित्यिकाचा पुतळा या युवकांनी का काढला असावा याचा विचार, अभ्यास या मंडळींनी केलेला दिसत नाही.


राम गणेश गडकरी म्हणजे शब्दप्रभू, महान साहित्यिक, कवी आणि विसाव्या शतकातील सुरवातीची किमान पाच दशके ज्यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमी गाजवली असे नाटककार. गडकरी म्हणजे मराठी अस्मितेची तलवार आणि त्यांचे राजसंन्यास हे नाटक म्हणजे तर दिनानाथ मंगेशकर, कोल्हटकर, प्र.के. अत्रेंपासून पु.ल.देशपांडेंपर्यंत अनेक दिग्गजांच्या प्रेमाचा विषय.

आज काहीजणांच्यामते या राजसंन्यास नाटकाचे प्रयोग झालेच नाहीत असं असलं तरिही गडकरींनी त्यांच्या निधनापूर्वी बारसे केलेल्या बळवंत संगीत नाटक मंडळी म्हणजेच दिनानाथ मंगेशकर यांच्या नाटक कंपनीने या नाटकाचे संबंध महाराष्ट्रभर प्रयोग केले होते. याचे पुरावेही उपलब्ध आहेत.

गडकर्‍यांचे हे नाटक म्हणजे शिवपूत्र शंभूराजांवर लिहिलेली अपूर्ण कलाकृती. गडकर्‍यांच्याच शब्दांत सांगायचे तर "तत्वगर्भ नाटक" (principle play) आहे. संभाजीराजांवर वासुदेवशास्त्री खरेंपासून(गुणोत्कर्ष,इ.स.१८८५) या नाटाकापासून आजतागायत किमान ६०-७० नाटके लिहिली गेली आहेत. त्या अर्थानं एखाद्या व्यक्तिच्या चरित्रावर इतक्या मोठ्या संख्येनं नाट्यनिर्मिती होणं हाही एक विक्रमच म्हणला पाहिजे. मात्र यापैकी एखाद दोन अपवाद वगळता इतर नाटकांत बहुतांशी संभाजीराजांचे चित्रण, "प्रणयीयुवराज" (वा.न.शहा),  बेबंदशाही (वि.ह.औंधकर), दुर्दैवी छत्रपती (श.गो.घैसास), चिडलेला छावा (श्री.कृ.ओक), थोरातांची कमळा (ना.के.सोनसुखार) इत्यादी नाटकांत संभाजीरांजांचे परस्त्री आकर्षण, रगेल व रंगेलवृत्ती चितारणारी आहेत. द.ग. गोंडसेंसारख्या साक्षेपी संशोधकांनाही "राजयाचा पूत्र अपराधी देखा" सारखं नाटक लिहिण्याचा मोह आवरता आला नाही.
गडकर्‍यांचे राजसंन्यास हे अपूर्ण नाटक अनेकांना नाट्य समीक्षकांना,लेखकांना भूल पाडणारं ठरलं. पु.ल. देशपांडे आणि ग.दि. माडगूळकर यांनी या नाटकातले संवाद म्हणत म्हणत कसा लढाखचा प्रवास पूर्ण केला याचे रसभरीत वर्णन "गुण गाईन आवडी" मधे केलेले आहे. तर नाट्य समीक्षक, लेखक डॉ. भीमराव कुलकर्णी लिहितात,"राजसंन्यासची सारी बैठकच मराठ्यांच्या इतिहासातील नेमक्या वैशिष्टयांला हात घालणारी आहे. महाराष्ट्र धर्माचे तत्त्व तिच्यामधून अविष्कृत झालेले आहे. तिच्यामधे शोकनाट्याने भरलेल्या मराठ्यांच्या इतिहासातील एका दुर्दैवी कालखंडाचे आणि पौरूष व पराक्रम यांचा संगम झालेल्या संभाजीसारख्या व्यक्तिमत्वातील आत्मविस्मृतेची जाणीव किती दारूण असते याचे प्रत्यंतर आढळते. राजसंन्यास नाटकात मधले काही अंक आणि प्रवेश लिहायचे राहिले आहेत. त्यामुळे उजाड माळावरच्या भव्य परंतू अपूर्ण अशा शिल्पासारखे ते भासते. तिच्यातील भव्यता ही अभिजाततेची (classical) व महाकाव्याच्या जातीची (epic grandure) आहे. तिच्यात परके वाटावे असे वातावरण किंवा कल्पना यांचा अंशही नाही, असे खास मर्‍हाटी आहे. अशा या राजसंन्यासाच्या जादूने हे मराठी विश्र्व भारावलेले होते व आहे.'

गडकरींना या नाटकाची प्रेरणा सिंधूदुर्ग किल्ला दूरून पहाताना सुचली. त्यानी कधीही रायगड पाहिला नाही. गडकरींनी ज्या कालावधीत म्हणजे, इ.स. १९१० ते १९१८ च्या दरम्यान ज्यावेळेस ते पुण्यात वास्तव्यास होते त्या कालखंडात हे नाटक लिहिले. इथे याचा उल्लेख यासाठी केला कारण कथा, कादंबर्‍या, नाटके लिहिताना त्या त्या काळाचा प्रभाव त्या त्या काळातील वैचारिक मतप्रवाहांचा परिणाम संबंधित लेखकाच्या लिखाणावर पडत असतो. आणि यावेळी म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरवातीला दोन तीन दशके पुण्यातील वातावरण फ़ुले, राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने भारावलेले होते. तर दुसरीकडे लोकमान्य टिळक, न.चि. केळकर अशी मंडळी सनातनी वृत्तीचे समर्थन करत होती. थोडक्यात यावेळेस पुण्यात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचे जोरदार वादळ घोंगावत होते. या वादळाचा केंद्रबिंदू मराठ्यांच्या म्हणजेच शिवछत्रपतींच्या भोसलेकुळाचा इतिहास हाच होता.

सत्यशोधक आणि टिळकपंथीय दोन्ही गट लेख, भाषणे, पुस्तिका, ग्रंथ, नाटके, मेळे यांच्या माधमातून आपापल्या विचारांचा प्रचार - प्रसार करत होते तर काही कजाख विद्वान मराठ्यांचा इतिहास विकृत स्वरूपात मांडत होते. यातूनच मराठ्यांची अस्मिता, भोसले कुळाला बदनाम करण्यसाठीच्या कंड्या पिकविल्या जात होत्या. "तुझी बुक्की तर माझी लाथ" या न्यायाने जोरदार लढाई सुरू होती. या सार्‍याचा परिणाम गडकरींसारख्या नाटककाराच्या लेखणीवर पडला नसता तरच नवल होते. शिवाय गडकरी हे टिळकपंथीयांचे सेनापती न. चिं. केळकर यांच्या सतत संपर्कात होते. "राजसंन्यास"नाटक लिहिण्याची तयारी व लिहिल्यानंतरची पहिली वाचने केळकरांच्या माडीवरच केलेली होती, अशी भा. वा. धडफ़ळे यांची या संदर्भातली आठवण पुरावा म्हणून आहे. शिवाय या आठवणीतून राजसंन्यासचे मूळ केळकरांपर्यंत कसे पोहोचते याचिही माहिती आपणांस देतो. या आठवणीत धडफ़ळे लिहितात, "१९१७ साली एका दुपारी आम्ही गायआळीतून जात असताना राम गणेश गडकरी मास्तरांना केळकरांकडे जायची लहर आली. दारात शिरताच त्यांनी मोठ्या आवाजात तात्यांची चौकशी सुरू केली. गडकरी आत गेले व दोघेही (केळकर-गडकरी) तब्बल दोन तास गप्पा मारत बसले होते. तात्यांचे तोतयाचे बंड हाच गप्पांचा मुख्य विषय होता. गडकरींनीही आपल्या राजसंन्यास ची त्रोटक हकिकत सांगताना नाटकाच्या भाषेचा प्रश्न निघाला. तात्यासाहेबांनी पुष्कळ मार्मिक सूचना करून मराठी बखरीची दोन तीन जाडी पुस्तके आपल्या ग्रंथालयातून काढून गडकर्‍यांच्या हवाली केली व त्यांचा अभ्यास करून नाटकाची भाषा ठरवा असे सुचविले. त्या बखरी बरोबर घेऊन व दुपारचा चहा तेथेच घेऊन आम्ही चारच्या सुमारास जेवणासाठी तातडीने निघालो कै. गडकरींनी त्या बखरीतूनच आपल्या राजसंन्यासची भाषा बरोबर उचलली व पुढे कित्येक महिन्यांनी ते ग्रंथ तात्यासाहेबांकडे साभार परत पाठवले"

अशाच एका आठवणीत द.वि. परांजपे लिहितात,"मी माझे लिखाण उठल्या सुटल्या तात्यासाहेबांना (न. चिं. केळकर) वाचून दाखवित असे. मीच काय गडकरींसारखे काही अभिजात लेखकही आपल्या लिखाणाच्या गुंडाळ्या हातात घेऊन तात्यासाहेबांना त्यातील भाग वाचून दाखवावा म्हणून त्यांच्याकडे हेलपाटे घालताना मी नित्य बघत असे"

उपरोक्त उल्लेख मुद्दाम इथे उद्धृत केले आहेत. गडकरींचे हे नाटक असले तरिही त्यांना या नाटकाच्या संदर्भासाठी कुणाची मदत, मार्गदर्शन मिळत होते हे समजावा हा हेतू आहे. केळकरांनी पुरविलेल्या साधनांच्या, बखरीच्या दंतकथेच्या आधारावर आणि आपल्या लेखणीच्या सामर्थ्याच्या जोरावर गडकरींनी या नाटकातील पात्रांची रचना, संवाद फ़ुलवले व भाषेच्या संवादाच्या दृष्टीने मराठ्यांच्या इतिहासाची पूर्णत: प्रतारणा करणारे हे राजसंन्यास नावाचे नाटक निर्माण झाले.

या राजसंन्यास नाटकाच्या संवादातून, त्याच्या पात्रांच्या निवडीतून इतिहासाचा मोठा अपलाप झाला आहे. "गडकरी" सारख्या नाटककारांकडून असा प्रमाद घडला तर तो एकवेळ अक्षम्य ठरतो पण गडकरींनी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली नाटक रचले ते न. चि.केळकर हे मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक होते, त्यांना या नाटकातील पात्रांचे नातेसंबंध व खर्‍या इतिहासातील व्यक्तिंचे नातेसंबंध माहित नव्हते असे कसे समजावे?

संभाजी राजाला "इष्कांच्या कैफ़ात" अडकविताना तो हिरोजी फ़र्जंद जे की खर्‍या इतिहासात शिवाजीराजांचे भाऊ लागतात त्याच्या मुलीशी "तुळशी"शी व्यभिचाराचे नाते ठेवतात. अशी पात्र रचना ठेऊन गडकर्‍यांना काय साधायचे होते? गडकरी फ़र्ग्युसन महाविद्यालयातील एका ललनेच्या प्रेमात व ती ललनाही यांच्या प्रेमात अखंड बुडलेली होती. पुढे गडकर्‍यांच्या या प्रेयसीचा विवाह एका संस्थानिकाशी झाला. यातून गडकर्‍यांनी केलेल्या उत्कट प्रेमाच्या खुणाही या नाटकात जाणवतात.

गडकर्‍यांची भाषा कितीही शेक्सपिअरशी नाते सांगणारी असली तरिही शेक्सपिअरच्या नाट्यकृतीत गडकर्‍यांनी केलेल्या नाट्यकृतीसारखा इतिहासाशी द्रोह दिसत नाही. गडकर्‍यांनी या नाटकात संभाजीराजांना स्वत:लाच रंडीबाज, छटका म्हणायला लावले. तसा शेक्सपीअरने त्याच्या नाटकातील मुख्यपात्राला रंडीबाजीत लोळवल्याचे उदाहरण नाही. गडकरींच्या नाटकातील संभाजीच्या तोंडी दिलेले संवाद नमुना म्हणून पाहायला हरकत नाही. गडकरींचा संभाजीराजा तुळापुरच्या औरंगजेबाच्या छावणीत त्याला सोडवायला आलेल्या साबाजीस म्हणतो, 'गोब्राह्मण प्रतिपालक हिंदुपदपादशहा श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज! नाही, साबाजी. ही माझी किताबत नाही! संभाजी म्हणजे केवळ रंडीबाज छाकटा!....'

हा संवाद संभाजीराजांच्या प्रस्थापित रूढ इतिहासातू गडक-यांनी लिहिला असावा. त्यावेळी म्हणजे ते नाटक लिहिले तेव्हा संभाजीराजांची प्रतिमाच तशी होती, असे गडकरी समर्थकांचे म्हणणे आहे. सुमारे १०० वर्षांपूर्वीच्या या नाटकात त्यांची व्यक्तिरेखा त्यावेळी उपलब्ध असलेल्या साधनांद्वारे रेखाटली गेली, असे समर्थन आज काही जण करत आहेत. मात्र वरील संवाद संपूर्णपणे वाचला, तर गडकरींना इतिहासाचे चांगलेच ज्ञान होते असे सिद्ध होते. या संवादात पुढे रायगडावरील गंगासागर या तलावाचाही उल्लेख आहे. त्यावरून त्यांना केवळ इतिहासाचेच नव्हे, तर ऐतिहासिक स्थळांचेही चांगले ज्ञान होते, असे सिद्ध होते. या संवादात चिटणीसाला हत्तीच्या पायी देण्याचा उल्लेख आला आहे, शिर्क्यांनी संभाजीराजांविरोधात केलेल्या बंडाचा उल्लेख आहे. हे उल्लेख संभाजीराजांच्या काळात झालेल्या घटनांचे चांगलेच ज्ञान गडकरींना होते याचेच निदर्शक आहेत.

गडकरींना संभाजीराजांचा इतिहासच अशुद्ध समजला म्हणून त्यांनी त्याचे नाट्यरूपांतर चुकीच्या पद्धतीने केले, हे मान्य केले, तरी याच नाटकात शिवाजी महाराजांबद्दल जिवाजीपंतांच्या तोंडी संवाद घालण्यात आले आहेत त्याचे समर्थन तर शक्यच नाही. 'शिवाजी नुसताच नावाला पुढे झाला. खरी करणी रामदासाचीच आहे' असे गडकरींचे जिवाजीपंत म्हणतात. हे स्पष्ट करणारा एक भलामोठा संवाद त्यांच्या तोंडी आहे. या संवादाची पेरणी कशाकडे निर्देश करते? बुद्धी शाबूत असलेला कोणता माणूस याचा केवळ नाटकातील संवाद म्हणून तरी स्वीकार करेल? शिवाजी महाराजांच्या गुरूपदाचा वाद त्यावेळी महाराष्ट्रात जोरदार घुमत होता. या नाटकाच्या निर्मितीच्या काळातच रामदासस्वामी शिवाजी महाराजांचे गुरू होते की नव्हते यावर मंथन सुरू होते आणि याच दरम्यान पुण्यातील अनेक वर्तमानपत्रांतून आणि कृष्णाजी केळुस्कर गुरुजींच्या शिवचरित्रातून, दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास हे शिवरायांचे गुरू नव्हते हे वारंवार पुराव्यांसह मांडले जात होते. असे असूनही शिवरायांनी रामदासांच्या सांगण्यावरूनच स्वराज्य स्थापन केले अशा आशयाला बळकटी देणारे संवाद गडकरी आपल्या नाटकात देतात, हे बघता या नाटकाचे लेखन आणि निर्मिती विशिष्ट हेतू ठेवून झालेले नव्हते असे ठामपणे कसे म्हणायचे?गडकरींच्या 'राजसन्यास'नाटकाची ऐतिहासिक आणि मानसशास्त्रीय अंगाने समीक्षा करणे हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यामुळे इथे वानगीदाखल संवादांतील काही भागाचीच चिकित्सा केली आहे. आता शंभर वर्षांनंतर हा विषय अचानक ऐरणीवर कसा आला, अशी चर्चा सुरू झाली आहे. खरे तर हा विषय प्रस्तुत लेखकाने २००७ मध्ये'शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध आणि बोध' हे पुस्तक लिहिले तेव्हाच शिवप्रेमींच्या लक्षात आला होता. त्याआगोदर तीन चार वर्षं महाराष्ट्रात जेम्स लेन या विदेशी लेखकाच्या माध्यमातून जिजाऊंच्या चारित्र्यावर विकृत माहिती संशोधन म्हणून रूढ करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रयत्नामागे पुण्यातील एका विशिष्ट गटातील विद्वान कंपूचा हात होता असा संशय घेऊन ज्या भांडारकर संस्थेत राहून जेम्स लेनने असे विकृत लिखाण केले त्या संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून तिथल्या फ़र्निचरची मोडतोड केली होती. त्यानंतर ज्या पध्दतीने ज्ञानभंडारावर हल्ला, तालिबानी कृती अशा अत्यंत शेलक्या शब्दात याचा निषेध करण्यात आला. या घटनेनंतर महाराष्ट्रात एक अभ्यासाची, इतिहासाकडे खास करून शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे अत्यंत चिकित्सक दृष्टीने पाहण्याची, खोलात जाऊन अभ्यास करण्याची प्रस्थापितांनी तयार केलेल्या चित्र शिल्पांचा डोळसपणे वेध घेण्याची दृष्टी निर्माण झाली.

त्यातून शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असणार्‍या श्र्वानाच्या शिल्पाकडे प्रस्तुत अभ्यासकाने लक्ष वेधले आणि या श्र्वानाचा संदर्भ शोधताना हा वाघ्या कुत्रा ज्या चौथर्‍यावर बसवला आहे त्या चौथर्‍यावरील शिलाफ़लकावर गडकर्‍यांच्या राजसंन्यास या नाटकाची अर्पण पत्रिकाच कोरल्याचे लक्षात आले. एकतर या तथाकथित वाघ्या कुत्र्याचा शिवकालिन अस्सल साधनांत उल्लेख नाहीच शिवाय भाकडकथांनी भरलेल्या बखरीतही त्याचा उल्लेख नाही हे लक्षात आले. शिवाय हा पुतळा न. चिं. केळकरांच्या प्रेरणेने व प्रयत्नांमुळे इथे बसला आहे.शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक जिथे झाला ती स्वराज्याची राजधानी आणि आज शिवचरित्राचे प्रमुख ठिकाण असणार्‍या जागी बसवला गेला आहे. म्हणजे ज्याचा उल्लेख संदर्भ साधनात नाही अशी एक अनऐतिहासिक प्रतिमा शिवरायांच्या मुख्य गडावर त्यांच्या समाधी शेजारी प्रस्थापित करायची त्यावर शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची बदनामी केलेल्या नाटकाची अर्पण पत्रिका त्या नाटकाच्या लेखकाच्या नावासह कोरून ठेवायची, परत गोपाळ चांदोरकरांसारख्या वास्तुविशारदाने "शोध शिव समाधीचा"नावाची पुस्तिका लिहून प्रचलित अष्टकोनी शिवसमाधी ही समाधी खरी नसून शिवरायांची खरी समाधी ज्या ठिकाणी कुत्रा बसवला आहे ती आहे असे लिखाण करायचे. या सर्व गोष्टीमागे हेतू नाही असे कसे म्हणायचे?

या सर्व विषयावर आक्षेप घेतला गेला नसता तर कालांतराने कुत्र्याचे स्मारक जे की गडकर्‍यांनी नाटक लिहिल्यानंतर १७-१८ वर्षांनी इ.स. १९३६ ला स्थापित झाले ते ऐतिहासिक सत्य आहे (दहा वर्षांपूर्वीपर्यंत असेच मानले जायचे) मग त्यावरील गडकर्‍यांच्या नाटकाची अर्पण पत्रिका कोरली आहे म्हणजे त्या नाटकातील आशयही सत्याचा अंश आहे हे ही सिध्द करायला कितीसा वेळ लागेल?

कारण या रायगडावरील कुत्र्याचा जन्म गडकर्‍यांच्या राजसंन्यास नाटकातून झाला आहे. हे काल्पनिक कुत्रे जर रायगडावरील शिवरायांच्या समाधीशेजारी ऐटित बसत असेल तर गडकर्‍यांनी नाटकात लिहिलेल्या संभाजी महाराजांबद्दलचा मजकूरही सत्याचा शालू का नेसणार नाही? असा इतिहास अशुध्द होऊ नये या भावनेतून जसा हा काल्पनिक कुत्रा रायगडावरून काढावा अशी मागणी पुढे झाली तशीच छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने असणार्‍या उद्यानात असणारा राम गणेश गडकरींचा पुतळा हालवावा अशी मागणी पुढे आली. या मागणीबरोबर पुण्यातील लालमहालातील दादोजी कुलकर्णीचा पुतळाही हलवावा अशी मागणीही पुढे आली होती. बहुजन मराठ्यांच्या रेट्यामुळे व दादोजी कुलकर्णीचे इतिहासातील स्थान पुराव्याने सिध्द होत नसल्यामुळे हा पुतळा येथून
 हलवला गेला. (लाल महाल बांधलाच गेला इ.स. १६५६-५७ सालात आणि दादाजीचा मृत्यू झाला १६४७ मध्ये)

नाटक, कादंबरी, चित्रपट या माध्यमातून मांडला जाणारा इतिहास म्हणून माणण्याचा कल, मानसिकता भारतीय समाजाची आहे. या माध्यमाचा प्रभावच खूप खोल आणि परिणामकारक असतो. याच नाटकांच्या. चित्रपटांच्या माध्यमातून संभाजीमहाराजांचे चारित्र्य बदनाम झाले. राजसंन्यास नाटक जरी शंभर वर्षांपूर्वीचे असले तरी त्याचे प्रयोग कधीही होऊ शकतात आणि नाटक, चित्रपटाला इतिहास मानण्याच्या प्रवृत्ती वा.सी.बेंन्द्रे, डॉ.कमल गोखले अशा संशोधकांनी अथक प्रयत्नांनी पुढे आणलेल्या संभाजी राजांचा खरा इतिहास या नाटकांच्या आवरणाखाली झाकला जाऊ शकतो.

