शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

इतिहासाची अक्षम्य विकृती इंद्रजित सावंत

इतिहासाची अक्षम्य विकृती
शुक्रवार, ६ जानेवारी , २०१७ इंद्रजित सावंत

शेवटी इतिहास महत्त्वाचा की भाषेचा फुलोरा असलेली राजसंन्याससारखी नाट्यकृती याचा निर्णय महाराष्ट्रालाच घ्यावा लागेल. राजसंन्याससारखी अनेक नाटके ओवाळून टाकावीत असा शिवछत्रपती आणि संभाजीराजांचा इतिहास आहे.


पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात बसवलेल्या नाटककार राम गणेश गडकरी यांचा अर्धाकृती पुतळा काढल्यानंतर या कृत्याच्या निषेधार्थ तथाकथित महाराष्ट्र् सारस्वत, कलाकार, नाटककार तसेच मुख्यमंत्र्यांपासून सर्वपक्षिय राजकारण्यांनी आपले भाषावैभव प्रकट केले. महाराष्ट्रातील पत्रपंडितांनी विविध माध्यमांतून या घटनेचा पंचनामा (एकांगी) केला. एकूणच नोटबंदी, कॅशलेसच्या बोजड चर्चेतून मोकळं होत या विषयानं मर्‍हाटी राज्याला ताजा विषय दिला. चर्चेची एकप्रकारे झोडच उठली मात्र हे सगळं होत् असताना एका निरूपद्रवी साहित्यिकाचा पुतळा या युवकांनी का काढला असावा याचा विचार, अभ्यास या मंडळींनी केलेला दिसत नाही.


राम गणेश गडकरी म्हणजे शब्दप्रभू, महान साहित्यिक, कवी आणि विसाव्या शतकातील सुरवातीची किमान पाच दशके ज्यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमी गाजवली असे नाटककार. गडकरी म्हणजे मराठी अस्मितेची तलवार आणि त्यांचे राजसंन्यास हे नाटक म्हणजे तर दिनानाथ मंगेशकर, कोल्हटकर, प्र.के. अत्रेंपासून पु.ल.देशपांडेंपर्यंत अनेक दिग्गजांच्या प्रेमाचा विषय.

आज काहीजणांच्यामते या राजसंन्यास नाटकाचे प्रयोग झालेच नाहीत असं असलं तरिही गडकरींनी त्यांच्या निधनापूर्वी बारसे केलेल्या बळवंत संगीत नाटक मंडळी म्हणजेच दिनानाथ मंगेशकर यांच्या नाटक कंपनीने या नाटकाचे संबंध महाराष्ट्रभर प्रयोग केले होते. याचे पुरावेही उपलब्ध आहेत.

गडकर्‍यांचे हे नाटक म्हणजे शिवपूत्र शंभूराजांवर लिहिलेली अपूर्ण कलाकृती. गडकर्‍यांच्याच शब्दांत सांगायचे तर "तत्वगर्भ नाटक" (principle play) आहे. संभाजीराजांवर वासुदेवशास्त्री खरेंपासून(गुणोत्कर्ष,इ.स.१८८५) या नाटाकापासून आजतागायत किमान ६०-७० नाटके लिहिली गेली आहेत. त्या अर्थानं एखाद्या व्यक्तिच्या चरित्रावर इतक्या मोठ्या संख्येनं नाट्यनिर्मिती होणं हाही एक विक्रमच म्हणला पाहिजे. मात्र यापैकी एखाद दोन अपवाद वगळता इतर नाटकांत बहुतांशी संभाजीराजांचे चित्रण, "प्रणयीयुवराज" (वा.न.शहा),  बेबंदशाही (वि.ह.औंधकर), दुर्दैवी छत्रपती (श.गो.घैसास), चिडलेला छावा (श्री.कृ.ओक), थोरातांची कमळा (ना.के.सोनसुखार) इत्यादी नाटकांत संभाजीरांजांचे परस्त्री आकर्षण, रगेल व रंगेलवृत्ती चितारणारी आहेत. द.ग. गोंडसेंसारख्या साक्षेपी संशोधकांनाही "राजयाचा पूत्र अपराधी देखा" सारखं नाटक लिहिण्याचा मोह आवरता आला नाही.
गडकर्‍यांचे राजसंन्यास हे अपूर्ण नाटक अनेकांना नाट्य समीक्षकांना,लेखकांना भूल पाडणारं ठरलं. पु.ल. देशपांडे आणि ग.दि. माडगूळकर यांनी या नाटकातले संवाद म्हणत म्हणत कसा लढाखचा प्रवास पूर्ण केला याचे रसभरीत वर्णन "गुण गाईन आवडी" मधे केलेले आहे. तर नाट्य समीक्षक, लेखक डॉ. भीमराव कुलकर्णी लिहितात,"राजसंन्यासची सारी बैठकच मराठ्यांच्या इतिहासातील नेमक्या वैशिष्टयांला हात घालणारी आहे. महाराष्ट्र धर्माचे तत्त्व तिच्यामधून अविष्कृत झालेले आहे. तिच्यामधे शोकनाट्याने भरलेल्या मराठ्यांच्या इतिहासातील एका दुर्दैवी कालखंडाचे आणि पौरूष व पराक्रम यांचा संगम झालेल्या संभाजीसारख्या व्यक्तिमत्वातील आत्मविस्मृतेची जाणीव किती दारूण असते याचे प्रत्यंतर आढळते. राजसंन्यास नाटकात मधले काही अंक आणि प्रवेश लिहायचे राहिले आहेत. त्यामुळे उजाड माळावरच्या भव्य परंतू अपूर्ण अशा शिल्पासारखे ते भासते. तिच्यातील भव्यता ही अभिजाततेची (classical) व महाकाव्याच्या जातीची (epic grandure) आहे. तिच्यात परके वाटावे असे वातावरण किंवा कल्पना यांचा अंशही नाही, असे खास मर्‍हाटी आहे. अशा या राजसंन्यासाच्या जादूने हे मराठी विश्र्व भारावलेले होते व आहे.'