राम गणेश गडकर्‍यांच्या पुणे शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील पुतळा त्यांनी लिहिलेल्या राजसंन्यास नाटकाच्या पोटात दडलेला संभाजी महाराजांचा इतिहास सत्यच आहे अशी मांडणी करण्यासाठी एकप्रकारे ऐतिहासिक साधन म्हणून वापरला जाऊ शकतो. या पुतळ्याच्या खाली असलेल्या शिलाफलकावर गडकरींचा गौरव आहे. त्यांनी राजसन्यास, एकच प्याला अशा नाटकांची निर्मिती केली. म्हणून या ठिकाणी त्यांचा पुतळा बसवण्यात आला, असा उल्लेख आहे.

राम गणेश गडकरी यांच्या भाषावैभवासाठी,कवित्वासाठी त्यांचा सन्मान जरूर करावा पण 'राजसंन्यास'सारखी हजारो नाटके ओवाळून टाकावीत अशा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी त्याची सांगड घालू नये.

शेवटी महाराष्ट्राचा इतिहास महत्त्वाचा की भाषेचा फुलोरा असलेली राजसंन्याससारखी नाट्यकृती याचा निर्णय महाराष्ट्रालाच घ्यावा लागेल. यासाठी इतिहास संशोधक शेजवलकरांनी संभाजी महाराजांवरच्या नाटकांचे केलेले परीक्षण आणि निरीक्षण उपयोगी ठरावे.

शेजवलकर म्हणतात, 'नाटकातील खोटे काल्पनिक प्रवेश निर्माण करून त्यात तितक्याच काल्पनिक संवादांचा मालमसाला भरून ऐतिहासिक व्यक्ती समाजापुढे मांडणे गैर आहे, असे आम्हाला वाटते. यात ब-याच व्यक्तींना अलौकिक गुण चिकटवण्यात येतात आणि वाईट माणसांना प्रमाणाबाहेर बदनाम करण्यात येते. नाटकापासून प्रेक्षक काय अपेक्षितात तो त्यांचा प्रश्न पण इतिहासाची ही अक्षम्य विकृती व हानी आहे, असे आम्हांस वाटते.'
(लेखक इतिहास संशोधक आहेत)

http://www.bigul.co.in/bigul/Newsdetails/index/39/sec/8

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०१७

अतिशय गर्भश्रीमंत नेहरू घराण्याची घराणेशाही .....

अतिशय गर्भश्रीमंत नेहरू घराण्याची घराणेशाही .....
1) मोतीलाल नेहरू यांनी मिठाच्या सत्त्याग्रहात 2 वर्ष तुरुंगवास भोगला!
2) जवाहरलाल नेहरू यांनी  एकूण 9 वर्षाचा तुरंगवास भोगला
3) एक वेळ तर मोतीलाल आणि जवाहर दोघेही बापलेक कारागृहात होते ,त्यावेळी जवाहरलाल यांच्या मातोश्री स्वरूपराणी नेहरू यांनी कॉग्रेस च्या कामाची धुरा सांभाळली. मोतीलाल नेहरू दिवंगत झाल्यावर, जवाहरलाल कारागृहात असताना पोलिसांनी केलेल्या मारहाणीत स्वरूपराणी नेहरू जखमी होऊन रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या व पोलिस मारहाणीत त्या मृत झाल्या म्हणून बातमी पसरली होती.  नेहरू कारागृहामधे असल्यामुळे आईला भेटायला जाऊ शकले नाहीत.
4) जवाहरलाल यांच्या पत्नी कमला नेहरूंनी प्रकृती साथ देत नसताना सुद्धा 1  वर्ष कारावास भोगला आणि आजार पण वाढले म्हणूनच त्यांची सुटका झाली ,
5)  मुलगी इंदिरा गांधी यांना  भारत छोडो आंदोलनात सहभागी झाल्यामुळे 2 वर्षाची शिक्षा भोगावी लागली. विशेष म्हणजे लग्नानंतर अवघ्या 6 महिन्यात, नवदांपत्य तुरूंगात होते.
6) जावई फेरोज गांधी यांनी भारत छोडो आंदोलनादरम्यान सहभाग घेतल्यामुळे 2 वर्षाची शिक्षा भोगली.
7) जवाहरलाल यांची सर्वात धाकटी बहिण कृष्णा हाथीसिंग यांनी 2  वर्षाचा कारावास भोगला.
8) जवाहरलाल यांच्या पेक्षा धाकटी असणारी विजयालक्ष्मी पंडित यांनी 3  वर्षाचा कारावास भोगला .
9) विजयालक्ष्मी यांचे पती रणजीत सीताराम पंडित यांना 3 वर्षाची सजा झाली, त्यापैकी अडीच वर्ष त्यांनी भोगली कारण 1944 साली  कारागृहात शिक्षा भोगत असतानाच ते  मरण पावले .
10) मोतीलाल यांचा पुतण्या ब्रिजकुमार नेहरू आणि त्यांची पत्नी रामेश्वरी नेहरू यांनी ही 'भारत छोडो' आंदोलनात सहभाग घेतला .
ही देखील घराणेशाहीच आहे ना , या घराणेशाही बद्दल तर कोणीच बोलायला तयार नाही.
© राज कुलकर्णी.

प्रतिस्पर्ध्यांविषयी घाणेरड्या कुचाळक्या फैलावून त्याला बदनाम करण्याची पेशवाई मुत्सद्द्यांची परंपरा बारभाईपासून आजवर अखंड चाललेली आहे.

येळकोट राहीना,मूळस्वभाव जाई ना

प्रतिस्पर्ध्यांविषयी घाणेरड्या कुचाळक्या फैलावून  त्याला बदनाम करण्याची पेशवाई मुत्सद्द्यांची परंपरा बारभाईपासून आजवर अखंड चाललेली आहे.या कामात ते अंग्रेजांचे संगोत्री म्हटले तरी चालेल.आज स्थापन झालेल्या हिंदी संघराज्याच्या कारभारात पेशवे संप्रदायिकांना "पक्का काट"मिळालेला आहे.आणि देशाच्या राजकारणातही त्यांना कोणी कोठे विचारात नाही.दिल्लीच्या हिंदू महासभावाल्याना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाल्याना चिथावून नेहरू सरकार उलथून पडण्याच्या अपयशी कटाने या बहिष्काराचा वचपा काढण्याचा उपद्व्याप थोड्याच दिवसांपूर्वी जनजाहीर झालेला आहेच.जवाहरलाल नेहरू,वल्लभ भाई आणि त्यांच्या राजकारणी हालचालींची निरर्गल शब्दात निंदा त्यांच्या पुणेरी पत्रांत रोज चालू असते.महात्मा गांधींची सर्वच्या सर्व मते सर्वानाच पटतात असे नाही.पान ते एक राजकारणी पुरुषोत्तम आहेत,जगद्वंद्य साधू आहेत.यांची साक्ष पंचखंड दुनिया देत असतानाही ह्या पिंडाचा हरेक आसामी आणि त्यांची आचकट,विचकट शिव्या देऊन आपल्या पिढीजात खूनसटपणाचे प्रदर्शन कसे करीत असतात ,हे पहिले म्हणजे रंगो बापूजीला त्यांनी "देशद्रोही"ठरवले प्रतापसिंहाला "नादान "म्हटले ,शाहू छत्रपतींना "स्वराज्यद्रोही"शिवी हासडली.बळवंतराव चिटणिसाला "लाचखाऊ भाडखाऊ "म्हटले आणि तमाम कायस्थ प्रभू जमातीला "स्वराज्यबुडवे" जाहीर करण्याचा खटाटोप केला,तर समंजस जनता यावरून काय बोध घ्यायचा तो घेतच असते.

लोकशाही जागृती कालपरवाची

आमच्या देशात अंग्रेज नको ,हा सत्तावानी विचार एकसारखा वाढत्या प्रमाणावर बळावत असला,तरी 1885 साली जन्माला आलेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसलाही लोकसत्ताक निर्भेळ स्वराज्याची जाणीव नव्हती.कायदेशीर मार्गाने ब्रिटिश साम्राज्यांतर्गत वसाहतीच्या स्वराज्यापुरत्याच तिच्या खटपटी असत.लॉर्ड कर्झन नें बंगालची फाळणी करताच वंगभंगाचा जो स्फोट झाला,त्याच वेळी राष्ट्रीय भावनेचा हिंदुस्थानात उगम झाला.डॉ.बेझंटबाईंनी होमरूलची चळवळ चालू केली आणि हिंदू मुसलमान ऐक्याचे तांबडे हिरवे निशाण दिले.अलीकडच्या काळातील हिंदुस्थानचे हेच पहिले राष्ट्रीय निशाण देशाला दिले.या निशाणावरही पुण्यातल्या टिळक पक्षाने आक्षेप घेतला आणि त्यात एका कोपऱ्यात अंग्रेजांचा युनियन जॅक बावटा रंगवून,आपल्या पक्षाचे वैशिष्ट्य जाहीर केले.होमरूल चळवळीपासून राष्ट्रीय भावनेला आणि स्वराज्याच्या प्रश्नाला जोर चढला.तरीही काँग्रेस म्हणजे शहरी शहाण्यांच्या पोषाखी चळवळीचे केंद्र म्हणूनच राहिली.हा काळ पावेतो महाराष्ट्रातल्या क्रांतिकारकांच्या खटपटी केवळ पांढरपेशा मूठभर अनुयायांच्या संघटनेवरच उभारलेल्या होत्या.खेड्यापाड्यातल्या समाजाच्या पाठिंब्याची कोणालाही दाद नव्हती,काही परवाच नव्हती .वासूदेव बळवंटांचा दीक्षाविधी घेणारे अनुयायी काय,अथवा सावरकरांच्या अभिनव भारताचे दीक्षित काय,एकजात सारे कोण होते .खरा हिंदुस्थान शहरात नसून तो खेड्यात आहे.तो शेतकरी कामकऱ्यांचा कोट्यवधी बहुजन समाज उठवल्याशिवाय ,या शहरी शहाण्यांच्या पोषाखी चळवळी फुकट आहेत .हे बिनचूक हेरून काँग्रेसला अस्सल लोकशाही शक्ती बनविण्याची कामगिरी महात्मा गांधींनी बजावलेली आहे.गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस हि लोकशाही स्वराज्यप्राप्तीची जबरजस्त शक्ती कशी बनली,हा इतिहास तुमच्या आमच्या डोळ्यांपुढे घडलेला असल्यामुळे तो येथे सांगण्याची आवश्यकता नाही.जातपात .धर्म ,स्पृश्यास्पृश्य यच्चावत साऱ्या भेदांना महात्मा गांधींच्या काँग्रेसने सफाचट तिलांजली देऊन.खऱ्या खऱ्या लोकशाही सामर्थ्यावर हिंदीसंघराज्याचे  स्वप्न आज सिद्ध करून दाखविल्यामुळे,पेशवाई राज्याच्या पुनर्घटनेने हिंदुस्थानाला आबाद करण्यास सजलेल्या जातीयवादी संघाना चालू घडीच्या राजकारणात द्वारपाळाचीहि जागा नाही.

संदर्भ : प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी ,सिंहावलोकन,लेखक :प्रबोधनकार ठाकरे.
पान नं : 433,434

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

भाजपा की 2014 से 2016 तक कि यादें

भाजपा की 2014 से 2016 तक कि यादें  -
--------------------------------
1. बलात्कार छोटी घटना है :- अरुण जेटली
2. मध्यम वर्ग अपना ख्याल खूद रखे :- अरुण जेटली
3. पेड पोधो को पेशाब पिलावो पानी नही :- नितिन गडकरी
4. लड़की बेचे आचार तो ज्यादा बिकेगा :- नरेन्द्र मोदी
5. बिहार बिमारु राज्य है :- नरेन्द्र मोदी
5. ब्लात्कार के लिये लड़की जिम्मेदार :- हरियाणा मुख्यमंत्री खट्टर
6. किसान आत्महत्या लव अफेर्स और नपुंसकता की वजह से करते है :- केन्द्रीय कृषि मंत्री
7. सरकार हनुमान नही है जो इराक मे फसे भारतीयों को ले आयेगी :- वी.के सिंह
8. बलात्कार कुछ हद तक अच्छा है कुछ हद बुरा है :- बाबू लाल गौर
9. रेल किराये महेंगे हो गये यह बड़ी बात नही छोटी बात है :- किरिट सौमैया ?
10. 25 % Inflation बराबर है :- राधा राम मोहन सिंग
11. बिना प्रोटेक्शन ऐइड्स को दूर भगायेंगे :- हेल्थ मिनिस्टर हर्ष वर्धन
12. जवान डकैत है :- वी.के सिंग
13. महिलाएँ चार पांच बच्चे पैदा करे :- साक्षी महाराज सांसद
14. लडकियों को मर्यादा मे रहना होगा तब जाकर बलात्कार नही होंगे :- विजय वर्गीय ( भाजपा नेता)
15. व्यापम स्केम बडी बात नही :- विजय वर्गीय
16. नितिश का DNA खराब है :- नरेन्द्र मोदी
17. किसान मरते भो मरने दो हम क्या करे :- भाजपा सांसद संजय दोत्तरे
18. दाल और सब्जी के भाव बढना महेंगाइ नही है :- अरुण जेटली
19. विदेशों मे कितना कालाधन है मुझे पता नही :- नरेन्द्र मोदी
20. चुनाव मे कालेधन की बात जुमला थी :- अमित शाह
21. राम मंदिर के लिये 320 सिट चाहिए :- अमित शाह
22. मुझे पहले शर्म आती थी भारत देश मे पैदा होने के लिये :- नरेन्द्र मोदी
23. भारत सपेरो का देश था :- नरेन्द्र मोदी
24. अच्छे दिन 25 साल बाद आयेंगे :- अमित शाह
25. पाकिस्तान को बिजली देंगे :- नरेन्द्र मोदी
26. आरटिकल 370 हटाना नामुमकिन :- राजनाथ सिंह
27. चीन गलती से हमारी सिमा मे घूस जाता है :- राजनाथ सिंह
28. भ्रष्टाचार ऐसे करो के किसी को पता न चले :- विजयवर्गीय
29. देश के जवानों से बडा काम हम करते है, शहीद होना बडी बात नही :- अमित शाह
30. जवान से ज्यादा जोखिम व्यापारी उठाता है :- नरेन्द्र मोदी
31. ज्यादातर बंगाल और बिहार की विधवा महिलाएँ भिख मांगती है मथुरा मे :- हेमा मालिनी
32. लाल गाल वाले टमाटर खाते है , गरीब नही :- प्रभात झा.
34. लडकीया अपने शरीर बनाने के चक्कर मे कुपोषण का शिकार बनती है :- नरेन्द्र मोदी
35. दलित और दलित महिलाएँ को मार मारने पर ही सिधे चलते है :- पुरुषोत्तम रूपाला
36. गालियाँ वेद वाक्य है :- राजनाथ सिंह
37. बीजेपी ने कभी नही कहा अचछे दिन आऐंगे :- नरेंद्र सिंह तोमर
38. दलितो को कुत्ते कह - कह
संग्रहकर्ता को धन्यवाद

सध्याचा काळात कुजबुज करून किंवा संदर्भ न देता असे फोटो सोशल मेडीयावर टाकून नेहरूंच्यावर शेरेबाजी केली जाते हि हीन प्रवृत्तीच आहे.

चाचा नेहरू !
#childrens_day_14th_November
#World_Photography_Day_19_August
नेहरू आणि स्त्रिया -

होमई व्यारावाला - भारताच्या पहिल्या फोटोजर्नलीस्ट होमई व्यारावाला यांनी काढलेले हे छायाचित्र आहे.ब्रिटीश हायकमिशनर सिम्पसन यांच्या पत्नीची सिगरेट शिलगावतानाचा हा फोटो त्यांनी नेहरूंच्या सांगण्यावरून काढला (लपूनछपून Paparazzi style ने नव्हे). युरोपियन देशात एखाद्या महिलेची सिगरेट लिट करणे म्हणजे Gentleman's etiquette समजले जात. नेहरूंची अशीच छायाचित्रे जेक्लिन केनेडी सोबतही आहेतच.होमई व्यारावाला यांनी नेहरू,इंदिराजी,गांधी यांसह अनेक नेते आणि प्रसिद्ध व्यक्तींची छायाचित्रे काढली, त्यांचा artistic sense हि जबरदस्तच होता.

नेहरू आणि एडविना -

हेन्री कार्टीयर-ब्रेसाँ - लॉर्ड माउंटबॅटन,एडविना आणि नेहरूंचा हा फोटो टिपलाय जगप्रसिद्ध फोटोग्राफर हेन्री कार्टीयर-ब्रेसाँ यांनी,कार्टीयर यांनी काढलेले जवाहरलाल नेहरूंचे गुलाबाचं फूल घेतलेले देखणे फोटो जगप्रसिद्ध आहेत. पण एडविना माउंटबॅटनच्या सोबत,आपलं पदच नव्हे तर देहभानही पुरतं विसरून हास्यविनोद करणारे नेहरू ब्रेसाँने जे काही पकडले आहेत त्याला तोड नाही.तेव्हाचा सर्वसामान्य माणसाला नेहरूंच्या अशा फोटो बद्दल आक्षेप घेण्याचे कारणच नव्हते, कारण त्यांना नेहरूंची जिवनशैली बद्दल पुर्ण कल्पना होती. आणि  एडवीना यांचा जन्म 28 नोव्हेंबर 1901चा आहे तर नेहरूंचा 14 नोव्हेंबर 1889 आहे. याचाच अर्थ असा की जेव्हा जून 1946 मधे नेहरू आणि एडविनाची प्रथम भेंट झाली तेव्हा नेहरू 57 वर्ष 8 महिऩे एवढ्या वयाचे तर एडविना 45 वर्ष 7 महिने वयाच्या होत्या.

हेन्री कार्टर ब्रेसन यांना आधुनिक छायाचित्रणाचे जनक म्हटलं जातं. त्यांनी डिसायसीव्ह मुव्हमेंट नावाची टर्म जन्माला घातली. कोणतीही फ्रेम दिसल्यावर लगेच कॅमेरॅचं शटर दाबण्यापेक्षा अशा एखाद्या प्रसंगाची वाट पहायची ज्यातुन एक कथा तयार होईल. नेहरूंचं छायाचित्र त्यांनी अशाच एका डिसायसीव्ह मुव्हमेंटला काढलय. त्यावरून नेहरूंच्या व्यक्तीमत्वाबद्दल शंका उपस्थित करून त्यांची बदनामी केली जाते

पण सध्याचा काळात कुजबुज करून किंवा संदर्भ न देता असे फोटो सोशल मेडीयावर टाकून नेहरूंच्यावर शेरेबाजी केली जाते हि हीन प्रवृत्तीच आहे.

नेहरू आणि सिगरेट -
त्यावेळेसचे सर्वच जागतिक मोठे नेते , चर्चिल , रूझवेल्ट ,स्टालिन ,क्लेमेंट एटली, नासेर , मार्शल टिटो. मावो, कास्त्रो , चे घेवारा, हो ची मिन्ह अगदी हिटलर ,मुसोलिनी हे सर्व सिगारेट ओढायचे आणि तीसुद्धा सर्वासमक्ष ,बिनदिक्कत . अर्थात भारतात त्यावेळी एकटे नेहरुच सिगारेट ओढत होते असे नह्वे ,देशात बिडी ,चिरुट, गांजा, हुक्का ,गुडगुडी या स्वरुपात धुम्रपान होतेच, आपल्या देशात इतर ही नेत्यांना बिडी ,तंबाखू ,तपकीर ,हुक्का यांचे व्यसन होतेच.

नेहरू आणि शिवाजी महाराज -
Glimpses of World History पुस्तक हे त्यांनी जेल मध्ये असताना लिहिले होते त्याकाळी तुरुंगात फक्त  लेखकांची पुस्तके उपलब्ध होत असत त्यातील काही चुकीच्या संदर्भांमुळे घोळ झाला.
Glimpses of World History  पुस्तकात हा उल्लेख होता जो नंतरच्या सगळ्या एडिशन्स मधून वगळण्यात आला, प्रतापगड वर शिवरायांच्या पुतळ्याचे १९५६ साली अनावरण झाले त्याप्रसंगी नेहरूंनी जाहीर माफी मागितली होती.
त्यांनतर Discovery of India मध्ये शिवरायांचा उल्लेख सर्वोच्च देशाभिमानी असा करण्यात आला होता.

व्यक्तीप्रमाणे Ideologies बदलतात, त्या त्या Ideologies ला follow करणारे लोक असतात, त्यामुळे आपल्या Ideology मध्ये न बसणाऱ्या व्यक्ती वर टीका केली जाते, आणि ते करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. (मी सुद्धा काही गोष्टीबाबत नेहरूंचा टीकाकार आहे ) पण हि टीका करताना आपण कोणत्या थराला जातोय याचेही भान असावे .

नेहरूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा जबरदस्त होती. नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाची थोरवी गाणारे लोक रशिया, अमेरिकेत आजही आहेत. ज्या काळात ‘मीडिया’ व ‘सोशल मीडिया’ हा प्रकार अस्तित्वात नव्हता त्या काळातली ही लोकप्रियता आहे.