गडकरींना या नाटकाची प्रेरणा सिंधूदुर्ग किल्ला दूरून पहाताना सुचली. त्यानी कधीही रायगड पाहिला नाही. गडकरींनी ज्या कालावधीत म्हणजे, इ.स. १९१० ते १९१८ च्या दरम्यान ज्यावेळेस ते पुण्यात वास्तव्यास होते त्या कालखंडात हे नाटक लिहिले. इथे याचा उल्लेख यासाठी केला कारण कथा, कादंबर्‍या, नाटके लिहिताना त्या त्या काळाचा प्रभाव त्या त्या काळातील वैचारिक मतप्रवाहांचा परिणाम संबंधित लेखकाच्या लिखाणावर पडत असतो. आणि यावेळी म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरवातीला दोन तीन दशके पुण्यातील वातावरण फ़ुले, राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने भारावलेले होते. तर दुसरीकडे लोकमान्य टिळक, न.चि. केळकर अशी मंडळी सनातनी वृत्तीचे समर्थन करत होती. थोडक्यात यावेळेस पुण्यात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचे जोरदार वादळ घोंगावत होते. या वादळाचा केंद्रबिंदू मराठ्यांच्या म्हणजेच शिवछत्रपतींच्या भोसलेकुळाचा इतिहास हाच होता.

सत्यशोधक आणि टिळकपंथीय दोन्ही गट लेख, भाषणे, पुस्तिका, ग्रंथ, नाटके, मेळे यांच्या माधमातून आपापल्या विचारांचा प्रचार - प्रसार करत होते तर काही कजाख विद्वान मराठ्यांचा इतिहास विकृत स्वरूपात मांडत होते. यातूनच मराठ्यांची अस्मिता, भोसले कुळाला बदनाम करण्यसाठीच्या कंड्या पिकविल्या जात होत्या. "तुझी बुक्की तर माझी लाथ" या न्यायाने जोरदार लढाई सुरू होती. या सार्‍याचा परिणाम गडकरींसारख्या नाटककाराच्या लेखणीवर पडला नसता तरच नवल होते. शिवाय गडकरी हे टिळकपंथीयांचे सेनापती न. चिं. केळकर यांच्या सतत संपर्कात होते. "राजसंन्यास"नाटक लिहिण्याची तयारी व लिहिल्यानंतरची पहिली वाचने केळकरांच्या माडीवरच केलेली होती, अशी भा. वा. धडफ़ळे यांची या संदर्भातली आठवण पुरावा म्हणून आहे. शिवाय या आठवणीतून राजसंन्यासचे मूळ केळकरांपर्यंत कसे पोहोचते याचिही माहिती आपणांस देतो. या आठवणीत धडफ़ळे लिहितात, "१९१७ साली एका दुपारी आम्ही गायआळीतून जात असताना राम गणेश गडकरी मास्तरांना केळकरांकडे जायची लहर आली. दारात शिरताच त्यांनी मोठ्या आवाजात तात्यांची चौकशी सुरू केली. गडकरी आत गेले व दोघेही (केळकर-गडकरी) तब्बल दोन तास गप्पा मारत बसले होते. तात्यांचे तोतयाचे बंड हाच गप्पांचा मुख्य विषय होता. गडकरींनीही आपल्या राजसंन्यास ची त्रोटक हकिकत सांगताना नाटकाच्या भाषेचा प्रश्न निघाला. तात्यासाहेबांनी पुष्कळ मार्मिक सूचना करून मराठी बखरीची दोन तीन जाडी पुस्तके आपल्या ग्रंथालयातून काढून गडकर्‍यांच्या हवाली केली व त्यांचा अभ्यास करून नाटकाची भाषा ठरवा असे सुचविले. त्या बखरी बरोबर घेऊन व दुपारचा चहा तेथेच घेऊन आम्ही चारच्या सुमारास जेवणासाठी तातडीने निघालो कै. गडकरींनी त्या बखरीतूनच आपल्या राजसंन्यासची भाषा बरोबर उचलली व पुढे कित्येक महिन्यांनी ते ग्रंथ तात्यासाहेबांकडे साभार परत पाठवले"

अशाच एका आठवणीत द.वि. परांजपे लिहितात,"मी माझे लिखाण उठल्या सुटल्या तात्यासाहेबांना (न. चिं. केळकर) वाचून दाखवित असे. मीच काय गडकरींसारखे काही अभिजात लेखकही आपल्या लिखाणाच्या गुंडाळ्या हातात घेऊन तात्यासाहेबांना त्यातील भाग वाचून दाखवावा म्हणून त्यांच्याकडे हेलपाटे घालताना मी नित्य बघत असे"

उपरोक्त उल्लेख मुद्दाम इथे उद्धृत केले आहेत. गडकरींचे हे नाटक असले तरिही त्यांना या नाटकाच्या संदर्भासाठी कुणाची मदत, मार्गदर्शन मिळत होते हे समजावा हा हेतू आहे. केळकरांनी पुरविलेल्या साधनांच्या, बखरीच्या दंतकथेच्या आधारावर आणि आपल्या लेखणीच्या सामर्थ्याच्या जोरावर गडकरींनी या नाटकातील पात्रांची रचना, संवाद फ़ुलवले व भाषेच्या संवादाच्या दृष्टीने मराठ्यांच्या इतिहासाची पूर्णत: प्रतारणा करणारे हे राजसंन्यास नावाचे नाटक निर्माण झाले.

या राजसंन्यास नाटकाच्या संवादातून, त्याच्या पात्रांच्या निवडीतून इतिहासाचा मोठा अपलाप झाला आहे. "गडकरी" सारख्या नाटककारांकडून असा प्रमाद घडला तर तो एकवेळ अक्षम्य ठरतो पण गडकरींनी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली नाटक रचले ते न. चि.केळकर हे मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक होते, त्यांना या नाटकातील पात्रांचे नातेसंबंध व खर्‍या इतिहासातील व्यक्तिंचे नातेसंबंध माहित नव्हते असे कसे समजावे?