 देशाच्या पहिल्या पंतप्रधानांची प्रतिमा आपण कुठे नेवून ठेवतोय याचाही विचार करण्याची गरज आज या दिवशी नक्कीच आहे.

“A photograph is neither taken or seized by force. It offers itself up. It is the photo that takes you. One must not take photos.” - Henri Cartier-Bresson

- मालोजीराव जगदाळे
(जुन्या पोस्ट मधील काही कमेंट्स पोस्ट मध्ये वापरल्या आहेत राज कुलकर्णी आणि इंद्रजित खांबे यांच्या )






लाखांचा पेन वापरतो . 20 लाखाचा सूट घालतो . आन आईला 2000 रुपयांसाठी लाईनला उभेकरतो . आपल्याला नाय पटले .

33हजार रुपये किलो चे जवानी टिकवणारे  मशरूम खातो .

1.50 लाखांचा पेन वापरतो .

20 लाखाचा सूट घालतो .


आन आईला 2000 रुपयांसाठी लाईनला उभेकरतो . आपल्याला नाय पटले .
Revealed! PM Modi Keeps Himself Healthy by Eating These Mushrooms Which Cost Rs 30,000 per Kg
Raghwendra Shukla | Sep 16,2016 06:13:00 PM IST
Revealed! PM Modi Keeps Himself Healthy by Eating These Mushrooms Which Cost Rs 30,000 per Kg
+5
Ever since Narendra Modi became Prime Minister, the only thing people are talking about is his rigorous work routine. He works almost 16 to 18 hours every day and that too without taking a break. Despite all this, he manages to keep himself fit with a combination of Yoga and healthy diets.

But very few people know that PM Modi eats mushrooms, found in Himachal, on a daily basis to keep himself active and lively. Interestingly, they cost nearly Rs 30,000 per kg.

Modi himself had revealed this and he is eating these mushrooms since he was BJP national secretary for party activities in Himachal Pradesh. He had revealed this to reporters during an unofficial conversation after becoming Gujarat Chief Minister.

“The secret of my good health is mushrooms of Himachal Pradesh. They have various health benefits,” he had reportedly said.

The scientific name of this mushroom is Morchella esculenta and is generally found in Himachal Pradesh. It commands a huge demand globally.

These mushrooms are the main source of income for villagers of Himachal Pradesh. They start collecting the mushrooms in March and continue it till May-end. It is dried before being sold.

https://mdaily.bhaskar.com/news/TOP-secret-of-pm-modi-health-5419173.html


आन आईला 2000 रुपयांसाठी लाईनला उभेकरतो . आपल्याला नाय पटले .

सोमवार, ३० जानेवारी, २०१७

गाढव गेले, ब्रम्हचर्यही गेले ! भाजप ने काँग्रेसकडून "विकी डोनर" उधारीवर घेतला, पण स्वतःचा छुपा रुस्तुम "विकी डोनर" दिसला नाही.

🐴  गाढव गेले, ब्रम्हचर्यही गेले !
भाजप ने काँग्रेसकडून "विकी डोनर" उधारीवर घेतला, पण स्वतःचा छुपा रुस्तुम "विकी डोनर" दिसला नाही. मेघालयचा राज्यपाल षन्मुगनाथन 55 वर्षे संघासोबत स्वतःचे ब्रम्हचर्य सांभाळून होता. इतक्या वर्षांच्या इच्छा-आकांक्षा म्हातारपणात उफाळून आल्या. तिवारीच्या मार्गावर चालत राजभवनाला "लेडीज क्लब" बनविले, "बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ" म्हणत मेघालयातील पोरीबाळींवर "सर्जिकल स्ट्राइक" करून "मास्टर स्ट्रोक" मारला. स्खलनशील रंगेल म्हातारे दोन्ही पक्षात आहेत.
 साधनशुचिता, party with difference गेले उडत !

आपले आयुष्य संघासाठी वाहून घेणाऱ्या मेघालायचे राज्यपाल षण्मुगनाथन यांनी  राजभवनला तरुण मुलींचा अड्डा बनविल्याचा आरोप  राजभवनाच्या १०० कर्मचाऱ्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केला .

http://indianexpress.com/article/india/sexual-harassment-cloud-meghalaya-governor-v-shanmuganathan-quits-4493461/

IIढोंगी लोकांचे बुळचट हिंदुत्व II ..

..IIढोंगी लोकांचे बुळचट हिंदुत्व II
..
पावूस आला की दगडा खाली दडून बसलेला बेडून दगडावर येवून डराव डराव करतात व पावूस जाताच पुन्हा डराव डराव करणारा बेडूक दगडा खाली लावून बसतो, तसेच हे भाजपवाले बेडका सारखे जसे पावूस आला की बेडूक डबक्यातून दगडावर येतात व डराव डराव करतात. तसेच हे आता फक्त निवडणुका जिंकण्यासाठीच हिंदुची मते मिळावीत म्हणून डराव डराव करत आहेत.
ह्या भाजप वाल्यांना हिंदुंच व हिंदुत्वाशी काहीही घेण देन नाही. याची अनेक उदाहरणे आहेत.
जम्मू कश्मीर मध्ये हे जुमलाबाज भाजपवाले, त्या पाकप्रेमी व आतंकवादी अफजल गुरु समर्थक मेह्बुबाच्या पीडीपी सोबत जम्मू कश्मीरमध्ये सत्तेत आहेत, परंतु सत्तेत येवून ऐवढे महिने झाले तरी, जे कश्मीरी पंडित कश्मीरच्या मेह्बुबाच्या, मुस्लिमांच्या दहशतीला घाबरून व मुस्लिमांनी हाकलून लावलेले व यामुळे काश्मीर मधून दुसऱ्या राज्यात स्थलांतर केलेले कश्मिरी पंडित आहेत. त्यांच्या घर वापशीची मागणी हे जुमला वाले त्या पाकप्रेमी व आतंकवादी अफजल समर्थक मेहबुबाकडे करणार आहेत का? भाजप ऐवढे दिवस केंद्र व जम्मू काश्मीर मध्ये सत्तेत येवून पण अजून कश्मीरी पंडितांच्या घर वापसीसाठी, पुनर्वसानासाठी प्रयत्न व आवाज का उठवला नाही?.
जंर आज हे भाजप वाले युपीच्या हिंदूच्या घरवापसी साठी १५ दिवसाचा अल्टीमेटम युपी सरकारला असतील तर चांगली गोष्ट आहे. मग प्रश्न असा पडतो की, जर युपीच्या हिंदूच्या घरवापसी साठी १५ दिवसाचा अल्टीमेटम भाजप नमाजवादी सरकारला देत असेल तर, मग भाजपने जम्मू काश्मीर मध्ये ज्या पाक प्रेमी मेहबुबाशी सत्तेच्या लालशे पोटी जो राजीकीय "लव जिहाद" केला आहे व लाचारी पत्करून सत्तेत जावून खुर्ची उबवत आहेत, त्याच जम्मू कश्मीरमध्ये १५ दिवसात जम्मू काश्मीर मधून विस्थापित झालेल्या काश्मीरच्या हिंदू पंडितांना परत कश्मीर मध्ये स्थान मिळण्यासाठी हे केंद्रात व राज्यात सत्तेत असून सुद्धा आवाज का उठवला नाही? उठवत का नाहीत? १५ दिवसात त्याना पुन्हा काश्मीर मध्ये स्थान का मिळवून देत नाहीत?
..
पावसाळ्यातील बेडूक फक्त पावूस आला कि दगडावर येवून डराव डराव करतात तसेच हे उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्यामुळे याना आता हिंदूची आठवण झाली आहे. या अगोदर राम मदिर, बाबरी मस्जिद यासारखे अनेक विषय आहेत, जे या भाजप व आर एसएस वाल्यांनी फक्त हिंदूची मत मिळावीत म्हणून राजकारण केले आहे, पण ते हिंदुना न्याय देवू शकले नाही. २ वर्ष झाली भाजप केंद्रात सत्तेत येवून युपी मध्ये हिंदूंचे स्थलांतर होत आहे या केंद्रातील भाजप सरकारला माहित कसे पडले नाही? जर सरकारी गुप्तचर खात्याना यांची माहित मिळत नाही म्हजेच हे केंद्रातील भाजप सरकार हे बुळचट व नाकाम सरकार आहे असेच म्हणावे लागे

रिलायंस मुखिया मुकेश अंबानी ने एनडीए सरकार के राज में महज ढाई करोड़ का डब्ल्यूएलएल लाइसेंस लिया और उसी पर मेन मोबाइल सर्विस शुरू कर दी। जबकि मेन मोबाइल सर्विस के लिेए लाइसेंस की कीमत 16 सौ करोड़ रही। शिकायत पर जब विभागीय जांच में खुलासा हुआ तो उनकी कंपनी पर 13 सौ करोड़ का जुर्माना लगा। इस पर अंबानी ने टेलीकाम मिनिस्ट्री के अफसरों से संबंधों का फायदा उठाते हुए जुर्माने की फाइल ही गायब करा दी

नई दिल्लीः रिलायंस मुखिया मुकेश अंबानी ने एनडीए सरकार के राज में महज  ढाई करोड़ का डब्ल्यूएलएल लाइसेंस लिया और उसी पर मेन मोबाइल सर्विस शुरू कर दी। जबकि मेन मोबाइल सर्विस के लिेए लाइसेंस की कीमत 16 सौ करोड़ रही। शिकायत पर जब विभागीय जांच में खुलासा हुआ तो उनकी कंपनी पर 13 सौ करोड़ का जुर्माना लगा। इस पर अंबानी ने टेलीकाम मिनिस्ट्री के अफसरों से संबंधों का फायदा उठाते हुए जुर्माने की फाइल ही गायब करा दी। वहीं जांच कर रहे सुप्रीम कोर्ट के एक जज को दो करोड़ रुपये भी दिए गए। यह सनसनीखेज खुलासा हुआ है एस्सार के फोन टैपिंग मामले से जुड़ी इंडिया संवाद की पड़ताल में।

 अंबानी ने पूछा, फाइल गायब हो गई तो आवाज हुई हां, हंसकर बोले सब फंसोगे

लाइसेंस नियमों का उल्लंघन कर मेन मोबिलिटी सर्विस शुरू करने पर जब अंबानी पर 13 सौ करोड़ रुपये का मिनिस्ट्री से जुर्माना लगा तो अंबानी ने टेलीकॉम मिनिस्टर प्रमोद महाजन, उनके ओएसडी अजय सिंह, सपा नेता व पॉवर ब्रोकर अमर सिंह,  ट्राई के चेयरमैन व शंकर अडवाल से बातचीत टैपिंग टेप में शामिल है। जिसमें कहा जा रहा कि क्या जुर्माने की फाइल गायब हो गई तो विभागीय शख्स कह रहा हां हो गई। उधर से हंसते हुए कहा जा रहा, जांच हुई तो सब फंसोगे।




समझिए पूरा खेल दीपक शर्मा-शीतल पी सिंहका इंटरव्यू सुनकर

केंद्रीय मंत्रियों, नौकरशाहों, बिजनेस घरानों और पॉवर ब्रोकर के बीच बातचीत के टेलीफोन टैपिंग की परतें एक-एक कर इंडिया संवाद लगातार खोल रहा है। इसी कड़ी में इंडिया संवाद के एक्जीक्यूटिव एडिटर दीपक शर्मा ने फोन टैपिंग सामने लाने वाले सु्प्रीम कोर्ट के वकील सुरेन उप्पल व उनके मित्र शीतल पी सिंह से बातचीत की। पार्ट वन में जहां आपने पीएमओ फोन टैपिंक का पूरा खेल समझा, पार्टी टू में आपने केतन पारिख के शेयर घोटाले में कंपनी का नाम आने से बचाने के लिए अनिल-मुकेश अंबानी की अमर सिंह, महाजन व अन्य नौकरशाहों से बातचीत जानी। अब पार्ट तीन के इंटरव्यू  को खबर के साथ संलग्न वीडियो में देख- सुनकर  आपको मोबाइल सर्विस लाइसेंस के नाम पर अंबानी द्वारा किए गए खेल का पता चलेगा। पता चलेगा किस कदर बिजनेस घराने जरा सा मामला फंसने पर मिनिस्ट्री, नौकरशाही को खरीद लेते हैं।  बता दें कि आडियो में बातचीत का मिलान अभी प्रमाणित होना बाकी है, इस नाते आडियो अभी हम सार्वजनिक नहीं कर रहे।
www.hindi.indiasamvad.co.in/othertopstories/mukesh-ambani-made-the-missing-1300-crore-penalty-imposed-on-mobile-license-file-13090

गुजरात विधानसभा चुनाव में भाजपा ने क्या कांग्रेस को हराने के लिए सपा और एनसीपी जैसे छोटे दलों से गठजोड़ कर उनके उम्मीदवारों को पैसे देकर खड़े किए

नई दिल्लीः गुजरात विधानसभा चुनाव में भाजपा ने क्या कांग्रेस को हराने के लिए सपा और एनसीपी जैसे छोटे दलों  से गठजोड़ कर उनके उम्मीदवारों को पैसे देकर खड़े किए। सुप्रीम कोर्ट के वकील सुरेन उप्पल को एस्सार से हासिल फोन टैपिंग सीडी की बातचीत को सुनकर यह सनसनीखेज खुलासा होता है। सीडी इसलिए अभी सार्वजनिक नहीं हो रही क्योंकि सीडी में संबंधित शख्सियतों की बातचीत लैब जांच के बाद कानूनी पुष्टि हो सकती है। इस बाबत वकील उप्पल ने दो महीने पहले ही पीएमओ को शिकायत कर फोन टैपिंग की सीबीआई जांच की मांग की है।
 www.hindi.indiasamvad.co.in/othertopstories/sp-and-ncp-fielded-candidates-with-money-bjp-13096

गुजरात के केजीबेसिन परियोजना से गैस उत्पादन से भारी मुनाफा कमाने के लिए अंबानी बंधुओं ने वाजपेयी सरकार के आर्थिक सलाहकार एनके सिंह और पेट्रोलियम मंत्री राम नाईक, पार्टी के राष्ट्रीय महासचिव रहे प्रमोद महाजन जरिए सांठ-गांठ की कोशिश की।

केजीबेसिन परियोजना से गैस उत्पादन से भारी मुनाफा कमाने के लिए अंबानी बंधुओं ने वाजपेयी सरकार के आर्थिक सलाहकार एनके सिंह और पेट्रोलियम मंत्री राम नाईक, पार्टी के राष्ट्रीय महासचिव रहे प्रमोद महाजन जरिए सांठ-गांठ की कोशिश की।
पार्ट 4:अटल के सलाहकार एनके सिंह रहे अंबानी भाईयों के मुंहबोले चाचा, गैस मुनाफे पर रामनाईक से भी हुई बात
18 June  11:59 2016Share:
AddThis Sharing Buttons





नवनीत मिश्र
नवनीत मिश्र
Email  navneetreporter007@gmail.com
twitter   NAVNEET09782090
नई दिल्लीः गुजरात के केजीबेसिन परियोजना से गैस उत्पादन से भारी मुनाफा कमाने के लिए अंबानी बंधुओं ने वाजपेयी सरकार में आर्थिक सलाहकार रहे चर्चित नौकरशाह एनके सिंह और पेट्रोलियम मंत्री और मौजूदा समय यूपी के राज्यपाल राम नाईक, पार्टी के तत्कालीन राष्ट्रीय महासचिव प्रमोद महाजन के जरिए सांठ-गांठ की कोशिश की। एस्सार फोन टैपिंग के लीक होने से यह सनसनीखेज खुलासा हुआ है। अंबानी बंधु कृष्णा-गोदावारी परियोजना से निकलने वाली गैस का रेट 2.34 डॉलर से अधिकतम बढ़ाने की कोशिश में थे। ताकि मुनाफा अधिक से अधिक कमाया जा सके।

सलाहकार एनके सिंह को अंबानी बंधु मानते हैं मुंहबोला चाचा

टेलीफोन कॉल्स से पता चल रहा कि प्रधानमंत्री वाजपेयी के आर्थिक सलाहकार एनके सिंह मुकेश और अनिल अंबानी के मानो घर के सदस्य की तरह हों। उन्हें दोनों भाई कभी चाचा तो कभी अंकल कहकर संबोधित कर रहे हैं।

सुनिए दीपक शर्मा-शीतल पी सिंह की बातचीत

केजी बेसिन परियोजना 2002 में अंबानी की कंपनी को आवंटित हुई। अंबानी बंधुओं ने परियोजना से निकलने वाली प्राकृतिक गैस से ज्यादा से ज्यादा मुनाफे के लिए कैसे दांव-पेंच आजमाए। यह आप खबर के साथ संलग्न वीडियो में देख-सुन सकते हैं जिसमें इंडिया संवाद के एक्जीक्यूटिव एडिटर दीपक शर्मा, खुलासे से जुडे़ वकील सुरेन उप्पल के मित्र वरिष्ठ पत्रकार शीतल पी सिंह से परत दर परत चर्चा कर रहे हैं।
www.hindi.indiasamvad.co.in/othertopstories/kejibesin-profits-tumble-by-ambani-ramnaik-13094

पचेल तेवढेच खा...जास्त खाल्ले तर डॉक्‍टरकडं जा‘...या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या सल्ल्याचा एक अर्थ जादा खाऊ नका असा आहे, पण दुसरा खरा अर्थ आहे...खा...खाणं थांबवू नका...

 पचेल तेवढंच खा...पण खा...
- सुनील माळी
मंगळवार, 21 जून 2016 - 09:05 AM IST
Share Link: http://www.esakal.com/Tiny.aspx?K=a9TZ0c
 
Tags: Nitin Gadkari, BJP, corruption, PA, blog, Sunil Mali
"पचेल तेवढेच खा...जास्त खाल्ले तर डॉक्‍टरकडं जा‘...या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या सल्ल्याचा एक अर्थ जादा खाऊ नका असा आहे, पण दुसरा खरा अर्थ आहे...खा...खाणं थांबवू नका...

याला म्हणतात "पार्टी विथ डिफरन्स‘...इतरांपेक्षा आमचा पक्ष वेगळा आहे, हा भारतीय जनता पक्षाचा दावा खराय...इतर पक्षातील नेते-कार्यकर्ते संधी मिळेल तेव्हा खातात, पण सार्वजनिक जीवनात वावरताना, व्यासपीठावर किंवा मिळेल तिथं आपण शुद्ध कसे आहोत आणि इतरांनीही शुद्ध राहणं कसं चांगलं आहे, ते मानभावीपणानं सांगत राहतात. भाजपचे मंत्री पाहा...त्यांचा कसलाही आडपडदा नाही, बडे शौकसे खाणार आणि खाल्लं तरी ते लपवून ठेवणार नाही.

गडकऱ्यांच्या या बिनधास्तपणाला काय म्हणावं ?... स्वभावाचा सरळपणा, खुली वृत्ती का निर्लज्ज कोडगेपणा ? पसंद अपनीअपनी...

गडकऱ्यांचं ते बोलणं तोंडानं खायच्या पदार्थांच्या त्यांच्या आवडीबाबत नव्हतं, हे जाणत्यांना कळलंच असेल. त्यांना सुग्रास पदार्थ चापायची दांडगी हौस. पण त्यामुळं वजन (आणि बहुधा कोलेस्ट्रॉलही) वाढलं अन त्यामुळं डॉक्‍टरांनी तेलकट, चमचमीत पदार्थ खायला बंदी घातली. त्यामुळंच "आपण एकच सामोसा खाऊ शकतो‘, असं त्यांनी पुण्यातल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना पडेल चेहऱ्यानं सांगितलं खरं, पण त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून "बेतानं खा‘, हा उपदेश केला तो तोंडानं खाण्याबाबतचा नव्हे, हे समजण्याएवढे कार्यकर्ते (अन जनताही) दुधखुळे नव्हेत...

बरं, या बैठकीत आपल्या मांडीला मांडी, खुर्चीला खुर्ची लावून बसलेल्या नेत्यांच्या उपस्थितीतच गडकऱ्यांनी असली सल्लाबाजी का करावी ? त्यांना कोणावर किंवा कोणाकोणावर निशाणा साधायचा होता ? प्रश्‍ना-प्रश्‍नांचा गलबला अन गुंता खूप आहे. त्यांच्या जवळच बसले होते भोसरी जमीनघोटाळ्यात आरोप झालेले नाथाभाऊ खडसे...कडाडत्या डाळींच्या भावाने वादाच्या भोवऱ्यात गेलेले गिरीश बापट...तिरूपती बालाजी देवस्थानला खासगी विमानानं ठेकेदाराबरोबर भेट दिल्यानं वादग्रस्त ठरलेले सुधीर मुनगंटीवार...फोटोखरेदी प्रकरणाचे अन पदवीप्रकरणाचे वादळ उठलेले विनोद तावडे...

...अर्थात, ही नेतेमंडळी झाली ती केवळ पक्षाच्या एका अधिवेशनातील व्यासपीठावरची. मंत्रिमंडळात वादात अडकलेल्या मंत्र्यांची आणखीही मोठी यादी आहे. चिक्की गैरव्यवहारामध्ये पंकजा मुंडे यांचं नाव होतं, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी भरलेल्या उमेदवारी अर्जातील शपथपत्रात पत्नीविषयक वाद झाला होता, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुदळे यांच्याकडं सौरपंप खरेदी प्रकरणात बोट दाखवण्यात आलं होतं तसंच जिंदाल कंपनीवर मेहेरनजर दाखविण्यात आल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता, आश्रमशाळांना पुरविलेल्या वस्तू निकृष्ट दर्जाच्या असल्यानं आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांना टीकेला तोंड द्यावं लागलं होतं, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पीएंच्या लाचेचे प्रकरणही गाजलं...