संभाजी राजाला "इष्कांच्या कैफ़ात" अडकविताना तो हिरोजी फ़र्जंद जे की खर्‍या इतिहासात शिवाजीराजांचे भाऊ लागतात त्याच्या मुलीशी "तुळशी"शी व्यभिचाराचे नाते ठेवतात. अशी पात्र रचना ठेऊन गडकर्‍यांना काय साधायचे होते? गडकरी फ़र्ग्युसन महाविद्यालयातील एका ललनेच्या प्रेमात व ती ललनाही यांच्या प्रेमात अखंड बुडलेली होती. पुढे गडकर्‍यांच्या या प्रेयसीचा विवाह एका संस्थानिकाशी झाला. यातून गडकर्‍यांनी केलेल्या उत्कट प्रेमाच्या खुणाही या नाटकात जाणवतात.

गडकर्‍यांची भाषा कितीही शेक्सपिअरशी नाते सांगणारी असली तरिही शेक्सपिअरच्या नाट्यकृतीत गडकर्‍यांनी केलेल्या नाट्यकृतीसारखा इतिहासाशी द्रोह दिसत नाही. गडकर्‍यांनी या नाटकात संभाजीराजांना स्वत:लाच रंडीबाज, छटका म्हणायला लावले. तसा शेक्सपीअरने त्याच्या नाटकातील मुख्यपात्राला रंडीबाजीत लोळवल्याचे उदाहरण नाही. गडकरींच्या नाटकातील संभाजीच्या तोंडी दिलेले संवाद नमुना म्हणून पाहायला हरकत नाही. गडकरींचा संभाजीराजा तुळापुरच्या औरंगजेबाच्या छावणीत त्याला सोडवायला आलेल्या साबाजीस म्हणतो, 'गोब्राह्मण प्रतिपालक हिंदुपदपादशहा श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज! नाही, साबाजी. ही माझी किताबत नाही! संभाजी म्हणजे केवळ रंडीबाज छाकटा!....'

हा संवाद संभाजीराजांच्या प्रस्थापित रूढ इतिहासातू गडक-यांनी लिहिला असावा. त्यावेळी म्हणजे ते नाटक लिहिले तेव्हा संभाजीराजांची प्रतिमाच तशी होती, असे गडकरी समर्थकांचे म्हणणे आहे. सुमारे १०० वर्षांपूर्वीच्या या नाटकात त्यांची व्यक्तिरेखा त्यावेळी उपलब्ध असलेल्या साधनांद्वारे रेखाटली गेली, असे समर्थन आज काही जण करत आहेत. मात्र वरील संवाद संपूर्णपणे वाचला, तर गडकरींना इतिहासाचे चांगलेच ज्ञान होते असे सिद्ध होते. या संवादात पुढे रायगडावरील गंगासागर या तलावाचाही उल्लेख आहे. त्यावरून त्यांना केवळ इतिहासाचेच नव्हे, तर ऐतिहासिक स्थळांचेही चांगले ज्ञान होते, असे सिद्ध होते. या संवादात चिटणीसाला हत्तीच्या पायी देण्याचा उल्लेख आला आहे, शिर्क्यांनी संभाजीराजांविरोधात केलेल्या बंडाचा उल्लेख आहे. हे उल्लेख संभाजीराजांच्या काळात झालेल्या घटनांचे चांगलेच ज्ञान गडकरींना होते याचेच निदर्शक आहेत.

गडकरींना संभाजीराजांचा इतिहासच अशुद्ध समजला म्हणून त्यांनी त्याचे नाट्यरूपांतर चुकीच्या पद्धतीने केले, हे मान्य केले, तरी याच नाटकात शिवाजी महाराजांबद्दल जिवाजीपंतांच्या तोंडी संवाद घालण्यात आले आहेत त्याचे समर्थन तर शक्यच नाही. 'शिवाजी नुसताच नावाला पुढे झाला. खरी करणी रामदासाचीच आहे' असे गडकरींचे जिवाजीपंत म्हणतात. हे स्पष्ट करणारा एक भलामोठा संवाद त्यांच्या तोंडी आहे. या संवादाची पेरणी कशाकडे निर्देश करते? बुद्धी शाबूत असलेला कोणता माणूस याचा केवळ नाटकातील संवाद म्हणून तरी स्वीकार करेल? शिवाजी महाराजांच्या गुरूपदाचा वाद त्यावेळी महाराष्ट्रात जोरदार घुमत होता. या नाटकाच्या निर्मितीच्या काळातच रामदासस्वामी शिवाजी महाराजांचे गुरू होते की नव्हते यावर मंथन सुरू होते आणि याच दरम्यान पुण्यातील अनेक वर्तमानपत्रांतून आणि कृष्णाजी केळुस्कर गुरुजींच्या शिवचरित्रातून, दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास हे शिवरायांचे गुरू नव्हते हे वारंवार पुराव्यांसह मांडले जात होते. असे असूनही शिवरायांनी रामदासांच्या सांगण्यावरूनच स्वराज्य स्थापन केले अशा आशयाला बळकटी देणारे संवाद गडकरी आपल्या नाटकात देतात, हे बघता या नाटकाचे लेखन आणि निर्मिती विशिष्ट हेतू ठेवून झालेले नव्हते असे ठामपणे कसे म्हणायचे?गडकरींच्या 'राजसन्यास'नाटकाची ऐतिहासिक आणि मानसशास्त्रीय अंगाने समीक्षा करणे हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यामुळे इथे वानगीदाखल संवादांतील काही भागाचीच चिकित्सा केली आहे. आता शंभर वर्षांनंतर हा विषय अचानक ऐरणीवर कसा आला, अशी चर्चा सुरू झाली आहे. खरे तर हा विषय प्रस्तुत लेखकाने २००७ मध्ये'शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध आणि बोध' हे पुस्तक लिहिले तेव्हाच शिवप्रेमींच्या लक्षात आला होता. त्याआगोदर तीन चार वर्षं महाराष्ट्रात जेम्स लेन या विदेशी लेखकाच्या माध्यमातून जिजाऊंच्या चारित्र्यावर विकृत माहिती संशोधन म्हणून रूढ करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रयत्नामागे पुण्यातील एका विशिष्ट गटातील विद्वान कंपूचा हात होता असा संशय घेऊन ज्या भांडारकर संस्थेत राहून जेम्स लेनने असे विकृत लिखाण केले त्या संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून तिथल्या फ़र्निचरची मोडतोड केली होती. त्यानंतर ज्या पध्दतीने ज्ञानभंडारावर हल्ला, तालिबानी कृती अशा अत्यंत शेलक्या शब्दात याचा निषेध करण्यात आला. या घटनेनंतर महाराष्ट्रात एक अभ्यासाची, इतिहासाकडे खास करून शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे अत्यंत चिकित्सक दृष्टीने पाहण्याची, खोलात जाऊन अभ्यास करण्याची प्रस्थापितांनी तयार केलेल्या चित्र शिल्पांचा डोळसपणे वेध घेण्याची दृष्टी निर्माण झाली.

त्यातून शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असणार्‍या श्र्वानाच्या शिल्पाकडे प्रस्तुत अभ्यासकाने लक्ष वेधले आणि या श्र्वानाचा संदर्भ शोधताना हा वाघ्या कुत्रा ज्या चौथर्‍यावर बसवला आहे त्या चौथर्‍यावरील शिलाफ़लकावर गडकर्‍यांच्या राजसंन्यास या नाटकाची अर्पण पत्रिकाच कोरल्याचे लक्षात आले. एकतर या तथाकथित वाघ्या कुत्र्याचा शिवकालिन अस्सल साधनांत उल्लेख नाहीच शिवाय भाकडकथांनी भरलेल्या बखरीतही त्याचा उल्लेख नाही हे लक्षात आले. शिवाय हा पुतळा न. चिं. केळकरांच्या प्रेरणेने व प्रयत्नांमुळे इथे बसला आहे.शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक जिथे झाला ती स्वराज्याची राजधानी आणि आज शिवचरित्राचे प्रमुख ठिकाण असणार्‍या जागी बसवला गेला आहे. म्हणजे ज्याचा उल्लेख संदर्भ साधनात नाही अशी एक अनऐतिहासिक प्रतिमा शिवरायांच्या मुख्य गडावर त्यांच्या समाधी शेजारी प्रस्थापित करायची त्यावर शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची बदनामी केलेल्या नाटकाची अर्पण पत्रिका त्या नाटकाच्या लेखकाच्या नावासह कोरून ठेवायची, परत गोपाळ चांदोरकरांसारख्या वास्तुविशारदाने "शोध शिव समाधीचा"नावाची पुस्तिका लिहून प्रचलित अष्टकोनी शिवसमाधी ही समाधी खरी नसून शिवरायांची खरी समाधी ज्या ठिकाणी कुत्रा बसवला आहे ती आहे असे लिखाण करायचे. या सर्व गोष्टीमागे हेतू नाही असे कसे म्हणायचे?

या सर्व विषयावर आक्षेप घेतला गेला नसता तर कालांतराने कुत्र्याचे स्मारक जे की गडकर्‍यांनी नाटक लिहिल्यानंतर १७-१८ वर्षांनी इ.स. १९३६ ला स्थापित झाले ते ऐतिहासिक सत्य आहे (दहा वर्षांपूर्वीपर्यंत असेच मानले जायचे) मग त्यावरील गडकर्‍यांच्या नाटकाची अर्पण पत्रिका कोरली आहे म्हणजे त्या नाटकातील आशयही सत्याचा अंश आहे हे ही सिध्द करायला कितीसा वेळ लागेल?

कारण या रायगडावरील कुत्र्याचा जन्म गडकर्‍यांच्या राजसंन्यास नाटकातून झाला आहे. हे काल्पनिक कुत्रे जर रायगडावरील शिवरायांच्या समाधीशेजारी ऐटित बसत असेल तर गडकर्‍यांनी नाटकात लिहिलेल्या संभाजी महाराजांबद्दलचा मजकूरही सत्याचा शालू का नेसणार नाही? असा इतिहास अशुध्द होऊ नये या भावनेतून जसा हा काल्पनिक कुत्रा रायगडावरून काढावा अशी मागणी पुढे झाली तशीच छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने असणार्‍या उद्यानात असणारा राम गणेश गडकरींचा पुतळा हालवावा अशी मागणी पुढे आली. या मागणीबरोबर पुण्यातील लालमहालातील दादोजी कुलकर्णीचा पुतळाही हलवावा अशी मागणीही पुढे आली होती. बहुजन मराठ्यांच्या रेट्यामुळे व दादोजी कुलकर्णीचे इतिहासातील स्थान पुराव्याने सिध्द होत नसल्यामुळे हा पुतळा येथून
 हलवला गेला. (लाल महाल बांधलाच गेला इ.स. १६५६-५७ सालात आणि दादाजीचा मृत्यू झाला १६४७ मध्ये)

नाटक, कादंबरी, चित्रपट या माध्यमातून मांडला जाणारा इतिहास म्हणून माणण्याचा कल, मानसिकता भारतीय समाजाची आहे. या माध्यमाचा प्रभावच खूप खोल आणि परिणामकारक असतो. याच नाटकांच्या. चित्रपटांच्या माध्यमातून संभाजीमहाराजांचे चारित्र्य बदनाम झाले. राजसंन्यास नाटक जरी शंभर वर्षांपूर्वीचे असले तरी त्याचे प्रयोग कधीही होऊ शकतात आणि नाटक, चित्रपटाला इतिहास मानण्याच्या प्रवृत्ती वा.सी.बेंन्द्रे, डॉ.कमल गोखले अशा संशोधकांनी अथक प्रयत्नांनी पुढे आणलेल्या संभाजी राजांचा खरा इतिहास या नाटकांच्या आवरणाखाली झाकला जाऊ शकतो.