...अर्थात, ही झाली मंत्रिमंडळातील मान्यवरांची यादी, पण मंत्रालयात अन सचिवालयातील फिक्‍सर, दलाल अन अधिकाऱ्यांचं पूर्वीच्या सरकारमधलं रॅकेट अजूनही कायमच असल्याचं तिथं राबता असलेले सांगतात. कामं करण्याचा दरही कमीअधिक प्रमाणात तसाच आहे. महसूलमध्ये जरा जास्तच म्हणजे गडकऱ्यांच्याच भाषेत सांगायचं तर दोन्ही हातांनी ओरपण्याचे प्रकार होत असल्याचं दिसून येतं होतं. असं असलं तरी नगरविकास मधली कामं धुतल्या तांदळासारखी होत आहेत, असा कुणाचा समज असेल तर तो गैर आहे. तिथं "अगदी वरपर्यंत‘ कायकाय द्यावं लागलं, याच्या खुमासदार कथा देऊन आलेली मंडळी सांगतात.

...या सगळ्यांची माहिती दिल्लीस्थित, पण एक डोळा महाराष्ट्रावर रोखून असलेल्या गडकऱ्यांना निश्‍चितच आहे आणि त्यामुळंच त्यांनी "खाणं बंद करा‘, असा "अविचारी‘ सल्ला दिला नाही. तो बाबूंना-खाबूंना पटणारा नाही. सरकार कोणत्याही पक्षाचं असो, खाणं चालूच असतं, हा अनुभव या ज्येष्ठ नेत्याला असल्यानं (आणि आपण खाऊ नका, असा सल्ला दिला तरी तो कुणी मनावर घेणार नाही, याची खात्री असल्यानं !) त्यानं सगळ्यांना मानवणारा सल्ला दिला, "खा, पण जपून...पचेल एवढंच खा, अन्यथा तुम्हाला डॉक्‍टरकडं जावं लागेल,‘ असं अपचन झाल्यानं नुकतीच एका नेत्याला मुंबई सोडावी लागली असल्यानं आता इतरेजन हा सल्ला मानतील, अशी अपेक्षा आपण सर्वांनी करायला काय हरकत आहे ?

**
बरोबर आहे राजकारणी लोन्कानाचे परत सत्ता येईल किव्हा नाही, सत्ता अलीतर पद भेटेल किव्हा नाही हे कोणीच सांगू शकत नाही. सत्तेत असतानी गरीब सामान्य जनतेला काय लुटायचे ते लुटा आणि आपल्या नंतरच्या बर्याच पिढ्या बसून खातील एवढे लुटा आणि कमवून ठेवा. एवढे उघडपणे बोलतात तर गुपचूप किती खात असतील हे राजकरणी लोक, खाऊन खावून यांची ढेरी चांगलीच वाढलेली आहे हे सर्वांनी लक्षात घ्या...

बऱ्याच बाबतीत शाहू महाराजां बद्दल समाजात अपसमज पसरले अथवा पसरवले गेलेत..

शाहू महाराजांची घसरगुंडी...???

विषय फारच गंभीर आहे...नाजूक आहे.. त्या मूळे लिखाण हे खूपच सय्यमाने करायला हवे...हृदयातले रक्त कितीही सळसळत असले तरीही खांद्यावरील मस्तक हे शांतच ठेवले पाहिजे.. अश्या बाबतींमध्ये निव्वळ रक्त सळसळून काही फरक पडत नाही तर अश्या लढाया वैचारिक सुधारणे मधूनच लढल्या गेल्या पाहिजेत...


 राजर्षी शाहू महाराज...खरच खूपच उदारमतवादी, लोभस, भारदस्त, सुधारणावादी, खऱ्या अर्थाने जाणता राजा...कारण त्यांना प्रजेबद्दल जाण होती..आपल्या प्रजेचे हित कशात आहे हे त्यांनी चांगलेच हेरले होते..त्या मूळे त्याकाळातच त्यांनी अनेक सुधारणावादी बाबींचा पाया रचला, शिक्षणाचा आग्रह धरला, अस्पृश्यतेचा तिटकारा केला...अश्या अनेक गोष्टी आहेत लिहिणाऱ्याची लेखणी संपेल, पण त्यांचे कार्य काय संपणार नाही...असा लोकप्रिय राजा..जीवापाड प्रेम बसावे असा नितीमत्त, वडीलधारी,प्रेरणादायक,आपलासा वाटणारा शाहू राजा...छत्रपती शिवरायांचा, शहाजी राज्यांचा, आई जिजाऊचां, शंभू राज्यांचा खरा वारसा पुढे चालू ठेवणारे असे अत्यंत आदरणीय राजर्षी शाहू महाराज...शाहू महाराजांच्या आयुष्यात बऱ्याच घटना ह्या आजच्या काळानुरूप विवादास्पद अश्या स्वरूपाच्या घडल्यात..त्यात मग...वेदोक्त प्रकरण असेल..टिळकांशी झालेली वैचारिक लढत असेल..कुलकर्णी वतनाच्या खालसेच्या वेळी झालेली टीका असेल..तर त्यांच्या वयक्तिक आयुष्यात घडलेल्या काही घटना असतील..बऱ्याच गोष्टी आहेत..बऱ्याच बाबतीत शाहू महाराजां बद्दल समाजात अपसमज पसरले अथवा पसरवले गेलेत..

सर्वात मोठा क्लेश दायक असा घाव म्हणजे छत्रपती राजर्षी शाहूंच्या चारित्र्यावर उडवलेले शिंतोडे..शिंतोडे नाही तर अख्खे शाहूंचे चारित्र्यच काही मंडळींनी चिखलात बरबटून काढण्याचा प्रयत्न केलाय.....

त्याच काळात टिळकांच्या चरित्रा वरही शिंतोडे उडवले गेले..ताई महाराज प्रकरणात टिळकांवर बलात्काराचे आरोप ठेवले गेलेत..पण त्यात षडयंत्र रचणारी टोळकी हि वेगळी होती त्या बद्दल स्वतः टिळकांनी त्याच वेळेस भाष्य केले होते..टिळकांच्या चारित्र्यावर तो एकदाच चिखल उडवला गेला.. पण शाहू महाराजांच्या चारित्र्यावर ब्रह्म वृन्दांनी वारं वार चिख्खल उडवलाय..हे सत्य आहे..विशेष म्हणजे..आज टिळकां वर झालेल्या तथाकथित बलात्काराच्या आरोपाची खमंग चर्चा अथवा त्या बाबत कुठल्याही स्वरूपाचे विकृत विनोद हे कुठल्याच समाजात केली जात नाही पण तेच शाहुंवरील आरोपांचे पर्यवसन हे आज जवळ पास सगळ्याच जातीच्या समाजा मध्ये काही विकृत विनोदाच्या स्वरुपात चर्चिले जातात...येवढा अन्याय कशा पायी...???
कित्येक वर्षे झालीत..टिळका वरील आरोप तोही एकच, शाहुंवरील आरोप ते अनेक.. दोन्हीही घटना एकाच काळात घडल्यात... पण आज फक्त शाहुंवरच विकृत स्वरुपात विनोद का केले जातात..ह्याचा विचार करायला भाग पडतो..शाहू महाराजांचे चरित्र अगदी..उन्हाळ्यातील भर दुपारी तळपणाऱ्या सूर्याच्या लख्ख प्रकाशा प्रमाणे तेजस्वी..आणि निष्कलंकित असतांना शाहू महाराजां वर असे विनोद कशापायी ???मूळ मुद्दा मराठ्यांच्या महापुरूषां बद्दलच असे विनोद का रचले जातात आणि ते अगदी चवीने का चर्चिले जातात ??? शंभू राज्यां बद्दलही तेच..शिवरायां बद्दलही तेच..मा जिजाऊन बद्दलही तेच...शहाजी राज्यांबद्दलही तेच..असे का??? असा काय गुन्हा केला होता मराठ्यांच्या ह्या महापुरुषांनी ??? महाराष्ट्राला..भारताला स्वराज्याचे स्वप्न दाखवले हीच काय ती चूक...महाराष्ट्राला सुधारणेची, समानतेची, प्रगतीची स्वप्ने दाखवली हीच काय ती चूक ??? खरंच कुठे काहीच अन्याय होत नाहीये का ??? कि मराठे ह्या अन्याया बद्दल एवढे एकरूप झालेत कि त्यांच्यातला मूळ लढवय्या स्वभाव कुठे हरवलाय..कि बहुतांशी बहुजन मराठ्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची अजून जाणीवच नाही म्हणून ते अगदी "मोठे सावज" गिळून संथ झालेल्या अजगरा प्रमाणे मृतवत पडलेले आहेत..नेमके काय चालू आहे... आत्ता वेळ आलीय ती जागृती करण्याची...

थोडे मूळ विषयाकडे वळूयात..

शाहू महाराजां बद्दल आज ठिकठिकाणी "शाहू महाराजांची घसरगुंडी" ह्या शब्द प्रयोगाने काही विकृत कंबरे खालचे विनोद सगळी कडे कुजबुजले जातात...त्या त्या प्रदेशानुसार, व्यक्ती नुसार त्या विकृत विनोदाचे स्वरूप वेगवेगळे आहेत..पण एकूण सगळ्यात शाहू महाराजांची बदनामीच....शाहूंचे जातीय वंशज - म्हणजे मराठा मूले देखील हे विनोद चवीने चघळत असतात...काय हे दुर्दैव..त्या राज्याचे...त्यांचे म्हटल्या पेक्षा त्यांचे वंशज म्हणवून घेणाऱ्या सर्वच मराठा, बहुजन लोकांचे..आपल्याच आई बापाची इज्जत स्वतःच्याच हाताने वेशीवर टांगल्या सारखे आहे हे सगळे...
अर्थात ह्या सर्वांना आपण आपल्याच आई बापाची इज्जत वेशिवर टांगतोय ह्याची कल्पनाही नसते..कारण काय.. तर आज वर असलेला ठराविक लोकांचा समाजावरील प्रभाव..आधुनिक आणि जुन्या प्रसार माध्यमा वरील त्यांची पकड..आणि तेवढ्याच प्रमाणात कारणीभूत असलेली मराठा बहुजन लोकां मधील अडाणीपण..बुद्धीवादी..आणि अभ्यासू विषयां मध्ये असलेली अरसिकता.. अभ्यास पूर्ण माहिती न घेता भावनिक होऊन विचार करण्याची प्रवृत्ती..आणि गाव गप्पां वर भोळ्या मनाने विश्वास ठेवणारा स्वभाव अशी अनेक कारणे त्यास कारणीभूत आहे.. आत्ता एकंदर ह्या सर्व प्रकारची ऐतिहासिक माहित बघुयात..
१) १९०१ च्या सुमारास, जेव्हा वेदोक्त प्रकरणाचा भडका उडाला असतांना कोल्हापुरातील "जिरगे" नावाच्या एका सधन कुटुंबातील रूपवान मुलीची आपल्या राजवाड्यात 'अब्रू लुटल्या' चा आरोप केला गेला.ह्या प्रकरणाचा महाराजांच्या हितशत्रूंनी इतका गवगवा केला की , त्या मुलीच्या पित्यास आत्महत्या करावी लागली. त्या मूळे तर हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनून त्याचा नेमका फायदा उठवला गेला. त्या संबंधी शत्रूंकडून अतिरंजित कथा हेतुपुरस्कर पसरवल्या गेल्या. महाराजांचे चरित्र हनन करण्याचे एक जहरी हत्यारच त्यांच्या हाती आले. आरोप इतका गंभीर होता कि, शेवटी इंग्रज सरकारला ह्या प्रकरणाची चौकशी करावी लागली आणि या चौकशीत सरकारला हा , आरोप निराधार असल्याचे आढळून आले '
हे प्रकरण जेव्हा घडले असे सांगण्यात आले तेव्हा महाराज हे राजवाड्या वर न्हवतेच, ते कोल्हापूरच्या बाहेर असणाऱ्या सोनतळी (राजपुतवाडी ) कॅम्पवर होते. पण शत्रूंना त्याचे सोयरे-सूतक न्हवते. महाराजांचे राजवाड्यातील वास्तव्य गृहीत धरूनच त्यांनी त्या कथेचे षडयंत्र रचले होते - (संदर्भ १) राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ - संपादक जयसिंग राव पवार. पान क्रमांक २४२ , मूळ संदर्भ - २) राजर्षी शाहू: राजा व माणूस - कृ.गो.सूर्यवंशी, पहिली आवृत्ती, पुणे, १९८४.,पृ.३५९-३६० ; ३) शाहू छत्रपती आणि लोकमान्य - य.दि.फडके, पुणे १९८२, पृ.१४९; ४) Shahu Chhatrapati; A Royal Revolutionary - Dhananjay Keer, Bombay, 1976.page.162.)
२) यानंतर शाहू महाराजांच्या शत्रूंनी त्यांच्या वर १९०६ मध्ये दुसरा हल्ला केला. वेदोक्त प्रकरणात कोल्हापूरच्या ब्रह्मवृन्दांची झालेली अवमानास्पद हार, ब्राह्मण दहशदवाद्यांनी सुरु केलेल्या दहशदवादी कारवाया व त्या निपटून काढण्या साठी महाराजांनी अमलात आणलेली कठोर उपाय योजना अशी संमिश्र सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी या हल्ल्याच्या मागे होती. १९०६ च्या मध्ये वर महाराजांच्या कोल्हापुरातील शत्रूंनी 'शाहू महाराजांनी तीन स्त्रियांना जबरीने भ्रष्ट केले आहे ' अशा आरोपाच्या चौकशीची मागणी करणारी पत्रे मुंबई सरकार कडे पाठविली. त्यापैकी काही निनावी होती तर काही बनावट नावा खाली पाठविली होती. तसेच एक अर्जवजा पत्र कोल्हापुरातील ब्राह्मण-स्त्रियांच्या नावांनी कलकत्त्यास व्हाईसरायची पत्नी लेडी मिंटो यांना धाडले गेले होते.
हा सगळा उद्योग म्हणजे हिंदुस्थानातील एक संस्थानिक आपल्या संस्थानातील स्त्रियांची अब्रू धोक्यात आणत असून आता सार्वभौम सरकारनेच कठोर पावले उचलून (म्हणजे शाहू महाराजास पदच्युत करून) त्याचा बंदोबस्त करावा, म्हणून लेडी मिंटो यांची स्त्रीसुलभ सहानभूती मिळवण्याचा कुटील डाव होता, हे उघड होते. मुंबई सरकारच न्हवे तर व्हाईसरायच्या दरबार पर्यंत हे प्रकरण पोहोचल्याने इंग्रज सरकारने त्याची दाखल घेऊन चौकशीची चक्रे सुरु केली. कोल्हापुरातील इंग्रज राजनैतिक प्रतिनिधी कर्नल फेरीस यांना चौकशीचे आदेश दिले गेले, कर्नल फेरीस यांनी शाहू महाराजांची भेट घेऊन त्यांचा या आरोपावर खुलासा मागितला. या भेटी नंतर महाराजांनी त्यांना आपला लेखी खुलासा करणारे पत्र पाठविले.

प्रस्तुत पत्रात शाहू महाराजांनी आपली बाजू मांडत असतांना पुढील मुद्दे स्पष्ट केले - १) जरी त्यांच्या शत्रूंची निनावी पत्रांनी आरोप केले असले तरी या आरोपांच्या तळाशी जाऊन चौकशी व्हावी. २) अशी चौकशी झाली म्हणजे 'अब्रू' जाईल अशी भीती त्यांना वाटत नाही . ३) विजापूरकर,राशिंगकर,टिळक आदी शत्रूच्या गोटातील मंडळींचे सहाय्य या चौकशी साठी घेण्यास आपली हरकत नाही; अशी चौकशी सरकार करणार नसेल तर सत्य शोधानासाठी त्यांच्याशी खाजगीत चौकशी करावी ४) ज्या तीन स्त्रियांच्या विषयी आरोप केला जातो, त्यांच्या पालकांना जाहीररीत्या अथवा खाजगीत या प्रकरणा विषयी विचारावे. ५) अशी चौकशी होत असता कोल्हापुरात आपली अनुपस्थिती आवश्यक आहे, असे टिळक व त्यांच्या पक्षातील लोकांना वाटत असल्यास आपण त्यासही तयार आहोत ६) सर्व चौकशीनंतर आपणा वरील आरोप निराधार असल्याचे सिद्ध झाल्यास आरोप करणाऱ्या टिळक पक्षीयांना योग्य ते शासन व्हावे ७) शेवटी, हेच प्रकरण न्हवे तर जन्मापासून आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्यात अशा स्वरूपाचे कोणतेही कृत्य आपल्या हातून घडल्याचे या मंडळींनी सिद्ध करून दाखवावे, असे आपले त्यांना आव्हान आहे.
                 शाहू महाराजांची सत्यावर श्रद्धा होती; म्हणून तीन स्त्रियांना भ्रष्ट केलेल्या आरोपाच्या जाहीर चौकशीस सामोरे जाण्याचे नैतिक धैर्य त्यांच्या ठिकाणी उत्पन्न झाले होते. महाराजां विरुद्ध आरोप करणारी पत्रे निनावी असल्याने जाहीर चौकशी करण्याचे इंग्रज सरकारलाही धारिष्ट्य झाले नाही. पण कोल्हापुरातील त्यांच्या राजनैतिक प्रतिनिधीस मात्र गुप्त चौकशी करून वर अहवाल पाठविण्यास सांगितले गेले.त्या प्रमाणे चौकशी झाली..व त्या चौकशी नंतर महाराजांचे चारित्र्य स्वच्छ असल्याचा व ते कधीच गैरव्यभिचारी जीवन न जगल्याचा अभिप्राय देणारा अहवाल प्रथम मुंबई सरकारकडे, तेथून व्हाईसराय कडे व त्यांच्या कडून इंग्लंड मधील भारतमंत्र्याकडे पाठविला गेला. सर्व भौम सरकारने तो ग्राह्य मानून पुढची चौकशी केली नाही.

३) दरम्यानच्या काळात टिळकांच्या पुढाकाराने कोल्हापुरात लोकप्रतिनिधी सभा अस्तित्वात आलेली होती. या सभेत बहुसंख्य ब्राह्मण असून प्रो. विजापूरकर, राशिंगकर, अळतेकर, अभ्यंकर, गोखले अशी मंडळी नेतेपदी होती. ऑक्टोबर १९०६ मध्ये या सभेची पहिली व शेवटची बैठक झाली. या बैठकीत एका नेत्याने उद्गार काढले कि, "कोल्हापुरातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला आपल्या वित्ताचे, जीविताचे किंवा नैसर्गिक हक्कांचे कसे संरक्षण होईल याची रात्र-दिवस काळजी पडली आहे " (संदर्भ - राजर्षी शाहू समरक ग्रंथ - पान क्रमांक-२४६ ; राजर्षी शाहू छत्रपती - एक समाज क्रांती कारक राजा - धनंजय कीर, पहिली आवृत्ती, मुंबई १९७९ पृ.१७६ .) अशाच स्वरूपाचा प्रचार ब्राह्मणी वृत्तपत्रांतून होऊ लागला. शाहू महाराजांना महाराष्ट्रात बदनाम करण्याची हि पद्धतशीर मोहीम राबवली जात होती.
शाहू चरित्रकार कीरांनी म्हटले आहे , " ब्राह्मणी वर्तमान पत्रांनी , कोल्हापुरातील प्रत्येक पुरुष व स्त्री हि चिंताग्रस्त झालेली आहेत ह्या घोषणेचा प्रचार आणि प्रसार केला. कोल्हापुरातील ब्राह्मण व ब्राह्मणेतर स्त्रिया भयग्रस्त झाल्या होत्या, हे त्यांचे म्हणणे दुष्ट पणाचे व धादांत खोटे होते. ब्राह्मणेतर वर्ग ह्या शाहू विरोधी दुष्ट व चरीत्रहननाच्या चळवळी पासून अलिप्त राहिला होता. खरोखरच हि उघड उघड ब्राह्मणी चळवळ होती आणि त्या चळवळीचे लक्ष्य कोल्हापूर आणि कागल हेच होते. " (संदर्भ - राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ - पान क्रमांक-२४६ ; राजर्षी शाहू छत्रपती - एक समाज क्रांती कारक राजा - धनंजय कीर, पहिली आवृत्ती, मुंबई १९७९ पृ.१७६-१७७ )
४) १९१८ साली कोल्हापूर संस्थानातील कुलकर्ण्यांची वतने महाराजांनी खालसा केल्यावर तर टिळक पक्षीय व ब्राह्मणी वृत्तपत्रे यांच्या अंगाचा तिळपापड झाला. ब्रह्म वृन्दास तर महाराज म्हणजे आपले हाड वैरी वाटू लागले. त्यांच्या निषेध- सभांतून आणि वृत्तपत्रातून महाराज व त्यांच्या कुटुंबावर विखारी हल्ले होऊ लागले. खोट्या नाट्या कथा , कंड्या व अफवा अशा काही खुबीने अविरतपणे प्रसारित केल्या गेल्या कि , कोल्हापुरात कोणाचेही जीवित व अब्रू सुरक्षित नाही, असे महाराष्ट्रातील लोकांना वाटावे.

५) १९२० च्या सुरवातीस मुंबई सरकारने कुलकर्ण्याचा अर्ज फेटाळून लावल्याने कुलकर्णी मंडळी संतापून गेली होती. या पार्श्वभूमीवर मे १९२० मध्ये संकेश्वर येथे कुलकर्ण्यांची दुसरी परिषद भरली असता बेळगावच्या दत्तोपंत बेळवी या टिळक पक्षीय पुढाऱ्याने पुढील आशयाचे उद्गार काढले :"कोल्हापुरात कोणाचीही बायको सुरक्षित नाही, कोणाचेही जीवित व मालमत्ता सुरक्षित नाही !" (संदर्भ - राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ - पान क्रमांक-२४६ ; जुन्या आठवणी - वा.रा. कोठारी, पुणे १९७३, पृ.६९. )
बेळवीनच्या या असभ्य वक्तव्याचा निषेध महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर लोकांनी ठिकठिकाणी निषेध सभा भरवून केला. ब्राह्मणेतर वृत्तपत्रांनी टिळक पक्षीयाच्या बेजबाबदार हल्ल्यावर प्रतिहल्ले चढविले . एवढेच न्हवे तर मुंबईच्या 'इंदू प्रकाश' सारख्या नेमस्तवादी वृत्तपत्रानेही आपला निषेध नोंदवत असता म्हटले, " बेळवीनच्या ह्या कुत्सित्त भाषणा मूळे महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला अत्यंत दुख व संताप येईल. आज पर्यंत पुष्कळांनी कोल्हापूरची निंदा केली, पण बेळवी इतका अविचारी हल्ला कोणीही केला नाही. बेळवी यांनी दरबारावर उडविलेले निंदा प्रचुर शिंतोडे हे ऐकीव माहितीवर आधारलेले आहेत. आणि अयोग्यच न्हवे तर दुष्टपणाने प्रेरित झालेले आहेत. त्यांनी सत्याचा अपलाप केला आहे. असे कोल्हापूर दरबारावर आरोप करून त्यांनी आपल्या स्वतःसच काळीमा लावला आहे. (संदर्भ - राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ - पान क्रमांक-२४६ ; राजर्षी शाहू छत्रपती - एक समाज क्रांती कारक राजा - धनंजय कीर, पहिली आवृत्ती, मुंबई १९७९ पृ.४३९.)
त्या वेळेस शाहूंनी राजनितीक प्रतिनिधी वूडहाऊन यांना आपल्या पत्रा द्वारे प्रतिक्रिया कळविली , "मागास वर्गीयांची उन्नती करणे हा माझा उद्देश असल्या मूळे तसे करण्यात त्यांनी ब्राह्मणांचे अरेरावी जू जुगारून देऊन त्यांच्या मानसिक गुलामगिरीतून आणि सत्तेपासून मुक्त व्हावे हे माझे म्हणणे रास्त आहे. त्या मूळे माझ्यावर सुड उगविण्यासाठी आणि माझा लोकांनी खून करावा ह्या उद्देशाने दुष्ट पणाने माझ्यावर ब्राह्मण चळवळे हल्ला चढवत आहेत. माझ्या विरुद्ध लोकांच्या मनात द्वेष आणि संस्थानात अराजक निर्माण करण्याच्या हेतूने बेफाम भाषेत लिहित व बोलत आहेत " (संदर्भ - संदर्भ - राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ - पान क्रमांक-२४७ ; राजर्षी शाहू छत्रपती - एक समाज क्रांती कारक राजा - धनंजय कीर, पहिली आवृत्ती, मुंबई १९७९ पृ.४४०.)

६) शाहू महाराज्यांच्या चरित्राच्या बदनामीचे पर्व त्यांच्या मृत्यूनंतरही थांबले नाही. बदनामीच्या कथा तिखटमीठ लावून त्यांच्या शत्रूंनी समाजात पसरवतच ठेवल्या. या मध्ये टिळक पक्षीय मंडळी पुढे होती.
(संदर्भ - राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ - पान क्रमांक-२४७)

अश्या प्रकारे शाहू महाराजां वर अनेक प्रकारचे वैचारिक दहशदवादाचे हल्ले त्या वेळेसच्या ब्राह्मणांनी केले होते...आरोप करूनही शाहू महाराज्यांचे स्वच्छ निर्मळ असे चरित्र काही कलंकित होतांना दिसत नसल्या कारणाने मृत्यू नंतरही तो प्रचार ह्या मंडळींनी चालूच ठेवला...व त्याचेच पर्यवसन आजच्या काळात "शाहू महाराजांच्या घसर गुंडी" च्या नावाने केले जाणारे विकृत विनोद होत..


तत्कालीन राजे महाराज्यां मध्ये बहु पत्नीत्व आणि पत्नी सोडून 'अंगवस्त्रे' ठेवण्याची रीत पूर्वापार पासून चालू होती त्या मूळे शाहू महाराजां वरील ह्या असल्या विकृत विनोदांना नंतरच्या काळात बरेच खत पाणी मिळाले...मराठा बहुजन लोकही काही अभ्यास न करताच राजे लोकांचा रंगेल मिजाज असायचाच अश्या अल्पज्ञानी आणि संकुचित अभ्यासाच्या दृष्टीकोनातून ह्या विकृत विनोदा वर संशयास्पद वातावरण साहजिकच निर्माण होऊ लागले ...त्या मूळे शाहू महाराजांच्या वयक्तिक खाजगी आयुष्य बद्दल थोडी माहिती घेणे क्रमप्राप्त ठरेल...
डॉ.य.दि.फडके प्रभृती चरित्रकारांनी आपल्या ग्रंथात महाराजांच्या काम जीवना विषयी चर्चा केलेली आहे आणि त्या सर्वांनीच त्या विषयावर वास्तव बोधी दृष्टी कोण मांडलेला आहे."तारुण्याच्या ऐन उंबरठ्या वर , वयाच्या अठराव्या वर्षी, राजवाड्यात शाहू महाराजांच्या १२ वर्षे वयाच्या राणीच्या 'गर्भादान विधी ' ची तयारी सुरु झाल्याची वार्ता गुरु फ्रेजर यांना समजताच त्यांनी आपल्या शिष्याला सावधानतेचा इशारा दिला आणि उभयंतांच्या भावी आयुष्याच्या भल्यासाठी व सुदृढ संततीसाठी त्यांनी राणीचे 'रास्त वय' होईपर्यंत तिच्याशी शय्यासोबत करू नये, असे बंधन घातल्याचा उल्लेख मागे येऊन गेलाच आहे. महाराजांनी हे बंधन पाळून आत्मसंयमनाचे प्रत्यंतर आणून दिले होते. विशेष म्हणजे त्या काळी त्यांच्या या आत्मसंयमनाचे व स्वयं-नकाराचे (सेल्फ - denial ) कौतुक संस्थानाच्या 'कौन्सिल ऑफ administration ' ने खास ठराव करून केले होते " (संदर्भ - राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ - पान क्रमांक-२४८; राजर्षी शाहू: राजा व माणूस - कृ.गो.सूर्यवंशी, पहिली आवृत्ती, पुणे, १९८४.पृ.११३-११४ )
                      पुढे यथावकाश राज दांपत्यास चार अपत्ये झाली. बाळंतपणी अगोदरच नाजूक असलेल्या राणीसाहेबांची प्रकृती अधिकच नाजूक बनली. महाराजांना त्यांच्या पासून आवश्यक शरीर सुख मिळेनासे झाले. जवळच्या मंडळींच्या लक्षात हि गोष्ट येताच त्यांनी महाराजांना दुसऱ्या विवाहाचा आग्रह केला. पण अशा विवाहाने हेवेदावे व मत्सर उत्पन्न होऊन कुटुंब स्वस्थ कसे बिघडते, याची पूर्ण कल्पना त्यांना असल्याने तो आग्रह त्यांनी मानला नाही. फ्यामिली डॉक्टर टेंगशे यांनीही राणीसाहेबाच्या प्रकृती स्वास्थासाठी महाराजांनी एखाद्या उपस्त्रीचा स्वीकार करावा म्हणून सुचना केली. राजपरीवारात या विषयाची चर्चा चालू असतानाच कोण तरी चांगल्या कुळाची गरीब घरातील एक कोवळ्या वयाची रूपवती मुलगी त्यांच्या समोर उपस्त्री म्हणून उभी केली. तिच्या वया कडे पाहून महाराजांचे मन द्रवले आणि तिचा स्वीकार न करता तिचे आपल्या एका तरुण अधिकाऱ्याशी लग्न लावून दिले (संदर्भ - राजर्षी शाहू छत्रपती - एक समाज क्रांती कारक राजा - धनंजय कीर, पहिली आवृत्ती, मुंबई १९७९ पृ.१७३ )
                      पुढे आपल्या शरीर धर्माची गरज म्हणून महाराजांनी नर्तकी अथवा गायकी कुळातील प्रौढ स्त्रियांची उपस्त्री अथवा 'अंगवस्त्र' म्हणून निवड केली. महाराजांच्या आयुष्यात अशा ५/६ स्त्रिया एकामागून एक प्रमाणे येऊन गेल्याचे त्यांचे चरित्रकार सांगतात. महाराजांच्या खाजगी जीवनाचा त्रोटक वृतांत नजरे खालून घातला तर कोणालाही महाराजां वर विषय लंपटत्वाचा आरोप करता येणार नाही. ज्या काळात हिंदी संस्थानिक शेकडो सुंदर सुंदर स्त्रियांचे जनानखाणे बाळगत होते; सरदार-दरखदारच न्हावे तर गावच्या देशमुख- पाटीला पर्यंतचे लोक लग्नाच्या २-४ बायका आणि आपल्या (आर्थिक) कुवती अनुसार अनेक अंगवस्त्रे बाळगत होते ( आणि असे कारणे प्रतिष्ठेचे मानले जात होते) त्या काळात शाहू महाराजांसारख्या संस्थानिकाने एकपत्नीत्वाचे पालन करून निसर्ग धर्मा साठी एखाद दुसऱ्या स्त्रीचा सहवास केला, तर त्या काळी ती नैतिक अधहपतनचि गोष्ट मानली जाण्याचे कारण न्हवते . पण शत्रूंनी या गोष्टीचा राईचा पर्वत केला, आणि बदनामीच्या अनेक कथा रचल्या.

प्रसिद्ध संशोधक व विचारवंत डॉ.य.दि.फडके यांनी महाराजांच्या चरित्रातील या विषयावर भाष्य केले आहे ते म्हणतात, " खरे म्हणजे एकापेक्षा अधिक स्त्रिया कडून शरीर सुख घेतल्या मूळे केवळ एखाद्याच्या मोठे पणाला उणेपणा येतो किंवा त्याचे कर्तुत्व डागाळते हा रूढ समाज मुळात चुकीचा आहे. इतिहास घडविणारे महापुरुषही अखेर हाडामासाची जिती जागती माणसेच असतात. प्रत्येक महान व्यक्ती साधू पुरुष असावी किंवा तिला विषय वासनेचे वावडे असावे हि अपेक्षा धरणे मुळातच चुकीचे आहे याचे भान अनेकांना राहत नाही. अशा परिस्थितीत भारतातील सत्ताधीशांच्या व अन्य कारणा मूळे लोकांना वंद्य वाटणाऱ्या व्यक्तींच्या लैंगिक जीवना विषयी खोटया नाट्या पण सुरस कथा त्यांचे शत्रू सांगत फिरतात. सर्व सामान्य माणसास वंद्य वाटणारी व्यक्ती लोकांच्या मनातून उतरावी यासाठी तिचे चरित्र हनन करण्याची चाल विरोधक नेहमीच खेळतात " (संदर्भ - शाहू छत्रपती आणि लोकमान्य - या.दि.फडके , पुणे, १९८२.पृ.१५०-१५१)


ह्या भाष्याच्या अनुरोधाने विचार करता शाहू महाराजांना बदनाम करण्या साठी त्यांच्या हित शत्रूंनी रचलेल्या सुरस कथा म्हणजे महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजास वंद्य असणाऱ्या व्यक्तीचे चारित्र्य हनन करण्याची तेढी चाल होती, असाच या विषयीचा अन्वयार्थ काढावा लागतो. आणि मग 'दिन दुनियेचा वाली' असणाऱ्या महाराजांच्या आकस्मित निधनाची वार्ता कानावर पडताच महाराष्ट्रातील बहुजन समाजात, सर्वत्र हाहाकार' उडून त्यांनी 'रक्ताची आसवे' गाळली, त्याच वार्तेने आनंदाने बेभान होऊन त्यांच्या हित शत्रूंनी मुंबई, वसई, सातारा आदी ठिकाणी रस्तोरस्ती पेढे वाढले, सत्य नारायणाच्या पूजा साजऱ्या केल्या आणि आपल्या मनातील जहरी भावनेस वाट मोकळी करून दिली. (संदर्भ - शाहू छत्रपती आणि लोकमान्य - या.दि.फडके , पुणे, १९८२.पृ.३००-३०१ ; विजयी मराठा १५ मे , २९ मे १९२२ रोजीचे अग्रलेख - श्रीपतराव शिंदे. )
=================
एकंदर ऐतिहासिक माहिती हि राजर्षी शाहू स्मारक ग्रंथातून - राजर्षी शाहू छत्रपती ; जीवन व कार्य (खंड -१) ह्या जयसिंग राव पवार ह्यांनी लिहिलेल्या खंडातील ३१ वे प्रकरण "राजर्षी शाहू महाराज आणि त्यांची बदनामी करणाऱ्या शत्रूच्या कुटील कारवाया" पान क्रमांक २४१- २५० ह्यातून घेतलेली आहे..

=================
अश्या प्रकारे इतिहासाचा सखोल मागोवा घेतल्या नंतर आज जे शाहू राज्यां बद्दल विकृत विनोद शाहू महाराजांची घसरगुंडी च्या स्वरूपातून कुजबुजले जातात..त्या मागे नेमका कोणाचा व कसा हाथ आहे ते स्पष्ट झाल्या वाचून राहत नाही...ह्याचा अर्थ आत्ता ब्राह्मण समाजा बद्दल पेटून उठणे अथवा आत्ता ह्याचा बदला घेणे असा होत नाही..अथवा तसे काही करूही नये...हि एक प्रवृत्ती आहे आणि अश्या प्रवृत्तीचे माणसे हि त्यांच्या स्वकर्मानेच शिक्षा उपभोगतात...त्या मूळे बदल्याच्या भावनेने भडकून न जाता.. शांत चित्ताने ह्या सर्वावर विचार करावा.. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या आजू बाजूला जर कोणी अशी कुजबुज करत असतील तर त्या लोकांना ठणकावून सांगावे..हा सगळा इतिहास त्यांना समजावून सांगावा..आपलेच दात आणि आपलेच ओठ असा प्रकार झालाय...हे विनोद कुजबुज करणारीही आपलीच मंडळी आहेत..त्यांना सुधरवा...आपल्यातीलही काही जन हे विनोद कुजबुजत असतील..त्यांनीही ते थांबवावे... बहुसंख्य लोक ह्या बाबत जागृत झाले कि मग मोजक्या लोकांनी रचलेली कारस्थाने कधीच सफल होऊ शकणार नाहीत... १०० वर्षे झालीत तरीही राजर्षी शाहूंची बदनामी चालूच आहे... ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांनाच मुळात ते उमगत नाहीये..स्वतःवर स्वतःहूनच अन्याय करून घेणे चालू आहे...स्वताहून स्वतःच्या शरीराचा लचका तोडण्या सारखी कृती आहे हि..आपण सगळे शाहू रायाचे वंशज..आपल्याच पूर्वजाला आपणच बदनाम करतो...स्वतः विनोद कुजबुजत नसाल तरीही कुठे ते विनोद कानावर येऊनही जर तुम्ही त्यास प्रतिकार करत नसाल तर ते विनोद तुम्ही केल्या सारख्या समानच आहेत...
                                 खुद्द आंबेडकर वादी मंडळी शाहुंबद्दल ब्र देखील खपवून घेत नाहीत..पण तेच खुद्द शाहूंचे वंशज असलेले मराठे मात्र हे असले विनोद कुजबुजत असतात..त्यांना ह्याची जाणीवच नाही..निदान आंबेडकर वाद्यांना ह्या बाबतीत पूर्ण ज्ञान नसले तरीही ते थेट आमच्या महापुरुषां विरोधी आम्ही काहीच ऐकूनही घेणार नाही असा पवित्रा घेतात..पण तेच इतर बहुजन मात्र स्वतः कुजबुजण्यात धन्यता मानतात तर काही खी खी हसण्यात धन्यता मानतात, तर काही जन आपल्याला काय माहित नाही अश्या सबबी देण्यात धन्यता मानतात...माहित नसेल तर माहित करून घ्या...सतर्क राहा..असल्या विनोदांना आत्ता अग्नी द्या..
ह्या अनुषंगाने ब्राह्मणी प्रसार माध्यमांचा ब्राह्मणेतरा वर असलेल्या प्रभावाचेही दर्शन होते त्या काळात ब्राह्मणी प्रसार माध्यमांनी केलेल्या प्रसाराचा १०० वर्षा नंतर अजूनही प्रभाव ब्राह्मणेतरा वर तसाच आहे..आजही काही वेगळे घडत नाही...आजच्या प्रसार माध्यमाचाही तेवढाच प्रभाव सर्व सामान्यां वर पडतोय...रामदासांचे गुरु पद हाही त्याचाच एक भाग..दादोजींचे गुरु पद हेही त्याचेच उदाहरण..शंभू राजांची चुकीच्या पद्धतीने रंगवलेली रंगेल आणि रगेल अशी छबी..हि देखील त्याचीच परिणीती..काय माहित..आज जी इतिहासातील शिर्के, खोपडे , पिसाळ ह्यांच्या गद्दारीची जी उदाहरणे दिली जातात त्या मागेही असेच काहीसे राजकारण तर नाही न..प्रसार आणि सत्य ह्यात किती तफावत असू शकते ह्याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे शंभू राज्यांची बदनामी, आणि शाहू महाराजांची बदनामी..त्या मूळे मित्रांनो वाचा...गैर समज दूर करून घ्या..आणि समाजात पसरत चाललेल्या चुकीच्या इतिहासाला आळा घाला...

हिंदू धर्म रसातळास जाण्याची कारणे, प्रबोधनकार ठाकरे

बुकबाजी हे प्रबोधनकारांचं मोठं व्यसन आणि इतिहास हा आवडता विषय. त्यामुळे या विषयातली सगळी महत्त्वाची पुस्तकं त्यांच्याकडे असत. उत्पन्न बेताचं असतानाही त्यांनी कधी त्यात पुढेमागे पाहिलं नाही. अशाच प्रसंगी त्यांना `डिक्लाईन अँड फॉल ऑफ धी हिंदूज’ हा एस. सी. मुकर्जी यांचा ग्रंथ सापडला. त्यांच्या भारतीय इतिहासाच्या लाईनवर हा ग्रंथ फिट बसत होता म्हणूनच त्यांनी याचा अनुवाद मराठीत मोठ्या आवडीने केला आणि छापला.

-------------------------------------

हिंदुजनांचा –हास आणि अधःपात बॅरिस्टर एस. सी. मुकर्जी कृत THE DECLINE & FALL OF THE HINDOOS नामक इंग्रेजी ग्रंथाचा मराठी अनुवाद अनुवादक, मुद्रक व प्रकाशक – केशव सीताराम ठाकरे प्रबोधन मुद्रणालय, ३४५ सदाशिव पेठ, पुणे शहर किंमत एक रुपया हे पुस्तक श्रीयुत केशव सीताराम ठाकरे यांनी प्रबोधन मुद्रणालय, ३४५ सदाशिव पेठ, पुणे शहर येथे छापून प्रसिद्ध केले. या मराठी अनुवादाचे व त्यावरून इतरदेशी भाषात भाषांतरे करण्याचे सर्व हक्क श्री. ठाकरे यांच्या स्वाधीन आहेत पुस्तके मागविण्याचा पत्ता व्यवस्थापक, प्रबोधन कचेरी, ३४५ सदाशिव पेठ, पुणे शहर.