राम गणेश गडकर्‍यांच्या पुणे शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील पुतळा त्यांनी लिहिलेल्या राजसंन्यास नाटकाच्या पोटात दडलेला संभाजी महाराजांचा इतिहास सत्यच आहे अशी मांडणी करण्यासाठी एकप्रकारे ऐतिहासिक साधन म्हणून वापरला जाऊ शकतो. या पुतळ्याच्या खाली असलेल्या शिलाफलकावर गडकरींचा गौरव आहे. त्यांनी राजसन्यास, एकच प्याला अशा नाटकांची निर्मिती केली. म्हणून या ठिकाणी त्यांचा पुतळा बसवण्यात आला, असा उल्लेख आहे.

राम गणेश गडकरी यांच्या भाषावैभवासाठी,कवित्वासाठी त्यांचा सन्मान जरूर करावा पण 'राजसंन्यास'सारखी हजारो नाटके ओवाळून टाकावीत अशा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी त्याची सांगड घालू नये.

शेवटी महाराष्ट्राचा इतिहास महत्त्वाचा की भाषेचा फुलोरा असलेली राजसंन्याससारखी नाट्यकृती याचा निर्णय महाराष्ट्रालाच घ्यावा लागेल. यासाठी इतिहास संशोधक शेजवलकरांनी संभाजी महाराजांवरच्या नाटकांचे केलेले परीक्षण आणि निरीक्षण उपयोगी ठरावे.

शेजवलकर म्हणतात, 'नाटकातील खोटे काल्पनिक प्रवेश निर्माण करून त्यात तितक्याच काल्पनिक संवादांचा मालमसाला भरून ऐतिहासिक व्यक्ती समाजापुढे मांडणे गैर आहे, असे आम्हाला वाटते. यात ब-याच व्यक्तींना अलौकिक गुण चिकटवण्यात येतात आणि वाईट माणसांना प्रमाणाबाहेर बदनाम करण्यात येते. नाटकापासून प्रेक्षक काय अपेक्षितात तो त्यांचा प्रश्न पण इतिहासाची ही अक्षम्य विकृती व हानी आहे, असे आम्हांस वाटते.'
(लेखक इतिहास संशोधक आहेत)

http://www.bigul.co.in/bigul/Newsdetails/index/39/sec/8

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०१७

अतिशय गर्भश्रीमंत नेहरू घराण्याची घराणेशाही .....

अतिशय गर्भश्रीमंत नेहरू घराण्याची घराणेशाही .....
1) मोतीलाल नेहरू यांनी मिठाच्या सत्त्याग्रहात 2 वर्ष तुरुंगवास भोगला!
2) जवाहरलाल नेहरू यांनी  एकूण 9 वर्षाचा तुरंगवास भोगला
3) एक वेळ तर मोतीलाल आणि जवाहर दोघेही बापलेक कारागृहात होते ,त्यावेळी जवाहरलाल यांच्या मातोश्री स्वरूपराणी नेहरू यांनी कॉग्रेस च्या कामाची धुरा सांभाळली. मोतीलाल नेहरू दिवंगत झाल्यावर, जवाहरलाल कारागृहात असताना पोलिसांनी केलेल्या मारहाणीत स्वरूपराणी नेहरू जखमी होऊन रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या व पोलिस मारहाणीत त्या मृत झाल्या म्हणून बातमी पसरली होती.  नेहरू कारागृहामधे असल्यामुळे आईला भेटायला जाऊ शकले नाहीत.
4) जवाहरलाल यांच्या पत्नी कमला नेहरूंनी प्रकृती साथ देत नसताना सुद्धा 1  वर्ष कारावास भोगला आणि आजार पण वाढले म्हणूनच त्यांची सुटका झाली ,
5)  मुलगी इंदिरा गांधी यांना  भारत छोडो आंदोलनात सहभागी झाल्यामुळे 2 वर्षाची शिक्षा भोगावी लागली. विशेष म्हणजे लग्नानंतर अवघ्या 6 महिन्यात, नवदांपत्य तुरूंगात होते.
6) जावई फेरोज गांधी यांनी भारत छोडो आंदोलनादरम्यान सहभाग घेतल्यामुळे 2 वर्षाची शिक्षा भोगली.
7) जवाहरलाल यांची सर्वात धाकटी बहिण कृष्णा हाथीसिंग यांनी 2  वर्षाचा कारावास भोगला.
8) जवाहरलाल यांच्या पेक्षा धाकटी असणारी विजयालक्ष्मी पंडित यांनी 3  वर्षाचा कारावास भोगला .
9) विजयालक्ष्मी यांचे पती रणजीत सीताराम पंडित यांना 3 वर्षाची सजा झाली, त्यापैकी अडीच वर्ष त्यांनी भोगली कारण 1944 साली  कारागृहात शिक्षा भोगत असतानाच ते  मरण पावले .
10) मोतीलाल यांचा पुतण्या ब्रिजकुमार नेहरू आणि त्यांची पत्नी रामेश्वरी नेहरू यांनी ही 'भारत छोडो' आंदोलनात सहभाग घेतला .
ही देखील घराणेशाहीच आहे ना , या घराणेशाही बद्दल तर कोणीच बोलायला तयार नाही.
© राज कुलकर्णी.

प्रतिस्पर्ध्यांविषयी घाणेरड्या कुचाळक्या फैलावून त्याला बदनाम करण्याची पेशवाई मुत्सद्द्यांची परंपरा बारभाईपासून आजवर अखंड चाललेली आहे.

येळकोट राहीना,मूळस्वभाव जाई ना

प्रतिस्पर्ध्यांविषयी घाणेरड्या कुचाळक्या फैलावून  त्याला बदनाम करण्याची पेशवाई मुत्सद्द्यांची परंपरा बारभाईपासून आजवर अखंड चाललेली आहे.या कामात ते अंग्रेजांचे संगोत्री म्हटले तरी चालेल.आज स्थापन झालेल्या हिंदी संघराज्याच्या कारभारात पेशवे संप्रदायिकांना "पक्का काट"मिळालेला आहे.आणि देशाच्या राजकारणातही त्यांना कोणी कोठे विचारात नाही.दिल्लीच्या हिंदू महासभावाल्याना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाल्याना चिथावून नेहरू सरकार उलथून पडण्याच्या अपयशी कटाने या बहिष्काराचा वचपा काढण्याचा उपद्व्याप थोड्याच दिवसांपूर्वी जनजाहीर झालेला आहेच.जवाहरलाल नेहरू,वल्लभ भाई आणि त्यांच्या राजकारणी हालचालींची निरर्गल शब्दात निंदा त्यांच्या पुणेरी पत्रांत रोज चालू असते.महात्मा गांधींची सर्वच्या सर्व मते सर्वानाच पटतात असे नाही.पान ते एक राजकारणी पुरुषोत्तम आहेत,जगद्वंद्य साधू आहेत.यांची साक्ष पंचखंड दुनिया देत असतानाही ह्या पिंडाचा हरेक आसामी आणि त्यांची आचकट,विचकट शिव्या देऊन आपल्या पिढीजात खूनसटपणाचे प्रदर्शन कसे करीत असतात ,हे पहिले म्हणजे रंगो बापूजीला त्यांनी "देशद्रोही"ठरवले प्रतापसिंहाला "नादान "म्हटले ,शाहू छत्रपतींना "स्वराज्यद्रोही"शिवी हासडली.बळवंतराव चिटणिसाला "लाचखाऊ भाडखाऊ "म्हटले आणि तमाम कायस्थ प्रभू जमातीला "स्वराज्यबुडवे" जाहीर करण्याचा खटाटोप केला,तर समंजस जनता यावरून काय बोध घ्यायचा तो घेतच असते.

लोकशाही जागृती कालपरवाची

आमच्या देशात अंग्रेज नको ,हा सत्तावानी विचार एकसारखा वाढत्या प्रमाणावर बळावत असला,तरी 1885 साली जन्माला आलेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसलाही लोकसत्ताक निर्भेळ स्वराज्याची जाणीव नव्हती.कायदेशीर मार्गाने ब्रिटिश साम्राज्यांतर्गत वसाहतीच्या स्वराज्यापुरत्याच तिच्या खटपटी असत.लॉर्ड कर्झन नें बंगालची फाळणी करताच वंगभंगाचा जो स्फोट झाला,त्याच वेळी राष्ट्रीय भावनेचा हिंदुस्थानात उगम झाला.डॉ.बेझंटबाईंनी होमरूलची चळवळ चालू केली आणि हिंदू मुसलमान ऐक्याचे तांबडे हिरवे निशाण दिले.अलीकडच्या काळातील हिंदुस्थानचे हेच पहिले राष्ट्रीय निशाण देशाला दिले.या निशाणावरही पुण्यातल्या टिळक पक्षाने आक्षेप घेतला आणि त्यात एका कोपऱ्यात अंग्रेजांचा युनियन जॅक बावटा रंगवून,आपल्या पक्षाचे वैशिष्ट्य जाहीर केले.होमरूल चळवळीपासून राष्ट्रीय भावनेला आणि स्वराज्याच्या प्रश्नाला जोर चढला.तरीही काँग्रेस म्हणजे शहरी शहाण्यांच्या पोषाखी चळवळीचे केंद्र म्हणूनच राहिली.हा काळ पावेतो महाराष्ट्रातल्या क्रांतिकारकांच्या खटपटी केवळ पांढरपेशा मूठभर अनुयायांच्या संघटनेवरच उभारलेल्या होत्या.खेड्यापाड्यातल्या समाजाच्या पाठिंब्याची कोणालाही दाद नव्हती,काही परवाच नव्हती .वासूदेव बळवंटांचा दीक्षाविधी घेणारे अनुयायी काय,अथवा सावरकरांच्या अभिनव भारताचे दीक्षित काय,एकजात सारे कोण होते .खरा हिंदुस्थान शहरात नसून तो खेड्यात आहे.तो शेतकरी कामकऱ्यांचा कोट्यवधी बहुजन समाज उठवल्याशिवाय ,या शहरी शहाण्यांच्या पोषाखी चळवळी फुकट आहेत .हे बिनचूक हेरून काँग्रेसला अस्सल लोकशाही शक्ती बनविण्याची कामगिरी महात्मा गांधींनी बजावलेली आहे.गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस हि लोकशाही स्वराज्यप्राप्तीची जबरजस्त शक्ती कशी बनली,हा इतिहास तुमच्या आमच्या डोळ्यांपुढे घडलेला असल्यामुळे तो येथे सांगण्याची आवश्यकता नाही.जातपात .धर्म ,स्पृश्यास्पृश्य यच्चावत साऱ्या भेदांना महात्मा गांधींच्या काँग्रेसने सफाचट तिलांजली देऊन.खऱ्या खऱ्या लोकशाही सामर्थ्यावर हिंदीसंघराज्याचे  स्वप्न आज सिद्ध करून दाखविल्यामुळे,पेशवाई राज्याच्या पुनर्घटनेने हिंदुस्थानाला आबाद करण्यास सजलेल्या जातीयवादी संघाना चालू घडीच्या राजकारणात द्वारपाळाचीहि जागा नाही.

संदर्भ : प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी ,सिंहावलोकन,लेखक :प्रबोधनकार ठाकरे.
पान नं : 433,434