-------------------------------------

ग्रंथ परिचय मराठी पेहरावात म-हाठ्यांच्या हाती पडणारा हा निबंध प्रथम इंग्रजी भाषेत कलकत्त्याच्या इंडियन रॅशनॅलिस्टिक सोसायटीच्या सभेत तारीख ७ सप्टेंबर १९१९ रोज लेखक श्रीयुत एस. सी. मूकरजी, बार-अट-लॉ यांनी वाचला. सोसायटीच्या मासिक बुलेटीनच्या नोव्हेंबर १९१९च्या अंकात तो छापून प्रसिद्ध झाला. यातील विचारांचा विद्वज्जनात एवढा गौरव झाला की,कलकत्त्याच्या इंडियन डेली न्यूज पत्राच्या संपादकांनी हा निबंध ५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत आपल्या दैनिकाच्या अंकांत हप्त्याहप्त्याने छापून पुनर्प्रकाशित केला. त्यामुळे या निबंधाला इतकी विलक्षण मागणी आली की अखेर इ. रॅ. सोसायटीला तो पुस्तक रूपाने प्रसिद्ध करावा लागला. भारतमहर्षि डॉ. सर पी. सी. रॉय यांनी या निबंधाला प्रस्तावनेचा आशीर्वाद देऊन, ``भरतखंडाच्या पुनरुज्जीवनाचा खास संदेश’’ अशी त्याची सूत्रबद्ध स्तुती केल्यानंतर, प्रस्तावनेदाखल अधिक कोणी काही लिहिण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ``रंगविण्या लिलि धजला’’ या शेक्सपियरोक्ती प्रमाणे स्वतःस उपहासास्पद करून घेणेच होईल. प्रस्तुत निबंधाचे इंग्रजी पुस्तक `डिकलाईन अँड फॉल ऑफ धी हिंदूज’ सन १९२० साली माझ्या वाचनात आले आणि त्याचा मराठी अनुवाद करण्याची प्रेरणाही त्याचवेळी माझ्या मनात आली. माझे परममित्र बॅरिस्टर मुखर्जी (पाटणा, बिहार) यांना हा मनोदय कळविताच, त्यांनी कसल्याही प्रकारच्या अटी न घालता मराठी अनुवादाची शुद्ध दार भावनेने आणि राष्ट्राभिमानाने परवानगी दिली. भाषांतरास सुरुवात केली आणि प्रबोधन पाक्षिकातून त्याच हप्ते छापण्यास १९२१ साली आरंभ केला.
हिंदुसमाजाच्या काळजाला झोंबलेल्या भिक्षुकशाही ब्राह्मणांच्या मुर्दाड स्वभाव-प्रवृत्तीची या ग्रंथात दिलेली इतिहासप्रसिद्ध चित्रे अत्यंत मननीय आहेत. हिंदुजनांच्या आत्मोद्धाराच्या प्रत्येक सुधारक चळवळीला जमीनदोस्त करण्याच्य कामी भिक्षुकशाही कधी नमते, कधी वाकते, तर कधी जुळते घेऊन, जरा थोडी संधी सापडताच, एकदम उचल खाऊन, एक दात पाडल्याचा सूड बत्तिशी ठेचून कसा उगविते, हेही अनेक उदाहरणांवरून स्पष्ट दिसून येते. भिक्षुकू वर्चस्वस्थापनेची कारस्थाने पार पाडण्यासाठी परक्यांना हाताशी धरून, वेळी त्यांचे पाय धरून, ब्राह्मणेतर स्वदेशबांधवांना चिरडून टाकण्याचे भिक्षुकशाहीने केलेल प्रयत्न, रजपूत विरुद्ध बौद्ध, शंकराचार्य विरुद्ध बौद्ध इत्यादी प्रकरणात निःसंदिग्ध पुराव्यानिशी आढळून येतात. बौद्धधर्माच्या पाडावाची भिक्षुकी कारस्थाने चालू मन्वंतरात विचारी वाचकांना नानाविध विचारांचे ब्रह्मांड खुले करून दाखवतील, यात मुला मुळीच शंका वाटत नाही. विशेषतः पृ. १५८वर बौद्धांच्या ससेहोलपटीतूनच आद्यशंकराचार्यांनी हिंदू समाजात अस्पृश्यता प्रथमच निर्माण केली, हा इतिहास विचार करण्यासारखा आहे. कितीही आणि कसाही विचार केला तरी ``जातीभेदाचा पुरस्कार करणारी सामाजिक क्षेत्रांतली भिक्षुकशाही म्हणजे हिंदुस्थानाला जडलेली व्याधी होय.’’ हा भारतमहर्षि प्रफुल्लचंद्र रॉय याचा रोखठोक अभिप्रायच सर्वत्र प्रत्ययास येत आहे. असा स्थितीत या हिंदुभारताच्या आत्मोद्धाराचा मार्ग कसा चोखाळावा, हे प्रस्तुत ग्रंथाच्या वाचन मनन निदिध्यासाने अखिल हिंदू भगिनी बांधवांना नीट कळेल, असा मला भरवसा आहे.प्रबोधन कचेरी ३४५ सदाशिव पेठ, पुणे शहर. ता. १ डिसेंबर १९२६ देशबांधवांचा नम्र सेवक केशव सीताराम ठाकरे
सारांश, भिक्षुकशाही म्हणजे आमच्यावर्तमान दुर्दैवी अधःपाताची खाणचम्हटली पाहिजे. ज्या तोंडाने राजकीय हक्क आणि ब्रिटिश नागरिकत्वाचे अविछिन्न अधिकार मागण्यासाठी आम्ही मोठमोठ्याने वल्गना करतो, त्याच तोंडाने अवनत देशबांधवांच्या बुचाडून घेतलेल्या हक्कांना परत देण्याविशयी अथवा त्यांच्यावरील आपल्या सत्तेचा चाप लवमात्र ढिला करण्याविषयी, आम्ही कधी क ब्र तरी काढला आहे काय? वातावरणात आता लोकशाहीचे मेघ जमू लागले आहेत. सारे वातावरण लोकशाहीने दुमदुमू लागले आहे. अशा वेळी आमच्या अवनत देशबांधवांना जर आम्ही हात देऊन वर उचलणार नाही, उदार मनाने सामाजिक क्षेत्रांत योग्य ठिकाणी त्यांची स्थापना करणार नाही, तर राजकीय हक्कांसाठी नित्य चालणारा आमचा हलकल्लोळ म्हणजे पोकळ वल्गनांचा शुद्ध तमाशा होय, असे मानण्यास काही हरकत नाही.श्रीयुत मुकर्जी हे उच्चजातीय ब्राह्मण आहेत. तथापि हिंदू जनांचा –हास व अधःपात यांच्या कारणांची तात्विकदृष्ट्या मीमांसा करताना त्यांनी आपली सहृदयता आणि राष्ट्राभिमानाची तडफ अत्यंत उत्कटतेने व्यक्त केलेली आहे. माझ्या सर्व देशबांधवांनी प्रस्तुत प्रबंध अवश्य विचारात घ्यावा, असी माझी शिफारस आहे. पी. सी. रॉय धी युनिवर्सिटी सायन्स कॉलेज २१ डिसेंबर १९१९