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

भाजपा की 2014 से 2016 तक कि यादें

भाजपा की 2014 से 2016 तक कि यादें  -
--------------------------------
1. बलात्कार छोटी घटना है :- अरुण जेटली
2. मध्यम वर्ग अपना ख्याल खूद रखे :- अरुण जेटली
3. पेड पोधो को पेशाब पिलावो पानी नही :- नितिन गडकरी
4. लड़की बेचे आचार तो ज्यादा बिकेगा :- नरेन्द्र मोदी
5. बिहार बिमारु राज्य है :- नरेन्द्र मोदी
5. ब्लात्कार के लिये लड़की जिम्मेदार :- हरियाणा मुख्यमंत्री खट्टर
6. किसान आत्महत्या लव अफेर्स और नपुंसकता की वजह से करते है :- केन्द्रीय कृषि मंत्री
7. सरकार हनुमान नही है जो इराक मे फसे भारतीयों को ले आयेगी :- वी.के सिंह
8. बलात्कार कुछ हद तक अच्छा है कुछ हद बुरा है :- बाबू लाल गौर
9. रेल किराये महेंगे हो गये यह बड़ी बात नही छोटी बात है :- किरिट सौमैया ?
10. 25 % Inflation बराबर है :- राधा राम मोहन सिंग
11. बिना प्रोटेक्शन ऐइड्स को दूर भगायेंगे :- हेल्थ मिनिस्टर हर्ष वर्धन
12. जवान डकैत है :- वी.के सिंग
13. महिलाएँ चार पांच बच्चे पैदा करे :- साक्षी महाराज सांसद
14. लडकियों को मर्यादा मे रहना होगा तब जाकर बलात्कार नही होंगे :- विजय वर्गीय ( भाजपा नेता)
15. व्यापम स्केम बडी बात नही :- विजय वर्गीय
16. नितिश का DNA खराब है :- नरेन्द्र मोदी
17. किसान मरते भो मरने दो हम क्या करे :- भाजपा सांसद संजय दोत्तरे
18. दाल और सब्जी के भाव बढना महेंगाइ नही है :- अरुण जेटली
19. विदेशों मे कितना कालाधन है मुझे पता नही :- नरेन्द्र मोदी
20. चुनाव मे कालेधन की बात जुमला थी :- अमित शाह
21. राम मंदिर के लिये 320 सिट चाहिए :- अमित शाह
22. मुझे पहले शर्म आती थी भारत देश मे पैदा होने के लिये :- नरेन्द्र मोदी
23. भारत सपेरो का देश था :- नरेन्द्र मोदी
24. अच्छे दिन 25 साल बाद आयेंगे :- अमित शाह
25. पाकिस्तान को बिजली देंगे :- नरेन्द्र मोदी
26. आरटिकल 370 हटाना नामुमकिन :- राजनाथ सिंह
27. चीन गलती से हमारी सिमा मे घूस जाता है :- राजनाथ सिंह
28. भ्रष्टाचार ऐसे करो के किसी को पता न चले :- विजयवर्गीय
29. देश के जवानों से बडा काम हम करते है, शहीद होना बडी बात नही :- अमित शाह
30. जवान से ज्यादा जोखिम व्यापारी उठाता है :- नरेन्द्र मोदी
31. ज्यादातर बंगाल और बिहार की विधवा महिलाएँ भिख मांगती है मथुरा मे :- हेमा मालिनी
32. लाल गाल वाले टमाटर खाते है , गरीब नही :- प्रभात झा.
34. लडकीया अपने शरीर बनाने के चक्कर मे कुपोषण का शिकार बनती है :- नरेन्द्र मोदी
35. दलित और दलित महिलाएँ को मार मारने पर ही सिधे चलते है :- पुरुषोत्तम रूपाला
36. गालियाँ वेद वाक्य है :- राजनाथ सिंह
37. बीजेपी ने कभी नही कहा अचछे दिन आऐंगे :- नरेंद्र सिंह तोमर
38. दलितो को कुत्ते कह - कह
संग्रहकर्ता को धन्यवाद

सध्याचा काळात कुजबुज करून किंवा संदर्भ न देता असे फोटो सोशल मेडीयावर टाकून नेहरूंच्यावर शेरेबाजी केली जाते हि हीन प्रवृत्तीच आहे.

चाचा नेहरू !
#childrens_day_14th_November
#World_Photography_Day_19_August
नेहरू आणि स्त्रिया -

होमई व्यारावाला - भारताच्या पहिल्या फोटोजर्नलीस्ट होमई व्यारावाला यांनी काढलेले हे छायाचित्र आहे.ब्रिटीश हायकमिशनर सिम्पसन यांच्या पत्नीची सिगरेट शिलगावतानाचा हा फोटो त्यांनी नेहरूंच्या सांगण्यावरून काढला (लपूनछपून Paparazzi style ने नव्हे). युरोपियन देशात एखाद्या महिलेची सिगरेट लिट करणे म्हणजे Gentleman's etiquette समजले जात. नेहरूंची अशीच छायाचित्रे जेक्लिन केनेडी सोबतही आहेतच.होमई व्यारावाला यांनी नेहरू,इंदिराजी,गांधी यांसह अनेक नेते आणि प्रसिद्ध व्यक्तींची छायाचित्रे काढली, त्यांचा artistic sense हि जबरदस्तच होता.

नेहरू आणि एडविना -

हेन्री कार्टीयर-ब्रेसाँ - लॉर्ड माउंटबॅटन,एडविना आणि नेहरूंचा हा फोटो टिपलाय जगप्रसिद्ध फोटोग्राफर हेन्री कार्टीयर-ब्रेसाँ यांनी,कार्टीयर यांनी काढलेले जवाहरलाल नेहरूंचे गुलाबाचं फूल घेतलेले देखणे फोटो जगप्रसिद्ध आहेत. पण एडविना माउंटबॅटनच्या सोबत,आपलं पदच नव्हे तर देहभानही पुरतं विसरून हास्यविनोद करणारे नेहरू ब्रेसाँने जे काही पकडले आहेत त्याला तोड नाही.तेव्हाचा सर्वसामान्य माणसाला नेहरूंच्या अशा फोटो बद्दल आक्षेप घेण्याचे कारणच नव्हते, कारण त्यांना नेहरूंची जिवनशैली बद्दल पुर्ण कल्पना होती. आणि  एडवीना यांचा जन्म 28 नोव्हेंबर 1901चा आहे तर नेहरूंचा 14 नोव्हेंबर 1889 आहे. याचाच अर्थ असा की जेव्हा जून 1946 मधे नेहरू आणि एडविनाची प्रथम भेंट झाली तेव्हा नेहरू 57 वर्ष 8 महिऩे एवढ्या वयाचे तर एडविना 45 वर्ष 7 महिने वयाच्या होत्या.