हिंदुस्थानाला इतिहासच नाही, किंवा इतिहासविषयक बुद्धी कधी आमच्यात परिणतच झाली नाही. पण ही गोष्ट अजिबात खोटी आहे. उठल्यासुटल्या आमच्यावर असला आरोप करणा-या शहाण्यांना आमचा इतिहास अभ्यासण्याइतकी प्रवृत्ती नसते किंवा संशोधनाची अक्कलही नसते. पुराणांची गोष्ट सोडून द्या. रामायण महाभारत ही आमची राष्ट्रीय महाकाव्ये मुळातून वाचण्याची कितीकांनी तसदी घेतलेली असते बरे? आमच्या देशाचा इतिहास व भूगोल, त्याचप्रमाणे प्रसिद्ध प्रसिद्ध राजघराणी व ऋषीकुळे यांच्या वंशांची माहिती पुराणात चांगल्याप्रकारे आढळते. अर्थात प्राचीन भारताचा संपूर्ण इतिहास व भूगोल पुराणग्रंथांत आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त होणार नाही. तथापि अजून बराच इतिहासाचा भाग उकरून काढावयाचा आहे. त्याचे बरेचसे तुकडे आमच्या धर्मग्रंथांतून व स्मृत्यांतून त्याप्रमाणे चिनी, तिबेटी, ब्रह्मी, सयामी आणि सिंगाली असा अनेक भाषांच्या ग्रंथात इतस्ततः पसरलेले आहेत. त्यांचे एकीकरण केले पाहिजे. शोधा म्हणजे मिळेल, या सूत्रानुसार आपले प्रयत्न झाले पाहिजेत. परंतु या निंदकांच्या निष्कारण निंदेमुळे तुमचे मायदेशावरील प्रेम विश्वास व शोधक वृत्ती यांचे पाय लटपटू देण्याचे काहीही प्रयोजन नाही. आमचे आक्षेपक आणखी असे सांगतात की या देशांत अनेक मानववंशांचे समूह राहत असल्यामुळे हिंदुस्थान ही नुसती भौगोलिक संज्ञा आहे. यावर माझा त्यांना जबाब असा आहे की, अहो! तुम्ही आंधळे आहात; तुमचे डोळेच फुटल्यामुळे भैदांतच अभेदाचे वैभव तुम्हाला कसचे दिसणार? काश्मीरपासून कामोरीनपर्यंत, जलालाबादपासून चितागांगपर्यंत आणि पलीकडे कुणीकडेही पाहा सर्वत्र हिंदू संस्कृतीचाच अंमल पसरलेला आहे. ही संस्कृती सध्या जरी अवनत स्थिती आहे तरीदेखील आमच्या अभिमानापुरतदीही काही लहानसहान गोष्ट नव्हे आजला हिंदुस्थान आणि हिदुत्व ही दोन्ही संक्रमणावस्थेत आहेत. मध्ययुगात त्यांच्या अंगावर वाढलेलेपापुद्रे आज खळखळ कोसळून पडण्यास सुरुवात झाली आहे; आणि आपण स्वतःशी किंवा आपल्या मायदेशाशी जर प्रतारणेचे पातक करणार नाही तर आत्मशुद्धीचा व आत्मोद्धाराचा उषःकाल व्हायला काही वेळ लागणार नाही. अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा सर्वत्र अंधार पसरल्यामुळे निरनिराळ्या भेदांची पिशाच्चे आज आपणांस भेवडावीत आहेत. परंतु आपण सर्व भारतवासियांनी प्रेमाने व निःस्वार्थ बुद्धीने खांद्याला खांदा भिडवून राष्ट्रकार्याची लगबग केली, तर ज्या शास्त्रीय ज्ञानाची व व्यापक दृष्टीची आपण मार्गप्रतीक्षा करीत आहोत, त्यांना बरोबरच घेऊन उगवणा-या प्रबोधनाच्या सूर्यप्रकाशामुळे त्या भुतांच्या भूतचेष्टा आपोआपच नष्ट होतील. `जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसि’ हा उज्वल ध्येयमंत्र आमच्या अंतःकरणावर ठसठशीत कोरलेला
सताही मातृभूमीच्या प्रेमाच्या बाबतीत इतर राष्ट्रांनी आमच्यावर वरचढ करावी काय? हे जर खरे असेल, तो मंत्र आमच्या हृदयातून साफ पुसून गेला असेल आणि आमच्या मातृभूमिप्रेमात खरोखरच जर विरजण पडले असेल तर मग - तर मग काय? – झाला, संपूर्ण अधःपातच झाला! या लोकी मोक्ष तर नाहीच, पण परलोकी सुद्धा नाहीच नाही! मला एक दिवस असे स्वप्न पडले की मला कोणी उचलून हिंदमातेच्या मांडीवर ठेवले. मी तिच्याकडे पाहतो तो तिला मूर्छना येत असलेली दिसली. मी चटकन उठून प्रेमाच्या झटक्याने तिला पाठुंगळी मारली आणि चिंताक्रांत स्थितीत दवाखान्याकडे धावत सुटलो. तेथे बरेच डॉक्टर लोक होते. माझ्या आईला त्यांना काही उपचार करावा म्हणून मी तिला त्यांच्यासमोर टेबलावर हळूच निजविले. ते काही उपचार करणार तोच तिने एक दीर्घ श्वास सोडला आणि मी जागा झालो. आज आपल्यापुढे मी ठेवीत असलेल्या ह्या निबंधाचे लेखन मी जागा होताच तात्काळ हाती घेतले. आपल्या अधःपातासंबंधाने विचार करताना काही आध्यात्मिक बिनमुर्वत तत्त्वांचा आपणांस अवश्य विचार करणे प्राप्त आहे. या तत्त्वांचे मी दहा विभाग पाडले आहेत. ते असे – (1) `जमका अजब तडाखा’ जसा कोणास टालता येणे शक्य नाही. तसे कर्मन्यायाच्या चरकातून कोणास निसटचा येणे शक्य नाही. तुमचा दोष कितीही क्षुल्लक असो, त्याबद्दल यथातथ्य प्रायश्चित्त द्यायला कर्मन्याय तुम्हाला वाटेल तेथून हुडकून काढील. (2) जेस पेरावे तसे उगवते. (3) जसे करावे तसे भरावे (4) राष्ट्राचे जीवित असो किंवा व्यक्तीचे जीवित असो, त्याला अचेतन अशी स्थिरावस्था प्राप्त झाली की त्याच सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. (5) सत्य नीति आणि न्याय मिळून धर्म होतो. या धर्मावरच मानवी समाजाचे धारण होत असते. (6) ढोंगीपणाच्या दंभोक्तीची सूत्रे अनीतिमत्तेची फार वेळ तरफदारी करू शकत नाहीत. किंवा नीतिमत्तेचे पांघरलेले सोंग या सूत्रांना फार वेळ झेपतही नाही. (धर्माच्या नावावर रचलेली दांभिक सूत्रे नीतिमत्तेचे समर्थन करू शकत नाहीत.) (7) धर्मपालनाच्या भरती ओहोटीप्रमाणे राष्ट्रांचे व साम्राज्याचे अस्तोदय होत असतात. (8) या जगात केलेल्या पातकाच्या प्रायश्चित्तापासून सवलतीची सूट मिळविलेले एकही राज्य, राष्ट्र, जात अथवा व्यक्ती सापडणे मुष्कीलीचे आहे. (9) काळाचे चक्र हळूहळू फिरते; कोठच्या दिशेने वारा येऊन त्याला केव्हा कशी गति मिळेल त्याची कोणाला दाद नसते, परंतु त्याची घरटी एकदा फिरू लागली की त्यात सापडेल त्याचे मात्र वस्त्रगाळ पीठ पडते. (10) घराचे वासे एकमेकांशी आडवे तिडवे वागू लागले की त्या घराचा डोलारा जमीनदोस्त झालाच समजावे.
हिंदुजन प्रामाणिक, सत्यप्रिय आणि कायदा मानणारे असून, ते हत्या करीत नाहीत किंवा मादक दारूही पीत नाहीत. हर्षानंतर झालेले मगध देशाचे सेन राजे आणि गौड देशाचे (बंगालचे) शशांक राजे हे सर्वस्वी आपल्या ब्राह्मण मंत्र्यांच्या ओंजळीने पाणी पिणारे निपजले. अर्थात ते आपल्या बौद्ध प्रजेला तलवारीच्या धारेवर धरू लागले. सरकारी देणग्या बंद करण्यात आल्या, तेव्हा नालंदाची जगप्रसिद्ध बौद्ध युनिव्हर्सिटी रसातळाला गेली. मोठमोठे मठ, भिक्षुणींची वसतीगृहे, संघ मोडून टाकण्यात आले तेथली सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली. बौद्ध जात मानीत नसत, म्हणून त्या `नि-जात्या’ची सर्वजण टर उडवून छळ करीत. ब्राह्मणी धर्माच्या पुस्तककर्त्यांना तर इतका चेव आला की त्यांनी बौद्ध संस्कृतीच्या सर्व कलांची, वाङ्मयाची, असेल नसेल त्याची राखरांगोळी करण्याचा धूमधडाका चालविला. फार काय, पण बौद्धजनांना पूज्य व वंदनीय असलेल्या पवित्र वस्तू व चिन्हे त्यांनी भ्रष्ट केली; कोठे त्याची अवहेलना व अपमान केला आणि काही तर नाश करून टाकल्या. ८व्या व ९व्या इसवी शतकात सा-या हिंदुस्थानभर शेकडो लहान लहान राज्ये पसरली होती. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. मध्यवर्ती राजकीय नियंत्रणाखाली सत्ता अजिबात नष्ट झालेली. अशा अवस्थेत परकीय सिथियन लोकांच्या टोळ्यांवर टोळ्या येऊन रजपुतान्यावर कोसळल्या आणि तेथल्या आर्य राज्यांना उखडून टाकून, त्यांच्या जागी कायमच्या वस्ती करून बसल्या. या परक्या पाहुण्यांशी मिळते घेणे भागच होते.*१६ हे रजपुतानी सिथियन जेते ब्राह्मणी धर्माशी मित्रत्वाच्या नात्याने वागत आहेत, असे आढळून येताच, भटाब्राह्मणांनी त्यांच्याशी लगट करून, त्या सर्वांना हिदू धर्माची दीक्षा दिली आणि त्यांच्या गळ्यात यज्ञोपवितही अडकविले. हे सिथियन लोक जात्या बलाढ्य लढवय्ये असल्यामुळे, प्राचीन क्षत्रियांची जागा भरून काढण्यास हे सर्वतोपरी लायक आहेत, असे भिक्षुकशाहीने ठरवून टाकले. हिंदुधर्म हा कधीच मिशनरी धर्म नव्हता, असे म्हणणारे लोक खोटे बोलतात, हे यावरून स्पष्ट सिद्ध होत नाही काय? राजपुतान्यातले हे सिथियन वसाहतवाले म्हणजे हिंदुस्थानच्या इतिहासात गाजलेले सुप्रसिद्ध रजपूत होत. इ.स. ७१२त सिंधी मुसलमानांच्या स्वारीला या रजपुतांनी सामना देऊन पिटाळून लावले. या त्यांच्या हिंदसेवेच्या पहिल्याच यशस्वी धडाडीमुळे रजपुतांचा सर्व देशात मोठा गौरव झाला आणि तेव्हापासून राजसदृश असे उच्च वैभव प्राप्त झाले. दिल्ली आणि कनोज ही इतिहासप्रसिद्ध शहरेही त्यांच्या लवकरच ताब्यात गेली. त्यावेळचे रजपूत राजे व्यक्तीशः जरी रणशूर आणि बलाढ्य असत, तरी आतून ते सर्व अहंपणाने आणि परस्पर मत्सराने सडून गेलेले असत. त्यांची राज्ये लहान लहान व इतस्ततः पांगलेली असत. दळणवळणाची साधने व प्रवासायोग्य सडका यांचा पूर्ण अभाव सल्यामुळे, त्यांना परस्पर सहायकारी अशा संयुक्त सत्तेची घटना करता आली नाही. किंवा एखाद्या शत्रूवर संघटनेने चाल करून जाण्याइतक्या परिणामकारक शिस्तीची लष्करी व्यवस्थाही त्यांना लावता आली नाही. त्यामुळे त्या वेळी मुसलमानी स्वा-यांनी हिंदुस्थानात पोखरण घालण्याचा जो उपक्रम केला, त्याला सामना देण्याच्या कामी हे रजपूत पराक्रमी असूनही निरुपयोगी ठरले. फाजील स्तुतीपाठ आणि भरमसाट लाळघोटेपणा यात भिक्षुकशाहीचा ब्राह्मण फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. पराक्रमी रजपुतांची मर्जी संपादन करण्यासाठी भटाब्राह्मणांनी लवकरच एक नवीन युक्ती शोधून काढली. हिंदुत्व आणि यज्ञोपवित यांचा प्रसाद त्यांना आधीच मिळालेला होता. आता, रामायण आणि महाभारतादि काव्येतिहास ग्रंथातल्या आणि पुराणांतल्या ख-याखोट्या प्राचीन क्षत्रिय राजघराण्याशी व देवदेवतांशी या अनेक रजपूत राजांचे संबंध जोडणा-या बनावट वंशावळींची भेंडोळी* १७ ब्राह्मणांनी तयार करून, त्या सर्वांना अगदी खूष करून सोडले. या फाजील प्रतिष्ठेने रजपूत राजे मनस्वी फुगून गेले. त्यांच्याभोवती पसरलेल्या सर्वसंपन्नतेमुळे ते चैनबाजी व ख्यालीखुशालीत दंग झाले. अशा स्थितीत आपल्या दारिद्र्यग्रस्त प्रजेची हालहवाल काय आहे, हे या खुशालचेंडू राजांना कसे दिसावे? आणि दिसले तरी त्यांना का पाहावे? नाना प्रकारच्या विकार विकल्पात मग्न असणा-या या रजपूत राजांची मने ब्राह्मणांनी बौद्धजनांच्या विरुद्ध हवी तशी कलुषित करून खवळून सोडली. या चिथावणीखोर ब्राह्मणांत, रजपुतांना अत्यंत पूज्य असलेल्या, आद्यशंकराचार्यांसारखा जाडी प्रस्थानेच पुढाकार घेतल्यावर काय होणार नाही? इ.स.७५०त दक्षिण हिंदुस्थानात कुमारील भट्ट नामक ब्राह्मण धर्ममार्तंडाने बौद्धांचा नायनाट करण्याचा पायंडा घालून ठेवलेला होताच. इ.स.८३०मध्ये श्रीशंकराचार्यांनी त्याच पायंड्यावर पाऊल ठेवून, रजपूत राजांची मने बौद्धांविरुद्ध खवळून सोडण्याची कामगिरी हाती घेताच, काश्मीर, नेपाळ, पंजाब, रजपुताना आणि गंगा-यमुना नद्यांमधल्या बिहारादी उत्तर-पश्चिम व मध्य हिंदुस्थानच्या सर्व प्रदेशांतून सर्रास बौद्धजनांच्या छळांचा आणि ससेहोलपटीचा भयंक्र उपक्रम, रजपूत राजांनी आणि त्यांच्या ब्राह्मणी – हिंदू सहाय्यकांनी सुरू केला. बिचा-या बौद्धांची स्थिती, या वेळी मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी होती. त्यांची खेडी उद्ध्वस्त करण्यात आली. घरेदारे जाळली लुटली गेली. बायकांची अब्रू घेण्यात आली. पुरुष आणि मुलांना कोठे हद्दपार केले, तर कोठे त्यांची सर्रास कत्तल करण्यात आली. अशा या हलकल्लोळातून जे बौद्धजन कसे तरी लपूनछपून वाचले, त्यांना समाज व व्यवहार-बहिष्कृत करून, लोकवस्तीपासून पार दूर पिटाळून लावले. अर्थात त्याना कमालीतली कमाल नीच अवस्था प्राप्त झाली. उदरनिर्वाहासाठीसुद्धा त्यांना साध्या माणुसकीला साजेशोभेशा सामान्य शिष्ठतेचीही बदी करण्यात आली. आज आमच्या डोळ्यांपुढे वावरणारे हारी, डोम, मच्छी, चांभार, केवरा, बागडी, नामशूद्र, महार, धेड, मांग इत्यादी अस्पृश्य जनांचे संघ या छळवाद होऊन बहिष्कृत पडलेल्या बौद्धजनांचेच अवशिष्ठ भाग आहेत. कुमान नेपाळ इकडे हल्ली ज्या दंतकथा, गोष्टी व इतिहास ऐकण्या वाचण्यात येतो, त्यावरून बौद्धांच्या छळात खुद्द शंकराचार्य आणि त्यांचे अनुयायी यांचा प्रत्यक्ष संबंध किती होता, हे स्पष्ट दिसून येते. खुद्द शंकराचार्यांच्या आज्ञेवरून कथूरिया राजांनी गरवाल कुमान आणि नेपाळांतून बौद्धांना पार पिटाळून लावले. त्यांचे मोठमोठे मठ वगैरे होते. ते सारे शंकराचार्यांना दान दिले व त्यावर त्यांच्या अनुयायांची स्थापना केली. त्यांचे वंशज आजही त्या मठांचा उपभोग घेत आहेत. शंकाराचार्यांनी बौद्ध भिक्षूंना मुद्दाम पशुयज्ञ करावयाला लावले आणि ब्रह्मचर्य व्रताच्या संकल्पाने राहणा-या भिक्षु, भिक्षुणींवर विवाहाची बळजबरी केली. महात्मा गौतम बुद्ध हा महान योगी पुरुषोत्तम होता, हे सर्वश्रुतच आहे. तो निर्वाणपदाला गेल्यानंतर अनेक शतकांनी, त्याच्या अनुयायांना त्या दिव्य महात्म्याचे काही सद्गुण आणि त्याच्या मूर्तीची प्रतिमा चिंतनासाठी, योगधारणेसाठी किंवा एखाद्या साधनेसाठी, दृष्टीपुढे ठेवणे, सोयीचे व अगत्याचे वाटू लागले. तक्षशिला येथील बौद्ध महापाठशाळा म्हणजे त्या वेळी महायान पंथाचे आद्यपीठ समजली जात असे. त्या पाठशाळेने महात्मा बुद्धाच्या मूर्तीच्या प्रतिमेशिवाय आणखी कमळ व सहा योगचक्रे चिंतनात आणण्याची शिफारस केली. तक्षशिला महापाठशाळेचा मुख्य अध्यापक सुप्रसिद्ध तत्त्ववेत्ता नागार्जुन, त्याचप्रमाणे इतर प्रोफेसर, शिक्षक, ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट वगैरे मंडळी ज्या या चिन्हांच्या केवळ कल्पनाचित्रांवर चिंतन करीत, त्याच चिन्हांची प्रत्यक्ष दगड, माती व धातूंची चित्रे चिंतनार्थ उपयोगात आणण्याचा उपक्रम गांधार येथील महापाठशाळेत सुरू झाला. याचा परिणाम असा झाला की बुद्धाचे पुतळे आणि योगचिन्हांची कोरीव दगडी चित्रे यांचा सर्व बौद्ध मंदिरात, मठात आणि संघात सर्वत्र सपाटून प्रसार झाला. जेथे जेथे म्हणून बौद्धांची वसती असे, अशा सर्व ठिकाणी बुद्धाचे पुतळे आजही आपल्याला दिसतात, याचे कारण हेच. शंकराचार्य हे शंकराचे कट्टे भक्त, चिंतनमग्न बुद्धाची पांढरी मूर्ती थोड्याशा फेरबदलाने शंकराची मूर्ती बनविणे. हे काम फारसे कठीण नव्हते. शंकराचार्यांच्या आज्ञेने जेथे जेथे अशा बुद्धाच्या मूर्ती आढळल्या, त्यांच्या गळ्यांभोवती सर्पांची वेटोळी खोदून बसवून, त्यांना शंकराच्या मूर्ती बनविल्या.*१८ बौद्ध धर्माचे हिंदुस्थानातून उच्चाटन व हकालपट्टी करण्याच्या कामी क्रूरतेचे, राक्षसीपणाचे, देवदेवतांच्या लुटालुटीचे आणि प्रतिष्ठाभंगाचे या पेक्षा अधिक काय काय भयंकर अत्याचार घडले असतील, त्यांची आज आपण नुसती कल्पनाच केलेली बरी. त्या काळी सहिष्णुता फार महाग झाली होती. खुद्द शंकराचार्यांना सुद्धा तिचे महत्त्व भासले नाही. आपल्या रुद्र दैवताप्रमाणे रुद्रावतार धारण करून त्यांना बौद्धशाहीची पाळेमुळे उखडून काढायची होती. बौद्धधर्माचा सत्यानाश केल्याशिवाय ब्राह्मणी धर्माची पुनर्घटना होणेच शक्य नाही, अशा कल्पनेचे वारे त्यांच्या अंगात संचारले होते. अशा रीतीने शंकराचार्य आणि भिक्षुकशाही यांचा जयजयकार झाला. अखेर त्यांनी जिंकली. पण या विजयाने साधले काय? छोट्यामोठ्या हिंदू राजांच्या असंख्य शिपुर्ड्यांना भाडोत्री मदतीला घेऊन, हिंदुजनतेचा केवळ पाठकणा असणा-या बौद्धांचे निर्मूलन करण्यात मिळालेल्या यशाचे परिणाम काय झाले, हे `आज तुमच्यावर फिरत असलेल्या परिस्थितीच्या वरवंट्याकडे पाहा’ असे काळच बोट दाखवून सिद्ध करीत आहे. कुमारील भट्ट आणि शंकराचार्यांसारखे धर्मक्रांतिकारक लोक आपल्या ध्येय-साधनाच्या आवेशाच्या भरात एक गोष्ट अज्जिबात विसरले की माणसे येथून तेथून सारी मर्त्य, त्यांनी हाती मिळालेल्या सत्तेच्या जोरावर शारीरिक बळजबरीने आणि जुलूम जबरदस्तीने कोणाची कितीही हानी केली, तरी दुधारी तलवारीप्रमाणे ती केव्हा ना केव्हा तरी उलट फिरून प्रत्याघाताचा सूड उगविल्याशिवाय राहणारी नाही. परंतु शंकराचार्य हे जसे ऊर्ध्व महत्त्वाकांक्षी होते, तसेच बुद्धिमत्तेत ते सवाई बृहस्पती होते. विध्वंसक शंकराप्रमाणे रुद्राचे संहारकार्य करूनच ते थांबले नाहीत, तर त्यांनी ब्रह्मदेवाचीही भूमिका घेऊन विधायक कार्य केले. ब्राह्मणी धर्माचे पुनरूज्जीवन करतानाच, त्यांनी अभिनव भारत (New India) निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हिंदुत्वाला नवजीवन दिले, असे म्हणतात. वेदान्ताची फोड करून त्यांनी हिंदुधर्माला नितांत रमणीय अशा एकतान तत्त्वज्ञानाचे स्वरूप दिले. परंतु हे तत्त्वज्ञान अतिसूक्ष्म व दुर्बोध असल्यामुळे, सामान्य जनतेच्या मनावर त्याची काहीच छाप बसली नाही. विशेषतः जनतेच्याच हाडारक्तामसाचे जे बौद्धजन त्यांच्या शंकराचार्यांनी ज्या कत्तली करविल्या व अखेर त्यांचा नायनाट केला, ते शल्य जनतेच्या हृदयात इतक्या तीव्रतेने सलत होते की शंकराचार्यांच्या कोणत्याही चळवळीत लोकांनी कसलाही भाग घेतला नाही. ते सर्व उदासीनच राहिले. तक्षशिला येथील महापीठाने जाहीर केलेल्या अभिनव बौद्धधर्माच्या तत्त्वांचा हिंदू जनतेच्या मनावर इतका परिणाम झालेला होता की. शंकराचार्यांचा वेदान्त सर्वत्र गर्जत असताही, लोकांत मूर्तीपूजनाचा जुना प्रघात धूमधडाक्याने चालूच राहिला. इतकेच नव्हे तर तंत्रमंत्रांचे सर्व भेसूर प्रकार ते पाळीत होते. यावरून हे स्पष्टच होते की अभिनव भारत निर्माण करण्याची शंकाराचार्यांची जी महत्त्वाकांक्षा होती ती सपशेल फसली. आचार्य समाधिस्थ झाल्यानंत त्यांच्या अनुयायांत जी अधःपाताची कीड पडली, ती पुढे दिवसेंदिवस भयंकर प्रमाणात वाढत गेली. विशेषतः आचार्यांनी मायावादाची जी कल्पना प्रचलित केली, तिचा हिंदू समाजावर इतका घाणेरडा परिणाम झाला की जिकडेतिकडे आढ्याला तंगड्या टेकणारे ऐदी आणि नशिबाला हात लावणारे निराशावादी यांचा सुळसुळाट झाला.*१९ राष्ट्रांतले लोकच जर दारिद्र्याने आणि बेबंदशाहीने चिरडलेले असतील; हव्या त्या जबरदस्ताच्या लुटारूपणाला बळी पडण्याइतकी हतबल बनले असतील; शिक्षणाच्या अभावामुळे त्यांच्या बुद्धीची वाढ खुंटलेली असेल; आणि अन्नाच्या दुष्काळामुळे त्यांचा शारीरिक जोम व सोशिकपणा नष्ट झाला असेल; तर कोणी कितीही मोठा बुद्धीवान व पराक्रमी पुरुष असला, तरी तो असल्या राष्ट्राला कसा आणि किती वाचवणार? हवी तशी उधळपट्टी, अधाशीपणा, बेफाम विषयासक्ती आणि मनसोक्त सुरापान या व्यसनांनी जर वाटेल त्या मनुष्याच्या अधःपात होतो, तर ज्या राष्ट्रांत अशी व्यसनाधीन माणसे बोकाळतात त्या राष्ट्रांचा का होणार नाही? १०व्या व १२व्या शतकांच्या दरम्यान रजपूत राजांमध्ये अगम्यगमनाचे व्यसन व आपापसातील द्वेष भयंकर भडकलेले होते. पुरुषांना स्त्रीजातीचा आदर मुळीच राहिलेला नव्हता. त्यांची कामासक्ती इतकी विलक्षण बेफाम झाली होती की स्त्रिया म्हणजे कामशांतीची यंत्र, यापलीकडे ते काही अधिक समजतच नसत. या पाशवी विषयलोलुपतेच्या अतिरेकाबरोबरच संपत्तीची हाव आणि स्वतःसाठी एखाद्या लहानशा राज्याचा स्वतंत्र प्रदेश मिळविण्यासाठी प्रत्येक रजपूत तरुण राजपुत्रांची सारखी धडपड सुरू असे. या तरुण राजपुत्रांच्या बापांच्या – रजपूत राजांच्या – जनानखान्यात राण्या आणि रखेल्या यांच्या टोळ्याच टोळ्या ठेवलेल्या असत. त्यामुळे कोणतीही एखादी राणी अथवा रखेली आपल्या त्या दण्डधारी पतिराजाची फारशी कसलीही किंमत बाळगीत नसे. हिंदुस्थानातल्या हिंदू राजांच्या दरबारात (राजवाड्यात) सरदारांच्या आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या बायका-मुलींना आमंत्रणे येत असत. हुजूरस्वारीची जिच्यावर नजर जाईल, तिची राजशय्यामंदिरात रवानगी झालीच पाहिजे. त्यासाठी हव्या त्या खटपटी लटपटी करण्यात येत असत. प्रसंगी, त्या स्त्रीची मनधरणी करण्यासाठी खुद्द पट्टराणीलाही, कसल्या तरी शिक्षेच्या अथवा मृत्यूच्या भयाने, कुंटणपणा पत्करावा लागे. स्त्रीजातीची इतकी बेइज्जत व अवहेलना होऊ लागल्यावर त्यांनी बंडाचा थैमान का करू नये? खुद्द हुजूर स्वारीच प्रेमपात्रांच्या शिकारीत सदैव बहकलेली, तर जनानखान्यातील राण्यांनीच पातिव्रत्याची कनिष्ठ जोपासना काय म्हणून करावी? त्यांचीही प्रेमपात्रे (लव्हर्स) असत. राजवाडेच जेव्हा या महापातकांनी आरपार सडून गेले. तेव्हा साहजिकच त्यांचा घाणेरडा सांसर्ग थेट सरदार दरकदार नागरिकांच्या घरांपर्यंत पसरत गेला. सरदार व दरकदरादि लोकांना राजाकडून जसे वागविण्यात येई. तसेच हे लोक आपल्या हाताखालच्या लोकांना व मित्रांना वागवीत. (म्हणजे राजाने जर सरदाराची बायको, मुलगी अथवा सून पळवून नेली, तर तो सरदार आपल्या समान दर्जाच्या, किंवा हाताखालच्या लोकांवर अथवा मित्रांवर तोच प्रयोग करीत असे. - अनुवादक) इतकेच नव्हे, तर राजाच्या कुकर्माचा यथातथ्य सूड उगविण्यासाठी हे सरदार लोक आपल्या कारस्थानाची सूत्रे थेट राणीवशात आणि जनानखान्यात वाटेल त्या राजपत्नी किंवा रखेलीपर्यंत नेऊन भिडवीत असत. छिनाल कंपूत एक म्हणच सुरू झाली होती – आणि त्या काळी छिनाल नव्हता कोण? – की हवी ती विवाहित अथवा अविवाहित तरुणी, तोंडाने नुसती शीळ घालताच गळ्यात येऊन पडते. आणि आमचे ब्राह्मण भटजी? समाजाच्या या भ्रष्ट अधःपतनाला त्यांनी काहीच का हातभार लावला नसेल? कदाचित ही वस्तुस्थिती सुधारण्याच्या अथवा तिला आळा घालण्याच्या कामी ते मतिमंद तर नव्हते बनले? 000 अखेर मजल येथवर आली. तरुण राजपुत्रांना स्वतंत्र प्रदेश आणि स्वतंत्र राज्ये यांच्या प्राप्तीची एवढी भयंकर लालसा उत्पन्न झाली की, त्यासाठी आपला राज्यकर्ता बाप शयनमंदिराकडे जात असता, किंवा अनेकांपैकी आपल्या एखाद्या आईसह निद्रावश असता, त्याचा खून करण्यालाही ते मागेपुढे पाहत नसत. विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या घाणेरड्या दुष्कृत्यात या आयांचे खुनशी राजपुत्रांना सहाय्य मिळत असे. शेकडो राण्या. आपल्या प्रौढ मुलाला राजपद मिळावे, अशी प्रत्येकीच इच्छा. पातिव्रत्य पातळ झालेले. निष्ठेचे शून. मग नीतिमत्ता तर कोणाच्या गावी नाहीच. त्यात राजकीय सत्तेची आसुरी लालसा! मग काय होणार नाही? अखेर, राजपुत्राने राजाचा खून करावा, राजपद बळकवावे, सावत्र आया, सावत्र भावांना ठार मारून टाकावे. ही सर्व राज्यांत एक राजमान्य रूढीच होऊन बसली. खुनशी राणीच्या दृष्टीने या रूढीत वावगे काहीच नसे. राजवधाचा प्रयोग पहिल्या प्रथम आपवेळल्या पुत्रानेच करावा, अशी तिची महत्त्वाकांक्षा असे. कारण, आपला पुत्र राजपदाधिकारी झाला की राजमातेचे थोर पद आयतेच आपल्या पायांशी चालून येते. बिनबोभाट खून पाडण्याचा आणखी एक प्रकार असे. आपल्या राजपतीची कामतृष्णा शांत करण्यासाठी राजपत्न्या कुंटिणीचे काम तर करीतच असत. पण आपल्या नव-याचा बिनबोभाट खून करण्याच्या वेळी, चांगल्या निरोगी स्त्रिया शयनमंदिरात पाठविण्याऐवजी, ब्राह्मण भिक्षुकांच्या आणि जडीबुट्टीवाल्यांच्या सहाय्याने एखादी गावभवानी वेश्या हुडकून काढीत. हे सहाय्यक त्या वेश्येच्या शरीरात जालीम विषाची योजना करून ठेवीत. त्यामुळे संभोगस्पर्श होताच राजा चटकन मरत असे, किंवा हातपाय झाडून राम म्हणीत. वाचकहो! मुसलमानाच्या स्वा-या बिनधोक या देशावर का झाल्या, आणि हिंदुस्थानच्या काळजाला त्यांना सफाईत हात का घालता आला, याची आणखी कारण-मीमांसा आपणापुढे केलीच पाहिजे काय? मुसलमानांच्या स्वा-या होण्यापूर्वीच अनेक वर्षे हिंदुसमाजपद्धती सपशेल सडकी कुजकी होऊन बसली होती. प्रतिकार करण्याची काहीही शक्ती तिच्यात उरलेली नव्हती. अंगावर शत्रू चालून आला असता, त्याला संघटित तोंड देण्यासाठी चटकन एकवटण्याची आमची शक्ती आणि बुद्धी ठार मेलेली होती. अर्थात असल्या निर्जीव सांगाड्याला जमीनदोस्त व्हायला काय पाहिजे? एक धक्का बसताच पत्त्याच्या किल्ल्याप्रमाणे धडाड सारा बाजार कोसळला! महाभारताच्या काळापासून आमच्या ब्राह्मणी संस्कृतीचा प्रवाह प्रगतीच्या मार्गाने एकसारखा वाहत होता, त्यामुळे सारी जनता दुधामधाच्या समृद्धीत सुखसंपन्न होती, पण अवचित हे म्लेंच्छ मुसलमान आले आणि त्यांनी आमच्या हिंदुराष्ट्राची धूळधाण केली; असा एक मूर्खपणाचा आणि चुकीचा समज अजून आमच्या लोकांत आहे. त्या बिचा-यांना वाटते की रामाचा आणि युधिष्ठिराचा काळ संपताच एकदम मुसलमानी टोळधाड या देशावर कोसळली आणि त्यांच्या रियासतीला सुरुवात झाली. मुसलमानांच्या या देशात प्रवेश होण्यापूर्वी शेकडो शतकांचा काळ गेला. हे त्यांच्या लक्षात येत नाही. परंतु मुसलमान येथे येण्यापूर्वी बराच काळ सारा हिंदू समाज भयंकर चिळसवाण्या स्थितीत भ्रष्ट होऊन नासला सडला होता, म्हणूनच मुसलमानांना हादेश काबीज करून येथे राज्यकर्ते म्हणून वसती करता आली. वाचक मित्र! हिंदू जनांचा –हास आणि अधःपात कसकसा होत गेला हे मी आतापर्यंतच दाखविले. यासाठी हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासाची रूपरेषा मला जशी दिसली तशी ती आपल्यापुढे मांडली आहे. विषय पडला मोठा आणि माझा निबंध पडला छोटा. तेव्हा गतेतिहासाचे हे सिंहावलोकन मला धावत्या दृष्टीने करावे लागले आहे, याची मला जाणीव हे. गेल्या अनेक शतकांच्या कटू अनुभवाने शहाणे होऊन, आपल्या समाजाची विशेष सौख्यकारक सुधारणा करण्यासाठी आज तरी हिंदुजन काही खटपट करीत आहेत काय? प्रगतीसाठी उत्क्रांतीचे त्यांचे काही प्रयत्न सुरू आहेत काय? मला तर कोठे काही दिसत नाही. आले घर ठाकठीक व्यवस्थेत बसविणारी एकही समाजोद्धारक चळवळ सध्या हिंदु समाजात चालू असल्याचे मला दिसत नाही आणि माझ्या ऐकिवातही नाही. 000 राष्ट्र दृष्टीने हिंदुस्थानचा पूर्वी जो अधःपात झाला, आणि आजही जो चालूच आहे त्यावर या निबंधासाठी मी आणखी विचार करण्यात मग्न असता, मला गाढ झोप लागली. भारतमाता माझ्यासमोर उभी आहे आणि ती मला एक निर्वाणीचा संदेश देत आहे, असे मला स्वप्न पडले, हा भारतमातेचा संदेश येथे नमूद करून, मी आपल्या निबंधाचे भारतवाक्य करतो. ``ज्या गोष्टी तुझ्या मनाला आज त्रस्त करीत आहेत, त्याच हिंदुस्थानच्या दुर्दैवाला मूळ कारण आहेत. पण त्यांचा निरास करण्याचे आजपर्यंत कोणाला सुचले नाही व साधलेही नाही. तुमच्या समाजाच्या एका भागाने दुस-या भागावर हवा तो जुलूम, हवा तो अन्याय करावा, आणि त्या अन्यायपीडित संघाने तोंडातून प्रतिकाराचा एक ब्रसुद्धा काढू नये, मिटल्या तोंडी सर्व आघात सहन करावे, या शेळपटपणातच तुमच्या राष्ट्रीय दुर्दैवाची खरी मख्खी आहे, हे तुला अजूनही उमगू नये ना? जुलूम जबरदस्तीखाली जेर झालेल्या कष्टी लोकांनीच टरारलेल्या मनगटाचा ठोसा ठणकावून आपल्या कष्टांचे परिमार्जन का करून घेऊ नये? ``तुमची ती काशी आणि तर यात्रा करण्याची क्षेत्रे नीट पाहा. अनन्वित पापाचरणांची घाणेरडी गटारे, मो-या, नरककुंडे होऊन बसली आहेत! असल्या या भिकार स्थळांच्या महात्म्याची कुंटणगिरी करणे, हेच का तुम्हा हिंदुजनांचे आजचे ध्येय? एकमेकांविषयी तुसडेपणा, आणि कोणाची कोणाला कधी कळ यायची नाही असला बेददर्दीपणा तुमच्यात बेफाम बोकाळल्यामुळे, आज असा कोणता सद्गुण आहे, कोणते पुण्यकर्म आहे, की ज्याचा या हिंदुस्थानात हरघडी चेंदामेंदा होत नाही? लोकांत मुळी जिव्हाळ्याची कळकळच उरली नाही. न्याय-अन्याय, खरे खोटे, योग्य अयोग्य पारखण्याची तुमच्या आत्म्याची मुळी संवेदनाच मेलेली. मग बाबांनो, सत्याकरिता आणि न्यायाकरिता प्राणार्पण करण्याची गोष्ट कशाला? `माझा मी मुखत्यार, तुला काय करायचे?’ ही ज्याची त्याची मगरूरी. या व्यसनापुढे सद्भिरुची, तडजोडीची उदार वृत्ती आणि परमतसहिष्णुतेचा दिलदारपणा यांची पार माती होऊन गेली आहे. ``तुमच्या स्वतःच्याच दुष्कर्माने निर्माण केलेल्या पापाचरणांचा उकिरड्यांच्या राशी प्रथम या देशांतून निपटून काढा. हे काम तुमचेच आहे. ते तुम्हालाच केले पाहिजे. धर्म, कला, वाङ्मय, राजकारण, व्यापार, धंदा, व्यवसाय, बाजार, इत्यादी सर्व क्षेत्रांत, फार काय पण लोकव्यवहाराच्या प्रत्येक बारीकसारीक बाबींत, जेवढे म्हणून लफंगे, लुच्चे, भोंदू, दांभिक टगे आढळतील, त्यांना ठिकच्या ठिकाणी ठेचल्याशिवाय सोडू नका. ``बुद्धिमान, संपत्तीमान, वजनदार, प्रतिष्ठित आणि लोकनेतृत्वाला लायक असे लोक हे प्रत्येक देशाचे जिम्मेदार (ट्रस्टी) होत. देशाचा त्यांच्यावरच सारा भार व भरवसा असतो. तुमच्या हिंदुस्थान देशात असले लोक काही स्वतःच पक्के लाळघोट्ये आहेत, तर काही लोकांच्या  लाळघोटेपणाच्या पचनी पडणारे आहेत. सत्य तत्त्वांऐवजी असल्या झब्बूंचे देव्हारे या देशात पुजले जात आहेत. पूजा करणारे आणि पूजा करून घेणारे, दोघेही वाममार्गी. ज्यांच्यापाशी काहीतरी हे त्यांनी त्यांच्यापाशी काहीच नाही त्यांच्यासाठी सर्वस्वाचा होम केला पाहिजे. बाबारे, आज या भारतमातेला स्वार्थत्यागी लोकांची गरज आहे. आत्मयज्ञ करणारे वीर मला पाहिजेत. लोकशिक्षणाचे आणि लोकनेतृत्वाचे काम ज्यांनी हाती घेतले आहे, त्यांनीच आत्मयज्ञाची शिकस्त केली पाहिजे. ``तुमचे धार्मिक विधी, आचारविचार आणि तुमच्या जातिविषयक रीतीभाती आज अगदी हलकट बनलेल्या आहेत. कारण त्यात सत्याचा लवलेशही उरलेला नाही. अरे, ब्राह्मणधर्माचे खरे स्वरूप म्हणजे काय समजता? निर्भेळ सत्याचा आणि स्वार्थत्यागाचा अर्क पाहिजे अर्क. तरच त्याला सनातन धर्म हे नाव शोभेल. असलाच धर्म तुमची भटे भिक्षुके तुम्हाला शिकवितात काय? मुळीच नाही. त्रिवार नाही. जेथे धर्म कशाशी खातात हेच त्यांना माहीत नाही, तेथे ते शिकवणार तरी काय आणि अध्यात्माची त्यांना दृष्टी आल्याशिवाय `वर्णाश्रम धर्मा’चा खरा अर्थ त्यांना उमजणार तरी काय! ``शक्तीपूजा म्हणजे काळ्या फत्तराचा एका अक्राळविक्राळ देवीची, भरमसाट भेसूर प्रकाराने आज तुम्ही करीत असलेली पूजा नव्हे. तुमच्या सामाजिक घाशीरामीखाली दडपून पडलेल्या देशातील स्त्रीजातीच्या पवित्र हृदयांत तुमच्या राष्ट्राची शक्ती धमधमत आहे. जुन्या चित्रकाराने शक्तीचे – काली देवीचे – जे चित्र रंगविलेले आहे, त्यातील तपशिलाच्या चिन्हांचा वास्तविक अर्थ कोणालाच समजत नाही. प्राचीन चित्रकार आपल्या गूढ भावनांना चिन्हांद्वारे व्यक्त करीत असत. कालीचे चित्र कसे आहे. एक नग्न, उग्र स्त्री. हातात नागवी तलवार. गर्द निळा रंग. गळ्याच माणसांच्या मुंडक्यांच्या माळा बेफाम थैमान घालीत आहे. ही तुमच्या कालीदेवीची मूर्ती. तिच्या पायाशी तुडवून लाथाडून पडला आहे तो कोण? हे चिन्ह काय दर्शविते? कालीदेवीने लाथाडून लोळविलेला तो भिक्षुकशाहीचा दांभिक व लुच्चा भट आहे. सत्याची नागवी तलवार परजीत, आपल्या वाजवी हक्कांसाठी, कालीदेवीला या भटाला चिरडून जमीनदोस्त करणेच प्राप्त आहे. विचार करा. सावध व्हा. नाहीतर, आज तुमच्या गुलामगिरीखाली दाबून गेलेली स्त्रीजात – हिंदुस्थानची शक्ती – कालीदेवी संतापाने भडकून जाऊन, भरतभूमीवरून या दांभिक लबाड भिक्षुकशाहीचे तळपट उडविण्यासाठी खरोखरच नागवी तलवार प्रत्यक्ष परजीत, भयंकर थैमान घालायला सोडणार नाही. असा दिवस उगवू देणे वा न देणे तुमच्या हाती आहे. ``स्त्रिया माणसे आहेत, त्यांना काही हक्क आहेत. याची जाणीव करून घ्या. लबाड भिक्षुकशाहीच्या घाणेरड्या भिकार शिकवणीच्या पचनी पडल्यामुळे, तुमचा एकजात स्त्रीवर्ग भटभिक्षुकांच्या गुलाम बनला. त्यामुळेच तुम्हा हिंदुजनांचा सत्यानाश झाला, तुमचा मर्दानीपणा छाटला गेला आणि बरेवाईट निवडण्याची तुमची विवेकशक्ती ठार मेली. एखादी योग्य गोष्ट करण्याचा तुम्हाला उमाळा येतो; पण तुमच्या सामाजिक (जातिविषयक) बंधनांचा बागुलबोवा पाहताच, तुमचा तो उमाळा, विद्युल्लतेच्या क्षणिक चमकीप्रमाणे, ठिकच्या ठिकाणी पार विरघळून जातो. उमाळ्याच्या या क्षणिक चमकीमुळे तरी तुम्ही किती गडद अंधःकारात पडलेले आहात, किती नैतिक नामर्द बनला आहात आणि तुमची आत्मिक अधोगति किती झाली आहे, हे स्पष्ट दिसून येते. ``तुमचे पौरुष पराक्रमी होण्यासाठी स्त्रियांच्या आत्मतेजाची शक्ती तुमच्या पाठिंब्याला धावून आली पाहिजे. स्त्रियांची शक्ती जागृत आणि तेजस्वी बनण्यासाठी त्यांचे कौमार्य बलशाली राखले पाहिजे. कुमारिकांचे कौमार्य म्हणजे प्रत्येक मानववंशाच्या उपवनातील सुंदर, सात्विकस पवित्र पुष्पचहोय. परंतु, अरेरे! तुमच्या हिंदुसमाजात कामातुर धटिंगणांच्या उतावळ्या स्पर्शाने या पुष्पांना हिसडा मारून अकाली खुडण्यात येते, त्यांचा अपमनकाकरक भंग करण्यात येतो. त्य पवित्र कौमार्य-पुष्पाचा तुम्ही हवा तसा चोळामोळा करून टाकता! ``तुमच्या मुलींना लख्ख सूर्यप्रकाशात वाढू द्या. त्यांच्याभोवती कसल्याही खोट्या नकली, कृत्रिम किंवा परिस्थितीचे आवरण आणि भिक्षुकशाही च्या लुच्च्या, दांभिक भटांची सावलीसुद्धा पडू देऊ नका, मग पाहा, त्या ख-याखु-या मर्दांना जन्म देण्याच्या लायकीच्या प्रभावशाली युवती बनतील. त्यांच्या शक्तीच्या प्रभावाने तुम्हालासुद्धा त्या मर्द बनवतील. सध्या तुमच्या पोटी माणसे जन्मत नसून, होते आहे ही कृमिकीटकांची पैदास आहे. याचे कारण हेच आहे की ज्या कुमारिकांना प्रेमशून्य कामवासनेने कोणी स्पर्शही करता कामा नये, त्या कुमारिकांचे कौमार्य बळजबरीने भ्रष्ट करण्यास तुमच्या भटभिक्षुक गुरूंची शिकवणी आजवर उत्तेजन देत आलेली आहे. ``विवाहविधीच्या गोंडस सबबीखाली माणुसकीला लाज आणणारे असले अत्याचार करण्यापेक्षा, तुम्ही विवाहाचा पोकळ प्रतिष्ठितपणा कायमचा बंद पाडाल तर फार बरे होईल! या तुमच्या भ्रष्ट विवाह-पद्धतीने, अर्ध्याकच्च्या कमकुवत पोराबाळांची पैदास करून, तुम्ही आपल्या हिंदुजातीची आत्महत्या मात्र करीत आहात. ``या तुमच्या कर्मांमुळे अखिल मानवतेपुढे तुमची जाती किती तिरस्करणीय अवस्थेत उभी आहे, हे न दिसण्याइतके तुम्ही कितीही आंधळे झाला असला, तरी देवाला हे सर्व दिसत आहे. हिंदू म्हणजे देवाचे असे कोण, मोठे लाडके लेक लागून गेले आहेत की, त्यांनी जननकार्याच्या त्याच्या पवित्र आणि गुप्त नियमांचा हवा तो उच्छेद करावा, हवी तशी पायमल्ली करावी, आणि त्याबद्दल निसर्गप्राप्त कोणत्याही शिक्षेचा फटका त्यांना कधी बसू नये? ``तुमच्या अस्तित्वाला दडपीत चिरडीत नेणा-या न्यायनिष्ठुर कर्मन्यायाची याद राखा. कर्मन्यायाचा कचकाच असा आहे की त्याला व्यक्तिची पर्वा नाही की जातीची किंमत नाही. आडवा आला की काप, एवढेच त्याला माहीत. या पुराणप्राचीन जगतात आजपर्यंत शेकडो मानववंश नामशेष झाले. सफाई अस्तित्वातून उठले. कालीदेवीच्या गळ्यात ती नररूंडमाळा घातलेली आहे, ती विचारपूर्वक पाहा. प्रत्येक मुंडके म्हणजे पृथ्वीतलावरून कर्मन्यायाने नष्ट झालेल्या एकेका मानववंशाची निशाणी आहे. कालीदेवीचे हे अर्थपूर्ण चित्र काढणा-या प्राचीन चित्रकाराला निसर्गन्यायाची बरीच माहिती होती, असे नाही का तुम्हाला वाटत? पण तुमच्या भिक्षुकशाही गुरुवर्यांना? ``कर्मन्यायाचा असा कडक शिस्तीचा दण्डक आहे की हिंदुस्थानात न्याय, समता आणि योग्य तत्त्वे यांचा अंमल सुरू होऊन, त्याबरहुकूम प्रगतिचक्राची गती पुढे गेलीच पाहिजे. या चक्राला विरोध करणा-यांच्या अर्थात चिंधड्याच उडणार! ज्या धार्मिक-सामाजिक पातकांनी लोखंडी शृंखलापेक्षाही तुमचे हातपाय अधिक बळकट जखडून आवळून टाकले आहेत, त्या पातकांना जितक्या लवकर नष्ट कराल, तितक्या लवकर तुमची प्रगती होईल. ``जे अधिक बलवान व पुढारलेले असतील त्यांनी खाली पडलेल्या लाथाडलेल्या हतबलांना हात देऊन वर घेतले पाहिजे. ज्या घाणेरड्या धार्मिक, सामाजिक नियमांमुळे वर चढलेले वरवरच तरंगत आहेत आणि खाली पडलेले खोलखोल बुडत आहेत, त्या सर्व नियमांचा चेंदामेंदा केला पाहिजे. याचा परिणाम काहीही हवो, त्यापायी वाटेल ते नुकसान होवो, व्यक्तींना दुःख भोगावे लागो, वा समाजाला असल्या अन्यायी नियमांची राखरांगोळी केलीच पाहिजे. ``कोणा एखाद्या विवक्षित राष्ट्राकरिता अगर जातीकरिता नव्हे तर अखिल मानवतेचा उद्धार करणार एक साधन म्हणून, निसर्गाच्या मुशीत हिंदुस्थानची पुनर्घटना होत आहे. राष्ट्रीयत्वाच्या संकुचित कल्पनेचा यापुढे अंत होऊन, अखिल मानवतेच्या हितवादाची महत्त्वाकांक्षा बळावून ती विजयी झाली पाहिजे. आम्ही सर्व हिंदुस्थानवासी जन भाऊ भाऊ आहोत, या उच्च मनोवृत्तीच्या भावनेची प्रभात होण्यापूर्वी कल्पनातीत क्लेशांच्या दिव्यातून गेले पाहिजे. वर्णभेद, जातिभेद, मतभेद काहीही असले, तरी आम्ही सर्व हिंदवासी भाऊभाऊ आहोत, या भावनेच्या आणि माणुसकीच्या प्रकाशाने आपापली घरे प्रकाशित करा.’’ ।।वंदे मातरम्।। 000 टीप *१ – रोमन लोकांनी कार्थेज येथल्या प्राचीन फिनीशियन संस्कृतीचा नाश केला. ग्रीक लोकांनी ट्रोजन संस्कृती धुळीला मिळवली; तद्वतच वैदिक आर्यांनी रसातळाला नेलेल्या एका जबरदस्त प्रतिस्पर्धी संस्कृतीचा रावण हा नायक प्रतिनिधी होता. - ग्रंथकार टीप **२ – `पॉलिटिक्स’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ केवळ `राजकारण’ असा होत नाही. त्यात मानवी जीवनचर्येच्या सर्व व्यवहारांचा समावेश होतो. म्हणून तोच शब्द येथे कायम ठेवला आहे. - अनुवादक + या शब्दालाही तेज, तडफ वगैरे अनेक मराठी प्रतिशब्द असले, तरी स्पिरीट शब्दातल्या सर्व भावना त्यात उतरत नाहीत. सबब याचीही शुद्धी करून मराठी संघटनात त्याला घेतले आहे. - अनुवादक टीप *३ – उत्तर हिंदुस्थानातल्या काही जातीतील स्त्रिया इतरांना खुशाल तोंड दाखवितात, पण नवरोबा येताच पटकन बुरख्यांचे घुंगट मारतात. मारवाडणीच्या घुंगटाची रीत तर काही विचारूच नये. तात्पर्य, बुरख्याचा विनय आणि विनयाचा बुरखा या गोष्टी सध्या लज्जास्पद व हास्यास्पद स्थितीत आहेत. - अनुवादक टीप *४ – या मुद्याची माहिती `जर्नल ऑफ धी बिहार अँड ओरीसा रिसर्च सोसायटी’ मार्च १९१९ पृष्ठ २ मध्ये मिळेल. - ग्रंथकार टीप *५ – यज्ञातील तुपाप्रमाणे किंवा पशुंच्या चरबीप्रमाणे या द्रव्यराशी यज्ञात जळून खाक न होता, या भटाभिक्षुकांच्या बटव्यात सुरक्षित जाऊन पडत असत, हे स्पष्ट करून सांगायला नकोच. - अनुवादक टीप *६ – England expects every man to do his duty या ब्रिटीश राष्ट्रसूत्राप्रमाणेच India expects every Indian to do his duty इतकाच अर्थ त्यात स्पष्ट होतो. विशेष काही नाही - अनुवादक टीप *७ – नवरा मरो नवरी मरो, भटाला दक्षिणा मिळाली म्हणजे झाले! या पीलकडे सुहेरसुतकाचे सव्यापसव्य ब्रह्मदेवाने भटांना शिकविलेच नाही, त्यांनी तरी काय करावे? - अनुवादक + संघाची म्हणजे जातींची कोंडाळी निर्माण होण्याच्या पूर्वी हिंदू समाजातील हव्या त्या मनपसंत तरुणाला पाणीदान करण्याचा स्त्रियांना अधिकार असे. परंतु संघाची कुंपणे पडल्यावर, पतिशोधन तर बुडालेच, पण पतिपसंतीचाही मामला बाप, भाऊ, काका, मामाच्या इच्छेवर राहून जातिपुरता आकुंचित बनला. - अनुवादक * कारण `बांधून देईन तेथे गेले पाहिजे’ हा प्रत्येक मुलीच्या बापाचा वेदोक्त अधिकार पडला ना! - अनुवादक टीप *८ – `अष्टवर्षा भवेत् कन्या’ असली पागलपणाची सूत्रे भटी टाळक्यांतून याच वेळी निपजली. असल्या सूत्रांच्या प्रसववेदना ब्रह्मदेवाला खास भोगाव्या लागल्या नसाव्या. - अनुवादक टीप *९ – या शब्दाचा खरा अर्थ व ख-या भावना नीट पटण्यासाठी वाचकांनी चारूदत्ताच्या वसंतसेनेचे चारित्र्य दृष्टीपुढे ठेवावे. कलावंतीण म्हणजे वेश्या (Prostitute) नव्हे. प्राचीनकाळी हिंदुस्थानात कलावंतिणीचा दर्जा क्षुद्र मानण्यात येत नसे. त्या चांगल्या सुविद्य, उदार, रसिक, आणि प्रामाणिक असत. - अनुवादक टीप **१० – कारण त्या सर्व या कलावंतिणींनी उचलल्या! टीप *११ – भिक्षुकशाहीला ब्रह्मदेवाने एवढाच एक गुण शिकवलेला दिसतो. ज्या ज्या चळवळींविरुद्ध भटाब्राह्मणांची आदळआपट व कारस्थानी डावपेच सुरू होतात, तीच चळवळ खरी लोकहितवादी, असे डोळे मिटून सांगावे. - अनुवादक टीप *१२ – भिक्षुकी खुनशीपणा फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. प्रसंग पडेल तसे वळते, वाकते, नमते घेऊन, पायाला किंचित सत्तेचा तणावा मिळताच एका दाताचा सूड बत्तिशी पाडून घ्यायला, भटीवृत्ती सर्पाप्रमाणे डोक धरून बसण्यात कधीही कमी करणारी नव्हे. - अनुवादक टीप **१३ – बौद्ध धर्मात महायान आणि हीनयान असे पुढे दोन पंथ निर्माण झाले होते. - अनुवादक टीप *१४ – हे नाणे काय असावे? टीप **१५ – भटांच्या नुसत्या जानव्याची ब्रह्मगाठ जर एवढी पराक्रमी, तर त्यांच्या प्रत्यक्ष कारस्थांनाची खूणगाठ किती? श्रावणीचे शेण खाऊन भटी जानव्यांची दावी गळ्यात अडकवून घेणा-या मानवी बैलांनी सावध असावे. धर्म करता कर्म पाठीस लागायचे! लागलेच आहे म्हणा सध्या - - अनुवादक टीप *१६ – भिक्षुकशाही परक्यांशी मिळते घेण्यात मनाची फार कोवळी आणि उदार. स्वदेशबांधवांशी शतकानुशतके वैराचा वणवा फुलवीत बसेल, पण जबरदस्त परक्यांशी मनधरणी करण्यासाठी पळाचाही विलंब तिला सोसवत नाही. आजही हेच चालले आहे. - अनुवादक + सिथियनांना हिंदु करून चतुवर्णापैकी क्षत्रियांची जागा त्यांना देण्यात आली. पण त्यांची जात कोणती? जातीशिवाय हिंदू जगेल तरी कसा? मोठी अडचण पडली. अखेर तुम्ही राजपुत्रच आहात, तेव्हा तीच तुमची जात असे ठरविले. राजपुत्राचे झाले राजपूत आणि राजपुताचे बनले रजपूत. टीप *१७ – हिंदुंची अशी एकही जात सापडणार नाही की जिच्या उत्पत्तीचे मूळ थेट ब्रह्मदेवाच्या पोटात घुसलेले नाही! मैल मैल लांब वंशावळीच्या अभिमानात गर्क असणा-या हिंदू जनांच्या जातिवंशात कसकशी काल्पनिक कलमे लावली गेलेली असावी, याचा या गोष्टीवरून फार छान खुलासा होतो. - अनुवादक टीप. १८ – कित्येक बौद्ध लेण्यांत तर बुद्धाच्या मूर्ती उखडून टाकून तेथे शंकराच्या पिंड्यांही स्थापन केलेल्या आहेत. पुण्यानजीक भांबुर्ड्याच्या लेण्यांत हाच प्रकार दृष्टीस पडतो. - अनुवादक टीप *१९ – आजही हा मायावाद हिंदुंच्या संसारात निराशेची भरपूर फोडणी देतच आहे. - अनुवादक 000

prabodhankar.org/node/252/page/0/57