हेन्री कार्टर ब्रेसन यांना आधुनिक छायाचित्रणाचे जनक म्हटलं जातं. त्यांनी डिसायसीव्ह मुव्हमेंट नावाची टर्म जन्माला घातली. कोणतीही फ्रेम दिसल्यावर लगेच कॅमेरॅचं शटर दाबण्यापेक्षा अशा एखाद्या प्रसंगाची वाट पहायची ज्यातुन एक कथा तयार होईल. नेहरूंचं छायाचित्र त्यांनी अशाच एका डिसायसीव्ह मुव्हमेंटला काढलय. त्यावरून नेहरूंच्या व्यक्तीमत्वाबद्दल शंका उपस्थित करून त्यांची बदनामी केली जाते

पण सध्याचा काळात कुजबुज करून किंवा संदर्भ न देता असे फोटो सोशल मेडीयावर टाकून नेहरूंच्यावर शेरेबाजी केली जाते हि हीन प्रवृत्तीच आहे.

नेहरू आणि सिगरेट -
त्यावेळेसचे सर्वच जागतिक मोठे नेते , चर्चिल , रूझवेल्ट ,स्टालिन ,क्लेमेंट एटली, नासेर , मार्शल टिटो. मावो, कास्त्रो , चे घेवारा, हो ची मिन्ह अगदी हिटलर ,मुसोलिनी हे सर्व सिगारेट ओढायचे आणि तीसुद्धा सर्वासमक्ष ,बिनदिक्कत . अर्थात भारतात त्यावेळी एकटे नेहरुच सिगारेट ओढत होते असे नह्वे ,देशात बिडी ,चिरुट, गांजा, हुक्का ,गुडगुडी या स्वरुपात धुम्रपान होतेच, आपल्या देशात इतर ही नेत्यांना बिडी ,तंबाखू ,तपकीर ,हुक्का यांचे व्यसन होतेच.

नेहरू आणि शिवाजी महाराज -
Glimpses of World History पुस्तक हे त्यांनी जेल मध्ये असताना लिहिले होते त्याकाळी तुरुंगात फक्त  लेखकांची पुस्तके उपलब्ध होत असत त्यातील काही चुकीच्या संदर्भांमुळे घोळ झाला.
Glimpses of World History  पुस्तकात हा उल्लेख होता जो नंतरच्या सगळ्या एडिशन्स मधून वगळण्यात आला, प्रतापगड वर शिवरायांच्या पुतळ्याचे १९५६ साली अनावरण झाले त्याप्रसंगी नेहरूंनी जाहीर माफी मागितली होती.
त्यांनतर Discovery of India मध्ये शिवरायांचा उल्लेख सर्वोच्च देशाभिमानी असा करण्यात आला होता.

व्यक्तीप्रमाणे Ideologies बदलतात, त्या त्या Ideologies ला follow करणारे लोक असतात, त्यामुळे आपल्या Ideology मध्ये न बसणाऱ्या व्यक्ती वर टीका केली जाते, आणि ते करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. (मी सुद्धा काही गोष्टीबाबत नेहरूंचा टीकाकार आहे ) पण हि टीका करताना आपण कोणत्या थराला जातोय याचेही भान असावे .

नेहरूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा जबरदस्त होती. नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाची थोरवी गाणारे लोक रशिया, अमेरिकेत आजही आहेत. ज्या काळात ‘मीडिया’ व ‘सोशल मीडिया’ हा प्रकार अस्तित्वात नव्हता त्या काळातली ही लोकप्रियता आहे.

 देशाच्या पहिल्या पंतप्रधानांची प्रतिमा आपण कुठे नेवून ठेवतोय याचाही विचार करण्याची गरज आज या दिवशी नक्कीच आहे.

“A photograph is neither taken or seized by force. It offers itself up. It is the photo that takes you. One must not take photos.” - Henri Cartier-Bresson

- मालोजीराव जगदाळे
(जुन्या पोस्ट मधील काही कमेंट्स पोस्ट मध्ये वापरल्या आहेत राज कुलकर्णी आणि इंद्रजित खांबे यांच्या )






लाखांचा पेन वापरतो . 20 लाखाचा सूट घालतो . आन आईला 2000 रुपयांसाठी लाईनला उभेकरतो . आपल्याला नाय पटले .

33हजार रुपये किलो चे जवानी टिकवणारे  मशरूम खातो .

1.50 लाखांचा पेन वापरतो .

20 लाखाचा सूट घालतो .


आन आईला 2000 रुपयांसाठी लाईनला उभेकरतो . आपल्याला नाय पटले .
Revealed! PM Modi Keeps Himself Healthy by Eating These Mushrooms Which Cost Rs 30,000 per Kg
Raghwendra Shukla | Sep 16,2016 06:13:00 PM IST
Revealed! PM Modi Keeps Himself Healthy by Eating These Mushrooms Which Cost Rs 30,000 per Kg
+5
Ever since Narendra Modi became Prime Minister, the only thing people are talking about is his rigorous work routine. He works almost 16 to 18 hours every day and that too without taking a break. Despite all this, he manages to keep himself fit with a combination of Yoga and healthy diets.

But very few people know that PM Modi eats mushrooms, found in Himachal, on a daily basis to keep himself active and lively. Interestingly, they cost nearly Rs 30,000 per kg.

Modi himself had revealed this and he is eating these mushrooms since he was BJP national secretary for party activities in Himachal Pradesh. He had revealed this to reporters during an unofficial conversation after becoming Gujarat Chief Minister.

“The secret of my good health is mushrooms of Himachal Pradesh. They have various health benefits,” he had reportedly said.

The scientific name of this mushroom is Morchella esculenta and is generally found in Himachal Pradesh. It commands a huge demand globally.

These mushrooms are the main source of income for villagers of Himachal Pradesh. They start collecting the mushrooms in March and continue it till May-end. It is dried before being sold.

https://mdaily.bhaskar.com/news/TOP-secret-of-pm-modi-health-5419173.html


आन आईला 2000 रुपयांसाठी लाईनला उभेकरतो . आपल्याला नाय पटले .